शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 08:49 IST

भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना मायदेशी जाण्याचे आदेश दिल्यानंतर तिथल्या पोलीस दलाने गंभीर आरोप केले आहेत.

India vs Canada : भारत आणि कॅनडामधील संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. कॅनडाचे हे आरोप भारताने फेटाळून लावले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पुन्हा एकदा कॅनडाने या प्रकरणात भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतरांच सहभाग असल्याचा आरोप केला आहे. यानंतर भारताने तातडीने कॅनडाच्या उच्चायुक्तांसह ६ राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कॅनडाने केलेल्या आरोपांना उत्तर देताना ट्रूडो सरकारचा हा राजकीय अजेंडा असल्याचं भारताने म्हटलं. आता कॅनडातील पोलिसांनी गंभीर आरोप केला आहे.

भारताच्या कारवाईने हताश झालेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आता भारतावर आरोप करत आहेत. भारताने कॅनडाच्या नागरिकांविरुद्ध गुन्हेगारी कारवाया करू शकतात असा विचार करून चूक केल्याचे जस्टिन ट्रूडो यांनी म्हटलं आहेत. यासोबतच भारतीय गुप्तहेर लॉरेन्स बिश्नोई गँगबरोबर काम करत असल्याचा धक्कादायक आरोप कॅनडाच्या रॉयल कॅनेडियन माउंटेड पत्रकार परिषदेत केला आहे. कॅनडातील भारतीय गुप्तहेर खलिस्तान समर्थकांना  लक्ष्य करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीसोबत काम करत आहेत, असे कॅनडा पोलिसांचे म्हणणं आहे. मात्र याबाबत त्यांनी याबाबत कोणतेही पुरावे दिले नाहीत. 

भारताने सोमवारी आपले उच्चायुक्त आणि इतर मुत्सद्दी आणि अधिकारी यांना परत बोलावण्याची घोषणा केली. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांना लक्ष्य केलं जात असल्याने त्यांना परत मायदेशी बोलावले आहे. यासोबतच भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली असून त्यांना १९ ऑक्टोबरपूर्वी भारत सोडण्यास सांगितले आहे. शीख फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येच्या तपासात कॅनडाने संजय वर्मा यांचा उल्लेख केल्याने भारताने ही कारवाई केली आहे.

भारताच्या या कारवाईनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ओटावा येथे पत्रकार परिषदेत घेत भारताला इशारा दिला. ट्रूडो यांनी भारत सरकारवर कॅनडातील गुन्हेगारी कारवायांचे समर्थन करून चूक केल्याचा आरोप केला. दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या तणावाबाबत बोलताना ट्रुडो यांनी सिंगापूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या आगामी बैठकीच्या महत्त्वावर भर दिला. "गेल्या आठवड्याच्या शेवटी जेव्हा मी पंतप्रधान मोदींशी बोललो तेव्हा मी  सिंगापूरमध्ये आमच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमधली बैठक किती महत्त्वाची असेल हे त्यांना सांगितले. त्यांना त्या बैठकीची माहिती होती आणि मी त्यांना सांगितले की ही बैठक अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे," असं ट्रुडो म्हणाले.

दुसरीकडे, रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी आरोप केला की भारत सरकारचे गुप्तहेर कॅनडाच्या भूमीवर दहशत पसरवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीसोबत काम करत आहेत. "आपण पाहिले आहे की संघटित गुन्हेगारी घटकांचा वापर केला जात आहे आणि एक टोळी यासाठी जबाबदार आहे. बिश्नोई टोळीचे भारतातील गुप्तहेरांशी संबंध आहेत," असे पोलिसांनी म्हटलं आहे. ३१ वर्षीय लॉरेन्स बिश्नोई हा पंजाबचा गुंड असून तो सध्या अहमदाबादच्या साबरमती सेंट्रल जेलमध्ये बंद आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा मुंबई पोलिसांना संशय असताना कॅनडाच्या पोलिसांनी हे आरोप केले आहेत. 

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारतJustin Trudeauजस्टीन ट्रुडो