शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 21:37 IST

Indian MEA on Russia-Ukraine : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत चर्चेत आहे.

Foreign Minister S. Jaishankar’s Interview : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची एक मुलाखत खूप चर्चेत आहे. एका ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीला परराष्ट्रमंत्र्यांनी ही मुलाखत दिली आहे. मुलाखतीत भारताच्यारशियाशी असलेल्या मैत्रीच्या प्रश्नावर एस. जयशंकर यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिले. ऑस्ट्रेलियन न्यूज अँकरने भारत-रशिया संबंधांबाबत भारतीय परराष्ट्रमंत्र्यांना प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, भारताच्या ऑस्ट्रेलियासोबतच्या संबंधांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. 

पाकिस्तानबद्दल काय म्हणाले जयशंकर...ऑस्ट्रेलियन न्यूज अँकरने भारताच्या रशियाशी असलेल्या मैत्रीमुळे ऑस्ट्रेलियासोबतच्या संबंधांमध्ये काही अडचण आहे का? असा प्रश्न जयशंकर यांना विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, आमच्या रशियासोबत असलेल्या मैत्रिचा ऑस्ट्रेलियाशी असलेल्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. आजच्या काळात कोणत्याही देशाशी विशेष संबंध नाहीत. पाकिस्तानला टोला लगावत जयशंकर म्हणथात, तुमच्या तर्कानुसार विचार केला तर अनेक देशांचे पाकिस्तानशी संबंध आहेत. अशा स्थितीत भारताने काळजी करण्याची गरज आहे का?

भारत-रशिया संबंधांचा जगाला फायदा जयशंकर पुढे म्हणाले की, भारताच्या रशियासोबतच्या चांगल्या संबंधांचा आंतरराष्ट्रीय समुदायाला फायदा होत आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयावर जयशंकर म्हणतात, भारताने हे केले नसते, तर जागतिक ऊर्जा बाजार पूर्णपणे नष्ट झाला असता. जगात ऊर्जेचे संकट आले असते, जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असत्या आणि जगभर महागाई शिगेला पोहोचली असती. भारताचे रशियासोबतचे चांगले संबंध रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चा सुरू करण्यास मदत करू शकतात.

भारताचे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी चांगले संबंध रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी भारताचे चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत भारत युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांशी चर्चा करण्यास सक्षम आहे. जगाला आणि अगदी ऑस्ट्रेलियालाही अशा देशाची गरज आहे, जो युद्धाला चर्चेच्या टेबलावर आणण्यास मदत करू शकेल. बहुतांश युद्धे वाटाघाटीच्या टेबलावर संपतात, अशी प्रतिक्रियाही जयशंकर यांनी दिली.  

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतrussiaरशियाAustraliaआॅस्ट्रेलिया