शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
4
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
5
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
6
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
7
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
8
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
9
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
10
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
12
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
13
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
14
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
15
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
16
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
17
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
18
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
19
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
20
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?

...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 08:48 IST

India vs Pakistan war: जेव्हा पाकिस्तानी सैन्य बांगलादेशी महिलांवर अत्याचार करत होते, तेव्हा भारताने आपले सैन्य घुसवून युद्ध करत बांगलादेशला पाकिस्तानपासून मुक्त केले होते. आता हाच बांगलादेश भारतावर उलटायला लागला आहे.

पहलगाम हल्ल्याला आता जवळपास १० दिवस उलटून गेले आहेत. अद्याप भारताने पाकिस्तानवर किंवा तेथील दहशतवाद्यांवर कारवाई केलेली नाही. दोन दिवसांपूर्वी भारत पाकिस्तानवर हल्ला करणार असा दावा पाकिस्तानने मध्यरात्री केला होता. भारत युद्ध पुकारणार असे जरी सांगितले जात आहे, अशातच शेजारच्या बांगलादेशने केलेले उपकार विसरून भारताविरोधात बोलायला सुरुवात केली आहे. 

जेव्हा पाकिस्तानी सैन्य बांगलादेशी महिलांवर अत्याचार करत होते, तेव्हा भारताने आपले सैन्य घुसवून युद्ध करत बांगलादेशला पाकिस्तानपासून मुक्त केले होते. आता हाच बांगलादेश भारतावर उलटायला लागला आहे. बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भारतविरोधी वक्तव्य केले आहे. जर नवी दिल्ली पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई करत असेल तर ढाक्याने चीनच्या मदतीने भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर कब्जा करावा, असे एएलएम फजलुर रहमान याने म्हटले आहे. रहमान हा माजी सैन्य अधिकारी देखील आहे. सध्या रहमान हा २००९ च्या बांगलादेश रायफल्स हत्याकांडाच्या चौकशी समितीचा अध्यक्ष आहे. 

काही काळापूर्वी मोहम्मद युनूस यांनीही भारतातील सात ईशान्येकडील राज्यांबद्दल भाष्य केले होते. युनूस यांनी ईशान्य भारताचे वर्णन भूपरिवेष्ठित प्रदेश म्हणून केले होते आणि बांगलादेशला संपूर्ण प्रदेशासाठी समुद्राचा एकमेव संरक्षक म्हटले होते. तेव्हा ते बीजिंगच्या भेटीवर होते. 

यानंतर बांगलादेशच्या रहमान या अधिकाऱ्याची पोस्ट आली आहे. आधीच बांगलादेश आणि भारताचे संबंध ताणले गेलेले आहेत. एका फेसबुक पोस्टमध्ये रहमान म्हणाला की, 'जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर बांगलादेशने ईशान्येकडील सात राज्ये ताब्यात घ्यावीत. या संदर्भात, मला वाटते की चीनसोबत संयुक्त लष्करी व्यवस्थेवर चर्चा सुरू करणे आवश्यक आहे.'

टॅग्स :BangladeshबांगलादेशPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान