शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अमेरिकेला मागे टाकणार भारतीय अर्थव्यवस्था!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 06:44 IST

२०५० पर्यंत होणार भरभराट; संशोधन-विकास आणि मनुष्यबळ वापराचे मात्र आव्हान

नवी दिल्ली : जागतिक आर्थिक आणि रणनीतिक सत्ताकेंद्र हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे. जगातील चार मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी तीन अर्थव्यवस्था आशिया-प्रशांत क्षेत्रातील आहेत. २०२५ पर्यंत जागतिक लोकसंख्येपैकी दोनतृतीयांश लोकसंख्या याच क्षेत्रात राहील. या क्षेत्रात भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने विकसित होत असून, २०५० पर्यंत ती अमेरिकेलाही मागे टाकील, असे एका अहवालात म्हटले आहे.लोयी इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार, अमेरिकेची शक्ती क्षीण होत असली तरी, आशिया-प्रशांत विभागात अजूनही अमेरिकेचा प्रचंड प्रभाव आहे. या विभागात एकूण २५ प्रभावशाली देश आहेत ज्यात भारत चौथ्या तर पाकिस्तान १४ व्या स्थानी आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत भारत व चीन यांच्यात असलेली मोठी दरी भरून काढणे भारताला नजीकच्या काळात तरी शक्य होणार नाही. पण आगामी ११ वर्षांत भारत अमेरिकेच्या जवळ पोहोचलेला असेल. २०५० सालापर्यंत भारत अमेरिकेला मागे टाकेल.मात्र भारताच्या मार्गात काही अडथळे आहेत. उत्पादन क्षमता, संशोधन व विकास या मापदंडांत भारत खूपच मागे पडत आहे. साधने आणि मनुष्यबळ यांचा पूर्ण वापर करणे भारताला शक्य होताना दिसत नाही, असे अहवालात म्हटले आहे.११४ मापदंडांच्या आधारेविविध देशांच्या अर्थव्यवस्थांबाबतचा हा अहवाल तयार करण्यासाठी ११४ मापदंड निश्चित करण्यात आले होते. अर्थव्यवस्था, लष्कर, मुत्सद्देगिरी आणि सांस्कृतिक प्रभाव या क्षेत्रांचा विचार त्यासाठी करण्यात आला. याच मुद्यांच्या आधारे कोणता देश किती प्रभावशाली आहे, हे ठरविण्यात आले.

टॅग्स :USअमेरिकाEconomyअर्थव्यवस्थाIndiaभारतJapanजपान