शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:05 IST

महाराष्ट्रातील न्हावा शेवा बंदर वगळता, इतर सर्व भूमार्ग आणि बंदरांमधून बांगलादेशातून येणाऱ्या 'या' उत्पादनांना आता भारतात प्रवेश मिळणार नाही.

भारतानेबांगलादेशातून येणाऱ्या ताग (Jute) आणि संबंधित फायबर उत्पादनांच्या आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे. दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील संबंधात सध्या वाढलेला तणाव पाहता, भारताने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी (२८ जून २०२५) हा निर्णय जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातील न्हावा शेवा बंदर वगळता, इतर सर्व भूमार्ग आणि बंदरांमधून बांगलादेशातून येणाऱ्या ताग उत्पादनांना आता भारतात प्रवेश मिळणार नाही.

DGFTकडून बंदीची अधिसूचना जारीवाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) शुक्रवारी (२७ जून) ही बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली. SAFTA (दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र) करारांतर्गत बांगलादेशच्या ताग उत्पादनांना भारतात शुल्कमुक्त प्रवेश मिळत होता. मात्र, सूत्रांनी सांगितले की, बांगलादेशातून येणाऱ्या ताग उत्पादनांच्या, विशेषतः धागा, फायबर आणि पिशव्यांच्या 'डंपिंग' (कमी किमतीत मोठ्या प्रमाणात विक्री) आणि अनुदानित आयात (सरकारकडून मदत मिळवून) यामुळे भारतीय ताग उद्योगाला बऱ्याच काळापासून मोठा फटका बसत आहे.

अँटी-डंपिंग शुल्काचाही उपयोग नाही!बांगलादेश सरकारकडून मिळणाऱ्या राज्य अनुदानाचा (State Subsidy) फायदा बांगलादेशी जूट निर्यातदारांना मिळत असल्याचे पुरावे भारताकडे आहेत. यावर उपाय म्हणून, अँटी-डंपिंग अँड अलाइड ड्युटीज डायरेक्टोरेट जनरलने (DGAD) यापूर्वी सविस्तर चौकशी करून बांगलादेशातून येणाऱ्या जूट आणि इतर वस्तूंवर अँटी-डंपिंग ड्युटी (ADD) लादली होती. मात्र,यानंतरही आयातीत कोणतीही घट झालेली नाही.

विविध अनुदानांव्यतिरिक्त, बांगलादेशी निर्यातदार अनेकदा गैरव्यवहार करत आहेत. यामध्ये तांत्रिक सवलतींचा फायदा घेऊन अँटी-डंपिंग ड्युटी टाळणे, चुकीचे लेबलिंग करणे, ADDमधून सूट मिळालेल्या कंपन्यांद्वारे निर्यात करणे आणि जास्त अनुदान मिळवण्यासाठी चुकीची घोषणा करणे यासारख्या गैरप्रकारांचा समावेश आहे. यामुळे भारताच्या जूट उद्योगाचे मोठे नुकसान होत आहे.

साफ्टा कराराने बांगलादेशला भारतात शुल्कमुक्त प्रवेश दिला असला तरी, बांगलादेशातून येणाऱ्या अनुदानित आणि स्वस्त जूट उत्पादनांमुळे भारतीय उद्योगाला मोठा तोटा सहन करावा लागत होता. यावरच आता भारताने बंदी घालून बांगलादेशाला मोठा धक्का दिला आहे. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेशbusinessव्यवसायIndiaभारत