शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सैनिकांना मालदीवमधून हटवले जाणार, त्यांची जागा कोण घेणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:01 IST

मदत आणि बचावकार्य तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी सैनिक तेथे तैनात आहेत

Maldives, Indian Soldiers: मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी संसदेत सांगितले की, भारत सरकार १० मे पर्यंत मालदीवमधून आपले सर्व लष्करी जवान हटवणार आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी भारतीयसैनिक तेथे तैनात आहेत. पण आता त्यांना हटवले जाणार असून त्यांची जागा दुसरेच कोणी तरी घेणार आहे. जाणून घ्या त्याबद्दल.

मुइज्जू यांनी संसदेत भारतीय सैनिकांविरोधात सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की भारत सरकार १० मे पर्यंत मालदीवमधून सैनिक हटवेल, कारण मालदीवमध्ये भारतीय सैनिकांची उपस्थिती हा दोन्ही देशांमधील वादाचा मुद्दा आहे. भारताने मालदीवला दोन हेलिकॉप्टर आणि एक विमान भेट दिले आहे. ते मदत आणि बचाव कार्य आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत वापरले जातात. सुमारे ८० भारतीय सैनिक मालदीवमध्ये हेलिकॉप्टर आणि विमानांच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी तैनात आहेत. पण आता ते हटवले जाणार आहे.

भारतीय जवानांची जागा कोण घेणार?

भारतीय जवानांची जागा कोण घेणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सैनिकांच्या जागी सिव्हिल ऑपरेटर किंवा माजी सैनिक तैनात केले जाऊ शकतात. असे सांगण्यात येत आहे की मुइज्जू सरकारने आपल्या देशात तैनात केलेले लोक सक्रिय सेवेत नसावेत यावर सहमती दर्शविली आहे. 'जेव्हा सेवा देणारा सैनिक त्याच्या स्वत:च्या देशात पोस्ट केला जातो तेव्हा एक नैसर्गिक चिंता असते. मात्र, निवृत्त अधिकारी, तटरक्षक दल किंवा इतर निमलष्करी दलाच्या बाबतीत बाब वेगळी असते', असे काही जाणकारांचे मत आहे.

उच्चस्तरीय कोअर ग्रुपच्या बैठकीत काय घडलं? 

गेल्या शुक्रवारी (२ फेब्रुवारी) भारत-मालदीव उच्चस्तरीय कोअर ग्रुपची दुसरी बैठक नवी दिल्ली येथे झाली. या बैठकीनंतर मालदीवच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारताने तिन्ही विमानचालन प्लॅटफॉर्मवरून आपले सैन्य हटवण्याचे मान्य केले आहे. प्रेस रिलीझनुसार, लष्करी जवानांची १० मार्चपर्यंत एका प्लॅटफॉर्मवरून आणि १० मे पर्यंत उर्वरित दोन प्लॅटफॉर्मवरून 'बदली' केली जाईल. भारत सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात मात्र सैन्य हटवण्याबाबत कोणताही उल्लेख नव्हता.

मालदीवमधील लोकांना मानवतावादी आणि वैद्यकीय निर्वासन सेवा पुरवणाऱ्या भारतीय विमानचालन प्लॅटफॉर्मच्या संचालनासाठी व्यावहारिक उपायांवर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली असल्याचे सांगण्यात आले. तसेच, दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय कोअर ग्रुपची पुढील बैठक मालदीवची राजधानी माले येथे होणार असल्याचे मान्य करण्यात आले.

टॅग्स :MaldivesमालदीवIndiaभारतSoldierसैनिक