शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

भारताला एकाचवेळी चीन-पाकिस्तानबरोबर युद्ध नाही झेपणार! ड्रॅगनचा फुत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 14:49 IST

दोन दिवसांपूर्वी  लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी भारताने एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे.

नवी दिल्ली, दि. 7 -  दोन दिवसांपूर्वी  लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी भारताने एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे असे वक्तव्य केले होते. रावत यांचे हे विधान चीनच्या चांगलेच जिव्हारी लागले असून, शुक्रवारच्या ग्लोबल टाइम्सच्या लेखातून जनरल बिपिन रावत यांच्यावर आगपाखड करण्यात आली आहे. ग्लोबल टाइम्स हे चीन सरकारच्या मालकीचे वृत्तपत्र आहे. 

रावत यांच्या उद्दामपणामुळे भारताची प्रतिमा मलिन होत असल्याचे लेखात म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेत दोन्ही देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दिशेने पाऊले टाकली. आता डोकलामचा विषय मागे सोडून पुढे वाटचाल करावी असे अनेकांचे मत आहे. अशा परिस्थितीत बिपिन रावत यांनी पूर्णपणे विरुद्ध संदेश देणारे विधान केले आहे असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले आहे. 

भारताला एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानबरोबर युद्ध परवडणार नसल्याचे लेखात म्हटले आहे.  जनरलनी नीट माहिती घेतली पाहिजे. एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानबरोबर युद्ध सुरु झाले तर, भारत परिणाम सहन करु शकेल का ? असे लेखात म्हटले आहे. डोकलामचा तिढा लवकर सुटेल असे चीनी लोकांना वाटत नव्हते पण आता हा वाद निकाली निघालेला असताना रावत चुकीचा संदेश जाईल अशी विधाने करत आहेत. 

आम्ही पहिल्यांदा परिस्थिती चिघळेल अशी कृती करणार नाही आणि भारतालाही करु देणार नाही असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले आहे. चीनबरोबर भविष्यात डोकलाम सारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते अशावेळी भारतीय लष्कर चीनविरुद्धच्या आघाडीवर सक्रीय असताना पाकिस्तान या परिस्थितीचा फायदा उचलू शकतो. त्यामुळे भारताला एकाचवेळी दोन्ही देशांना अंगावर घेण्यासाठी सज्ज असले पाहिजे असे विधान बिपिन रावत यांनी केले होते.  

टॅग्स :Doklamडोकलाम