शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

सुरक्षा परिषदेत भारताची पाकवर टीका; दहशतवाद्यांचे अर्थसाहाय्य रोखण्याच्या प्रस्तावाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 02:35 IST

अतिरेक्यांचे समर्थन करणारे देश आपल्या कारवाईला आणि निष्क्रियतेला योग्य ठरवीत दहशतवाद्यांना आश्रय देत राहतील आणि काही सबबी सांगत राहतील, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानवर टीका केली आहे.

संयुक्त राष्ट्रे : अतिरेक्यांचे समर्थन करणारे देश आपल्या कारवाईला आणि निष्क्रियतेला योग्य ठरवीत दहशतवाद्यांना आश्रय देत राहतील आणि काही सबबी सांगत राहतील, अशा शब्दांत भारतानेपाकिस्तानवर टीका केली आहे.संयुक्त राष्ट्रांकडून प्रतिबंधित अतिरेकी आणि संस्थांविरुद्ध निर्बंध सक्तीने लागू करण्याचे आवाहनही भारताने सुरक्षा परिषदेकडे केले आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी यावेळी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीकाही केली.सुरक्षा परिषदेने गुरुवारी सर्वसहमतीने एक प्रस्ताव स्वीकार केला आहे. यात सदस्य देशांना अतिरेकी कार्यासाठी अर्थसाहाय्य रोखण्यासाठी प्रयत्न वाढविण्याबाबत सांगण्यात आले आहे.भारताने याबाबतचा प्रस्ताव स्वीकार केल्याच्या कृतीचे स्वागत करताना म्हटले आहे की, दहशतवादाविरुद्धच्या प्रयत्नात हा मैलाचा दगड ठरेल. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी याबाबतच्या खुल्या चर्चेत भाग घेताना म्हटले आहे की, दहशतवाद्यांची आर्थिक रसद रोखण्यासाठी प्रयत्न करण्याच्या प्रस्तावाचे भारत स्वागत करीत आहे.भारताने पाकिस्तानचा अप्रत्यक्ष उल्लेख करीत म्हटले आहे की, दुर्दैवाने वस्तुस्थिती ही आहे की, दहशतवाद्यांचे समर्थन करणारे देश आपली कारवाई आणि निष्क्रियता योग्य ठरविण्यासाठी दहशतवाद्यांना आश्रय देत राहतील. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांनी यावेळी मत व्यक्त करीत जम्मू-काश्मीरचा उल्लेख केला.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतPakistanपाकिस्तान