शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:11 IST

इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. या दोन्ही देशात हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंधू राबवले आहे.

मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात हल्ले वाढवले आहेत. दरम्यान, आता या दोन्ही देशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंधू राबवले. या अंतर्गत आज इराणमध्ये अडकलेल्या ११० विद्यार्थ्यांना विमानाने भारतात आणले आहे. 

ऑपरेशन सिंधू अंतर्गत, या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे पहिले विमान गुरुवारी आर्मेनियातील येरेवन येथून नवी दिल्लीत पोहोचले. 'तेहरानमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासाच्या सहकार्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. परराष्ट्र मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. "भारतीय दूतावासाच्या मदतीने, तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांना शहरातून बाहेर काढण्यात आले आहे",असं या निवेदनात म्हटले आहे. 

इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय विद्यार्थी १८ जून रोजी येरेवनच्या झ्वार्टनॉट्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका विशेष विमानाने निघाले. १९ जून रोजी सकाळी हे विमान नवी दिल्लीत उतरले. यापूर्वी, भारताने इराणमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये याची घोषणा केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "भारताने इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. भारत परदेशात असलेल्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो."

भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी इराण आणि आर्मेनियाने केलेल्या मदतीचे भारतीय अधिकाऱ्यांनीही कौतुक केले आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे, यामुळे अडकलेल्या नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनेक देशांमध्ये विमानतळ बंद आहेत. यानंतर, भारताने इराणला नागरिकांच्या परतीसाठी सीमेवर सुरक्षित मार्ग देण्याची विनंती केली होती.

इराणने ही विनंती मान्य केली. यानंतर, विद्यार्थ्यांना अझरबैजान, तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तान सारख्या शेजारील देशांमधून निघून जाण्याचा सल्ला देण्यात आला. भारतीय दूतावासाने इराणमध्ये नियंत्रण कक्ष देखील सुरु केले आहे. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलIndiaभारत