शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
5
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
6
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
7
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
8
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
9
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
10
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
11
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
12
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
13
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
14
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
15
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
16
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
17
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
18
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
19
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
20
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताची नवी खेळी; सौदी अरेबियाला संरक्षण क्षेत्रात दिली मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:10 IST

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी भारताने सौदी अरेबियाला एक महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे.

संरक्षण क्षेत्रातील हा प्रस्ताव भारत-सौदी अरेबिया संयुक्त संरक्षण सहयोग समितीच्या सातव्या बैठकीत देण्यात आला. ही बैठक २८ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत पार पडली. भारतीय संरक्षण मंत्रालयानुसार, या बैठकीचे सह-अध्यक्षपद संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद आणि सौदीचे मेजर जनरल साद मोहम्मद एच अलकाथिरी यांनी भूषवले. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्याची वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली.

पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताची खेळीभारत आणि सौदी अरेबियाने संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रशिक्षण, औद्योगिक भागीदारी, सागरी सहकार्य आणि संयुक्त लष्करी कवायतींसारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. याच चर्चेदरम्यान, भारताने सौदी अरेबियाच्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय सायबर सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान (IT), आपत्ती व्यवस्थापन आणि सामरिक संपर्क यांसारख्या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.

सध्या सौदी अरेबियाच्या सुरक्षा दलांना पाकिस्तानची लष्कर प्रशिक्षण देत आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक दशकांपासून लष्करी संबंध असून, संयुक्त हवाई, भूदल आणि नौदल कवायती नियमितपणे होतात. फेब्रुवारी २०१८ मध्ये पाकिस्तानने सौदी अरेबियाला प्रशिक्षण आणि सल्लागार मिशनसाठी सैनिक पाठवले होते. भारताने सौदीला दिलेल्या या प्रस्तावामुळे पाकिस्तान-सौदीच्या जुन्या लष्करी संबंधांना धक्का बसण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पाकिस्तान जागतिक स्तरावर आणखी एकाकी पडू शकतो.

मेक इन इंडिया उत्पादनांची ऑफरसंरक्षण सहकार्यासोबतच भारताने 'मेक इन इंडिया' अंतर्गत तयार केलेली अत्याधुनिक संरक्षण उपकरणेही सौदी अरेबियासमोर सादर केली. चर्चेत दोन्ही देशांनी संरक्षण उपकरणांचे संयुक्त उत्पादन आणि भागीदारी वाढवण्यावरही सहमती दर्शवली.

या वर्षी नौदल आणि भूदलाच्या यशस्वी चर्चेवर दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही अशा चर्चा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. एप्रिल २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरेबिया भेटीदरम्यान स्थापन झालेल्या 'स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिल' अंतर्गत संरक्षण सहकार्यावरील मंत्रिस्तरीय समितीच्या स्थापनेमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Indiaभारतsaudi arabiaसौदी अरेबिया