शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताची नवी खेळी; सौदी अरेबियाला संरक्षण क्षेत्रात दिली मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:10 IST

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी भारताने सौदी अरेबियाला एक महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे.

संरक्षण क्षेत्रातील हा प्रस्ताव भारत-सौदी अरेबिया संयुक्त संरक्षण सहयोग समितीच्या सातव्या बैठकीत देण्यात आला. ही बैठक २८ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत पार पडली. भारतीय संरक्षण मंत्रालयानुसार, या बैठकीचे सह-अध्यक्षपद संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद आणि सौदीचे मेजर जनरल साद मोहम्मद एच अलकाथिरी यांनी भूषवले. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्याची वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली.

पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताची खेळीभारत आणि सौदी अरेबियाने संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रशिक्षण, औद्योगिक भागीदारी, सागरी सहकार्य आणि संयुक्त लष्करी कवायतींसारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. याच चर्चेदरम्यान, भारताने सौदी अरेबियाच्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय सायबर सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान (IT), आपत्ती व्यवस्थापन आणि सामरिक संपर्क यांसारख्या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.

सध्या सौदी अरेबियाच्या सुरक्षा दलांना पाकिस्तानची लष्कर प्रशिक्षण देत आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक दशकांपासून लष्करी संबंध असून, संयुक्त हवाई, भूदल आणि नौदल कवायती नियमितपणे होतात. फेब्रुवारी २०१८ मध्ये पाकिस्तानने सौदी अरेबियाला प्रशिक्षण आणि सल्लागार मिशनसाठी सैनिक पाठवले होते. भारताने सौदीला दिलेल्या या प्रस्तावामुळे पाकिस्तान-सौदीच्या जुन्या लष्करी संबंधांना धक्का बसण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पाकिस्तान जागतिक स्तरावर आणखी एकाकी पडू शकतो.

मेक इन इंडिया उत्पादनांची ऑफरसंरक्षण सहकार्यासोबतच भारताने 'मेक इन इंडिया' अंतर्गत तयार केलेली अत्याधुनिक संरक्षण उपकरणेही सौदी अरेबियासमोर सादर केली. चर्चेत दोन्ही देशांनी संरक्षण उपकरणांचे संयुक्त उत्पादन आणि भागीदारी वाढवण्यावरही सहमती दर्शवली.

या वर्षी नौदल आणि भूदलाच्या यशस्वी चर्चेवर दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही अशा चर्चा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. एप्रिल २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरेबिया भेटीदरम्यान स्थापन झालेल्या 'स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिल' अंतर्गत संरक्षण सहकार्यावरील मंत्रिस्तरीय समितीच्या स्थापनेमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Indiaभारतsaudi arabiaसौदी अरेबिया