शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:47 IST

युद्धग्रस्त होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताचे ८ वे जहाज 'ग्रीन आशा' २०,००० टन एलपीजीसह सुखरूप बाहेर पडले आहे.

पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या सावटात भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक तेल व्यापाराचे केंद्र असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील कडक नाकाबंदीतून भारताचे ८ वे व्यापारी जहाज 'ग्रीन आशा' सुखरूप बाहेर पडले आहे. सुमारे २०,००० टन एलपीजी घेऊन हे जहाज रविवारी दुपारी ३:३० वाजता इराणच्या जलक्षेत्रातून यशस्वीरित्या मार्गस्थ झाले.

युद्ध सुरू झाल्यापासूनचे ८ वे जहाज

२८ फेब्रुवारी रोजी इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर या सागरी मार्गावरून जहाजांची ये-जा करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. असे असतानाही, भारताचे 'ग्रीन आशा' हे जहाज लारक, केशम आणि होर्मुझ बेटांच्या दरम्यान असलेल्या इराणच्या सागरी हद्दीतून सुखरूप बाहेर पडले. यापूर्वी शुक्रवारी रात्री 'ग्रीन सांवरी' या जहाजाने ४६,६५० मेट्रिक टन एलपीजीसह हा मार्ग पार केला होता. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत ८ भारतीय जहाजांनी या 'डेथ झोन'मधून यशस्वी प्रवास केला आहे.

भारतीय नौदलाचा कडा पहारा

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, या भागात अडकलेल्या भारतीय व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाची युद्धनौका सज्ज आहे. केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय सतत इराणच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, भारतीय जहाजांना सुरक्षित रस्ता मिळवून देण्यासाठी मुत्सद्दी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

१८ जहाजे आणि ४८५ नाविक अजूनही खाडीत

शिपिंग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पर्शियन खाडीमध्ये अजूनही १८ भारतीय जहाजे आणि सुमारे ४८५ भारतीय नाविक अडकलेले आहेत. बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी सांगितले की, "खाडीतील प्रत्येक भारतीय जहाजावर आणि कर्मचाऱ्यांवर आमची बारीक नजर आहे. सध्या सर्व नाविक पूर्णपणे सुरक्षित आहेत."

९६४ हून अधिक नाविक मायदेशी परतले!

आतापर्यंत ९६४ हून अधिक भारतीय नाविकांना युद्धग्रस्त भागातून सुखरूप भारतात आणण्यात आले आहे. देशातील सर्व बंदरांचे कामकाज सामान्यपणे सुरू असून, परराष्ट्र मंत्रालय आणि परदेशातील भारतीय दूतावास या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. इंधनाचा तुटवडा भासू नये म्हणून भारत सरकार या मार्गावरून गॅस आणि तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजांना प्राधान्य देत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian ship carrying LPG exits Hormuz Strait amidst war tensions.

Web Summary : Amidst West Asia tensions, India's 'Green Asha', carrying 20,000 tons of LPG, safely exited the Hormuz Strait. It's the eighth Indian vessel to navigate this route since recent attacks. The Indian Navy is safeguarding ships, with efforts underway to ensure safe passage for others. Hundreds of sailors have returned home.
टॅग्स :IndiaभारतIranइराणUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर