शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 08:49 IST

भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना मायदेशी जाण्याचे आदेश दिल्यानंतर तिथल्या पोलीस दलाने गंभीर आरोप केले आहेत.

India vs Canada : भारत आणि कॅनडामधील संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. कॅनडाचे हे आरोप भारताने फेटाळून लावले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पुन्हा एकदा कॅनडाने या प्रकरणात भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतरांच सहभाग असल्याचा आरोप केला आहे. यानंतर भारताने तातडीने कॅनडाच्या उच्चायुक्तांसह ६ राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कॅनडाने केलेल्या आरोपांना उत्तर देताना ट्रूडो सरकारचा हा राजकीय अजेंडा असल्याचं भारताने म्हटलं. आता कॅनडातील पोलिसांनी गंभीर आरोप केला आहे.

भारताच्या कारवाईने हताश झालेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आता भारतावर आरोप करत आहेत. भारताने कॅनडाच्या नागरिकांविरुद्ध गुन्हेगारी कारवाया करू शकतात असा विचार करून चूक केल्याचे जस्टिन ट्रूडो यांनी म्हटलं आहेत. यासोबतच भारतीय गुप्तहेर लॉरेन्स बिश्नोई गँगबरोबर काम करत असल्याचा धक्कादायक आरोप कॅनडाच्या रॉयल कॅनेडियन माउंटेड पत्रकार परिषदेत केला आहे. कॅनडातील भारतीय गुप्तहेर खलिस्तान समर्थकांना  लक्ष्य करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीसोबत काम करत आहेत, असे कॅनडा पोलिसांचे म्हणणं आहे. मात्र याबाबत त्यांनी याबाबत कोणतेही पुरावे दिले नाहीत. 

भारताने सोमवारी आपले उच्चायुक्त आणि इतर मुत्सद्दी आणि अधिकारी यांना परत बोलावण्याची घोषणा केली. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांना लक्ष्य केलं जात असल्याने त्यांना परत मायदेशी बोलावले आहे. यासोबतच भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली असून त्यांना १९ ऑक्टोबरपूर्वी भारत सोडण्यास सांगितले आहे. शीख फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येच्या तपासात कॅनडाने संजय वर्मा यांचा उल्लेख केल्याने भारताने ही कारवाई केली आहे.

भारताच्या या कारवाईनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ओटावा येथे पत्रकार परिषदेत घेत भारताला इशारा दिला. ट्रूडो यांनी भारत सरकारवर कॅनडातील गुन्हेगारी कारवायांचे समर्थन करून चूक केल्याचा आरोप केला. दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या तणावाबाबत बोलताना ट्रुडो यांनी सिंगापूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या आगामी बैठकीच्या महत्त्वावर भर दिला. "गेल्या आठवड्याच्या शेवटी जेव्हा मी पंतप्रधान मोदींशी बोललो तेव्हा मी  सिंगापूरमध्ये आमच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमधली बैठक किती महत्त्वाची असेल हे त्यांना सांगितले. त्यांना त्या बैठकीची माहिती होती आणि मी त्यांना सांगितले की ही बैठक अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे," असं ट्रुडो म्हणाले.

दुसरीकडे, रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी आरोप केला की भारत सरकारचे गुप्तहेर कॅनडाच्या भूमीवर दहशत पसरवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीसोबत काम करत आहेत. "आपण पाहिले आहे की संघटित गुन्हेगारी घटकांचा वापर केला जात आहे आणि एक टोळी यासाठी जबाबदार आहे. बिश्नोई टोळीचे भारतातील गुप्तहेरांशी संबंध आहेत," असे पोलिसांनी म्हटलं आहे. ३१ वर्षीय लॉरेन्स बिश्नोई हा पंजाबचा गुंड असून तो सध्या अहमदाबादच्या साबरमती सेंट्रल जेलमध्ये बंद आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा मुंबई पोलिसांना संशय असताना कॅनडाच्या पोलिसांनी हे आरोप केले आहेत. 

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारतJustin Trudeauजस्टीन ट्रुडो