शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

भारतीय वस्तू आमची बरोबरी करूच शकत नाहीत; चीनची अश्लाघ्य टीका

By admin | Updated: October 20, 2016 06:22 IST

चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात यावा, अशी मोहीम भारतात जोरात सुरू झाल्याने चीन प्रचंड अस्वस्थ झाला आहे.

बीजिंग : चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात यावा, अशी मोहीम भारतात जोरात सुरू झाल्याने चीन प्रचंड अस्वस्थ झाला आहे. बहिष्कार टाकण्याचा प्रचार भारतातील प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमातून होत असल्यामुळे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचा जळफळाट झाला आहे. भारतीय वस्तू चिनी वस्तूंची बरोबरी करू शकत नाहीत. भारत केवळ चीनवर भुंकू शकतो, अशी अश्लाघ्य भाषा या वृत्तपत्राने वापरली आहे. ग्लोबल टाइम्सच्या बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अंकात ही टीका करण्यात आली आहे. पाकिस्तानी अतिरेक्यांना आंतरराष्ट्रीय अतिरेकी घोषित करण्याच्या प्रयत्नात चीनने खोडा घातल्यामुळे संतप्त झालेल्या भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. याची दखल घेताना ग्लोबल टाइम्सची पातळी बुधवारी घसरली.दैनिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले की, चिनी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करू नये. भारतात प्रचंड भ्रष्टाचार असून, कामगारही मेहनती नाहीत. भारतात गुंतवणूक करणे हे आत्महत्या करण्यासारखेच आहे. भारतातील प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांतून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, ही मोहीम निरर्थक आहे. भारतीय उत्पादक कंपन्या चिनी उत्पादनांची बरोबरी करू शकत नाहीत. भारतात अजून नीट रस्ते नाही. महामार्ग नाहीत. वीज आणि पाण्याची तीव्र टंचाई आहे. भरीस भर म्हणजे तळापासून शिखरापर्यंत सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. सरकारच्या प्रत्येक विभागात भ्रष्टाचाराने कळस गाठलेला आहे. भारत आणि अमेरिकेत मैत्रीपूर्ण संबंध वाढत असल्याच्या मुद्द्यावर ग्लोबल टाइम्सने तोंडसुख घेतले. लेखात म्हटले की, अमेरिका कोणाचाच मित्र नाही. केवळ चीनला रोखण्यासाठी अमेरिका भारताला जवळ करीत आहे. चीनचा विकास आणि जगातील वाढता प्रभाव यामुळे अमेरिकेला मत्सर वाटू लागला आहे. ग्लोबल टाइम्सने म्हटले की, भारतात भरपूर पैसा आहे. तथापि, त्यातील बहुतांश पैसा राजकारणी, नोकरशहा आणि काही भांडवलदार यांच्या हातात एकवटला आहे. भारतातील अभिजन वर्ग उपलब्ध पैसा देशासाठी खर्च करायला तयार नाही. करदात्यांचा पैसा भारतातील सरकारे वैयक्तिक सुखोपभोगासाठी खर्च करीत आहेत. (वृत्तसंस्था)>मेक इन इंडिया अव्यवहार्यलेखात म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मेक इन इंडिया’ ही मोहीम अव्यवहार्य आहे. चिनी कंपन्यांनी भारतात कारखाने उभे करण्याऐवजी चीनमध्येच कारखाने उभे करावेत. भारतीय कंपन्यांना चीनमध्ये येऊन माल खरेदी करू द्या. चीनमध्ये उत्पादित माल भारतात नेऊन विकण्याचे मॉडेलच उत्तम आहे. >चीनचा तिसऱ्या तिमाहीतील वृद्धीदर ६.७ टक्के राहिलायंदाच्या तिसऱ्या तिमाहीतील चीनचा आर्थिक वृद्धी दर ६.७ टक्के राहिला. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर येऊन स्थिर होत असल्याचे यातून दिसून येते. नॅशनल ब्युरो आॅफ स्टॅटिक्सच्या (एनबीएस) आकडेवारीनुसार, २0१६ साठी सरकारने जाहीर केलेल्या ६.५ ते ७.0 टक्के वृद्धी दराच्या अंदाजाला अनुरूप असाच हा दर आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली. त्यानुसार, तिमाही आधारावर चीनची अर्थव्वस्था आदल्या तिमाहीच्या तुलनेत १.८ टक्के वाढली. जीडीपीचा वृद्धी दर २0१६ च्या पहिल्या तीन तिमाहीत ६.७ टक्के राहिला. देशांतर्गत उत्पादन ७,८७0 अब्ज डॉलर राहिले. एनबीएसचे प्रवक्ते शेंग लेईयून यांनी सांगितले की, सकळ मागणी, पुरवठाधिष्ठित संरचनात्मक सुधारणा आदिंमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेची वृद्धी मजबूत राहिली. जारी झालेल्या आकड्यांनुसार २0१६ च्या पहिल्या तीन तिमाहीत म्हणजेच नऊ महिन्यांत औद्योगिक उत्पादन ६.0 टक्क्यांनी वाढले.