शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:05 IST

महाराष्ट्रातील न्हावा शेवा बंदर वगळता, इतर सर्व भूमार्ग आणि बंदरांमधून बांगलादेशातून येणाऱ्या 'या' उत्पादनांना आता भारतात प्रवेश मिळणार नाही.

भारतानेबांगलादेशातून येणाऱ्या ताग (Jute) आणि संबंधित फायबर उत्पादनांच्या आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे. दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील संबंधात सध्या वाढलेला तणाव पाहता, भारताने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी (२८ जून २०२५) हा निर्णय जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातील न्हावा शेवा बंदर वगळता, इतर सर्व भूमार्ग आणि बंदरांमधून बांगलादेशातून येणाऱ्या ताग उत्पादनांना आता भारतात प्रवेश मिळणार नाही.

DGFTकडून बंदीची अधिसूचना जारीवाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) शुक्रवारी (२७ जून) ही बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली. SAFTA (दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र) करारांतर्गत बांगलादेशच्या ताग उत्पादनांना भारतात शुल्कमुक्त प्रवेश मिळत होता. मात्र, सूत्रांनी सांगितले की, बांगलादेशातून येणाऱ्या ताग उत्पादनांच्या, विशेषतः धागा, फायबर आणि पिशव्यांच्या 'डंपिंग' (कमी किमतीत मोठ्या प्रमाणात विक्री) आणि अनुदानित आयात (सरकारकडून मदत मिळवून) यामुळे भारतीय ताग उद्योगाला बऱ्याच काळापासून मोठा फटका बसत आहे.

अँटी-डंपिंग शुल्काचाही उपयोग नाही!बांगलादेश सरकारकडून मिळणाऱ्या राज्य अनुदानाचा (State Subsidy) फायदा बांगलादेशी जूट निर्यातदारांना मिळत असल्याचे पुरावे भारताकडे आहेत. यावर उपाय म्हणून, अँटी-डंपिंग अँड अलाइड ड्युटीज डायरेक्टोरेट जनरलने (DGAD) यापूर्वी सविस्तर चौकशी करून बांगलादेशातून येणाऱ्या जूट आणि इतर वस्तूंवर अँटी-डंपिंग ड्युटी (ADD) लादली होती. मात्र,यानंतरही आयातीत कोणतीही घट झालेली नाही.

विविध अनुदानांव्यतिरिक्त, बांगलादेशी निर्यातदार अनेकदा गैरव्यवहार करत आहेत. यामध्ये तांत्रिक सवलतींचा फायदा घेऊन अँटी-डंपिंग ड्युटी टाळणे, चुकीचे लेबलिंग करणे, ADDमधून सूट मिळालेल्या कंपन्यांद्वारे निर्यात करणे आणि जास्त अनुदान मिळवण्यासाठी चुकीची घोषणा करणे यासारख्या गैरप्रकारांचा समावेश आहे. यामुळे भारताच्या जूट उद्योगाचे मोठे नुकसान होत आहे.

साफ्टा कराराने बांगलादेशला भारतात शुल्कमुक्त प्रवेश दिला असला तरी, बांगलादेशातून येणाऱ्या अनुदानित आणि स्वस्त जूट उत्पादनांमुळे भारतीय उद्योगाला मोठा तोटा सहन करावा लागत होता. यावरच आता भारताने बंदी घालून बांगलादेशाला मोठा धक्का दिला आहे. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेशbusinessव्यवसायIndiaभारत