शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:11 IST

इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. या दोन्ही देशात हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंधू राबवले आहे.

मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात हल्ले वाढवले आहेत. दरम्यान, आता या दोन्ही देशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंधू राबवले. या अंतर्गत आज इराणमध्ये अडकलेल्या ११० विद्यार्थ्यांना विमानाने भारतात आणले आहे. 

ऑपरेशन सिंधू अंतर्गत, या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे पहिले विमान गुरुवारी आर्मेनियातील येरेवन येथून नवी दिल्लीत पोहोचले. 'तेहरानमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासाच्या सहकार्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. परराष्ट्र मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. "भारतीय दूतावासाच्या मदतीने, तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांना शहरातून बाहेर काढण्यात आले आहे",असं या निवेदनात म्हटले आहे. 

इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय विद्यार्थी १८ जून रोजी येरेवनच्या झ्वार्टनॉट्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका विशेष विमानाने निघाले. १९ जून रोजी सकाळी हे विमान नवी दिल्लीत उतरले. यापूर्वी, भारताने इराणमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये याची घोषणा केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "भारताने इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. भारत परदेशात असलेल्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो."

भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी इराण आणि आर्मेनियाने केलेल्या मदतीचे भारतीय अधिकाऱ्यांनीही कौतुक केले आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे, यामुळे अडकलेल्या नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनेक देशांमध्ये विमानतळ बंद आहेत. यानंतर, भारताने इराणला नागरिकांच्या परतीसाठी सीमेवर सुरक्षित मार्ग देण्याची विनंती केली होती.

इराणने ही विनंती मान्य केली. यानंतर, विद्यार्थ्यांना अझरबैजान, तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तान सारख्या शेजारील देशांमधून निघून जाण्याचा सल्ला देण्यात आला. भारतीय दूतावासाने इराणमध्ये नियंत्रण कक्ष देखील सुरु केले आहे. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलIndiaभारत