शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 07:58 IST

हे ट्रक सुकामेवा आणि काजू यांसारखे सामान घेऊन भारतात पोहोचले आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. यामुळे अटारी बोर्डर बंद केली होती. यामुळे अफगाणिस्तानमधून भारतात येणारे ट्रकही बंद होते. दरम्यान, काल अटारी-वाघा सीमेवरून १६० अफगाण ट्रकना विशेष प्रवेशाची परवानगी देऊन भारताने पुन्हा एकदा अफगाणिस्तानप्रती आपली उदारता दाखवली आहे. हे ट्रक सुकामेवा आणि काजू यांसारखे सामान घेऊन भारतात पोहोचले आहेत. भारत आणि तालिबान यांच्यात काही दिवसापूर्वी झालेल्या पहिल्या राजकीय चर्चेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी फोनवर चर्चा केली. भारत आणि तालिबानमधील हा पहिला औपचारिक राजकीय संपर्क होता. जयशंकर यांच्या आगामी इराण आणि चीन दौऱ्यापूर्वी मुत्ताकी यांनी त्यांना फोन केला. या संभाषणानंतर दुसऱ्याच दिवशी, भारताने अफगाण ट्रकना अटारी सीमेवरून प्रवेश करण्यास परवानगी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पाकिस्तानने वाघा सीमेवर या ट्रकना क्लीयरन्स देण्यास विलंब केला, पण शुक्रवारी अटारी येथे काही ट्रकना अनलोड करण्याची परवानगी देण्यात आली.

आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह

पहलगाम हल्ल्यानंतर तणाव

२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर, भारताने २४ एप्रिल रोजी अटारी-वाघा सीमा बंद केली. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. भारताने ट्रान्सशिपमेंट सुविधांसह सर्व व्यापार स्थगित केले. आता भारताने अफगाणिस्तानला ही विशेष सूट दिली आहे.

भारत हा दक्षिण आशियातील अफगाणिस्तानचा सर्वात मोठा निर्यात बाजार आहे, दोन्ही देशांमधील व्यापार सुमारे १ अब्ज डॉलर आहे. अफगाणिस्तानातून प्रामुख्याने सुकामेवा, सफरचंद आणि इतर वस्तू भारतात येतात. अटारी-वाघा सीमा हा भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापारासाठी सर्वात स्वस्त आणि जलद मार्ग आहे. सीमा बंद होण्यापूर्वी, दररोज ४०-४५ अफगाण ट्रक अटारीला पोहोचत होते.

सीमेवर अजूनही निर्बंध

एप्रिलमध्ये सीमा बंद झाल्यानंतर, पाकिस्तानने २५ एप्रिलपूर्वी पाकिस्तानात प्रवेश केलेल्या १५० अफगाण ट्रकना भारतात प्रवेश करण्याची परवानगी दिली. यावेळीही अफगाण दूतावासाच्या विनंतीवरून पाकिस्तानने काही ट्रकना मंजुरी दिली.  भारत-पाकिस्तान व्यापार आणि लोकांच्या हालचालींवर निर्बंध अजूनही आहेत.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तान