शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

भारतीयांनो, ना घंटा वाजेल, ना गवत उगवेल; पाकिस्तानची भारताला अणुबॉम्बची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 09:13 IST

शेख रशीद सभेत म्हणाले की, पाकिस्तान मरायला आणि मारायला तयार आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानला भिकेचे डोहाळे लागले असून, लोकांची अवस्था अतिशय वाईट आहे. १ किलो पिठासाठी १ किलोमीटर लांबीच्या रांगा लावल्या जात आहेत. असे असूनही पाकिस्तानी राजकारणी मात्र भारतावर अणुबॉम्बने हल्ला करण्याची धमकी देत आहेत. 

पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी भारताला धमकी दिली आहे. भारतीयांनो, बिर्लाजींच्या मंदिराची घंटा वाजणार नाही आणि भारतात गवतही उगणार नाही, असे म्हणत अहमद यांनी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली आहे.

शेख रशीद सभेत म्हणाले की, पाकिस्तान मरायला आणि मारायला तयार आहे. मी म्हणालो, भारतीयांनो, आमच्याकडे असे मसाले आहेत की, त्यामुळे बिर्लाजींच्या मंदिराची घंटा वाजणार नाही, ना भारतात गवत उगवेल. संपूर्ण जगाला मी जाहीर करू इच्छितो की आपण उपाशी राहू. आपण नग्न होऊ, अनवाणी पायाने फिरू, मात्र आम्ही २४ कोटी जनता पाकिस्तानसाठी लढेल आणि मरेलही. 

यापूर्वीही दिला इशारा

२०१९ मध्ये अहमद यांनी कलम ३७० हटवल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली होती. आमच्याकडे भरभरून अणुबॉम्ब आहेत, आम्हाला पाहिजे तिथे आम्ही हल्ला करू शकतो, असे ते म्हणाले होते. शेख रशीद अहमद हे इम्रान खान यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत.  त्यांनी पाकिस्तानचे ३८ वे गृहमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. याआधी ते रेल्वेमंत्रीही राहिले आहेत. त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तानी रेल्वेची अवस्था अत्यंत वाईट होती.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानnuclear warअणुयुद्धNarendra Modiनरेंद्र मोदी