शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सैनिकांना मालदीवमधून हटवले जाणार, त्यांची जागा कोण घेणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:01 IST

मदत आणि बचावकार्य तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी सैनिक तेथे तैनात आहेत

Maldives, Indian Soldiers: मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी संसदेत सांगितले की, भारत सरकार १० मे पर्यंत मालदीवमधून आपले सर्व लष्करी जवान हटवणार आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी भारतीयसैनिक तेथे तैनात आहेत. पण आता त्यांना हटवले जाणार असून त्यांची जागा दुसरेच कोणी तरी घेणार आहे. जाणून घ्या त्याबद्दल.

मुइज्जू यांनी संसदेत भारतीय सैनिकांविरोधात सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की भारत सरकार १० मे पर्यंत मालदीवमधून सैनिक हटवेल, कारण मालदीवमध्ये भारतीय सैनिकांची उपस्थिती हा दोन्ही देशांमधील वादाचा मुद्दा आहे. भारताने मालदीवला दोन हेलिकॉप्टर आणि एक विमान भेट दिले आहे. ते मदत आणि बचाव कार्य आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत वापरले जातात. सुमारे ८० भारतीय सैनिक मालदीवमध्ये हेलिकॉप्टर आणि विमानांच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी तैनात आहेत. पण आता ते हटवले जाणार आहे.

भारतीय जवानांची जागा कोण घेणार?

भारतीय जवानांची जागा कोण घेणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सैनिकांच्या जागी सिव्हिल ऑपरेटर किंवा माजी सैनिक तैनात केले जाऊ शकतात. असे सांगण्यात येत आहे की मुइज्जू सरकारने आपल्या देशात तैनात केलेले लोक सक्रिय सेवेत नसावेत यावर सहमती दर्शविली आहे. 'जेव्हा सेवा देणारा सैनिक त्याच्या स्वत:च्या देशात पोस्ट केला जातो तेव्हा एक नैसर्गिक चिंता असते. मात्र, निवृत्त अधिकारी, तटरक्षक दल किंवा इतर निमलष्करी दलाच्या बाबतीत बाब वेगळी असते', असे काही जाणकारांचे मत आहे.

उच्चस्तरीय कोअर ग्रुपच्या बैठकीत काय घडलं? 

गेल्या शुक्रवारी (२ फेब्रुवारी) भारत-मालदीव उच्चस्तरीय कोअर ग्रुपची दुसरी बैठक नवी दिल्ली येथे झाली. या बैठकीनंतर मालदीवच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारताने तिन्ही विमानचालन प्लॅटफॉर्मवरून आपले सैन्य हटवण्याचे मान्य केले आहे. प्रेस रिलीझनुसार, लष्करी जवानांची १० मार्चपर्यंत एका प्लॅटफॉर्मवरून आणि १० मे पर्यंत उर्वरित दोन प्लॅटफॉर्मवरून 'बदली' केली जाईल. भारत सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात मात्र सैन्य हटवण्याबाबत कोणताही उल्लेख नव्हता.

मालदीवमधील लोकांना मानवतावादी आणि वैद्यकीय निर्वासन सेवा पुरवणाऱ्या भारतीय विमानचालन प्लॅटफॉर्मच्या संचालनासाठी व्यावहारिक उपायांवर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली असल्याचे सांगण्यात आले. तसेच, दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय कोअर ग्रुपची पुढील बैठक मालदीवची राजधानी माले येथे होणार असल्याचे मान्य करण्यात आले.

टॅग्स :MaldivesमालदीवIndiaभारतSoldierसैनिक