शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
4
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
5
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
6
"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
7
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
8
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
9
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
10
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
11
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
12
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
13
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
14
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
15
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
16
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
17
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
18
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
19
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
20
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा परिषदेत भारताची पाकवर टीका; दहशतवाद्यांचे अर्थसाहाय्य रोखण्याच्या प्रस्तावाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 02:35 IST

अतिरेक्यांचे समर्थन करणारे देश आपल्या कारवाईला आणि निष्क्रियतेला योग्य ठरवीत दहशतवाद्यांना आश्रय देत राहतील आणि काही सबबी सांगत राहतील, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानवर टीका केली आहे.

संयुक्त राष्ट्रे : अतिरेक्यांचे समर्थन करणारे देश आपल्या कारवाईला आणि निष्क्रियतेला योग्य ठरवीत दहशतवाद्यांना आश्रय देत राहतील आणि काही सबबी सांगत राहतील, अशा शब्दांत भारतानेपाकिस्तानवर टीका केली आहे.संयुक्त राष्ट्रांकडून प्रतिबंधित अतिरेकी आणि संस्थांविरुद्ध निर्बंध सक्तीने लागू करण्याचे आवाहनही भारताने सुरक्षा परिषदेकडे केले आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी यावेळी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीकाही केली.सुरक्षा परिषदेने गुरुवारी सर्वसहमतीने एक प्रस्ताव स्वीकार केला आहे. यात सदस्य देशांना अतिरेकी कार्यासाठी अर्थसाहाय्य रोखण्यासाठी प्रयत्न वाढविण्याबाबत सांगण्यात आले आहे.भारताने याबाबतचा प्रस्ताव स्वीकार केल्याच्या कृतीचे स्वागत करताना म्हटले आहे की, दहशतवादाविरुद्धच्या प्रयत्नात हा मैलाचा दगड ठरेल. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी याबाबतच्या खुल्या चर्चेत भाग घेताना म्हटले आहे की, दहशतवाद्यांची आर्थिक रसद रोखण्यासाठी प्रयत्न करण्याच्या प्रस्तावाचे भारत स्वागत करीत आहे.भारताने पाकिस्तानचा अप्रत्यक्ष उल्लेख करीत म्हटले आहे की, दुर्दैवाने वस्तुस्थिती ही आहे की, दहशतवाद्यांचे समर्थन करणारे देश आपली कारवाई आणि निष्क्रियता योग्य ठरविण्यासाठी दहशतवाद्यांना आश्रय देत राहतील. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांनी यावेळी मत व्यक्त करीत जम्मू-काश्मीरचा उल्लेख केला.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतPakistanपाकिस्तान