शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 08:48 IST

India vs Pakistan war: जेव्हा पाकिस्तानी सैन्य बांगलादेशी महिलांवर अत्याचार करत होते, तेव्हा भारताने आपले सैन्य घुसवून युद्ध करत बांगलादेशला पाकिस्तानपासून मुक्त केले होते. आता हाच बांगलादेश भारतावर उलटायला लागला आहे.

पहलगाम हल्ल्याला आता जवळपास १० दिवस उलटून गेले आहेत. अद्याप भारताने पाकिस्तानवर किंवा तेथील दहशतवाद्यांवर कारवाई केलेली नाही. दोन दिवसांपूर्वी भारत पाकिस्तानवर हल्ला करणार असा दावा पाकिस्तानने मध्यरात्री केला होता. भारत युद्ध पुकारणार असे जरी सांगितले जात आहे, अशातच शेजारच्या बांगलादेशने केलेले उपकार विसरून भारताविरोधात बोलायला सुरुवात केली आहे. 

जेव्हा पाकिस्तानी सैन्य बांगलादेशी महिलांवर अत्याचार करत होते, तेव्हा भारताने आपले सैन्य घुसवून युद्ध करत बांगलादेशला पाकिस्तानपासून मुक्त केले होते. आता हाच बांगलादेश भारतावर उलटायला लागला आहे. बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भारतविरोधी वक्तव्य केले आहे. जर नवी दिल्ली पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई करत असेल तर ढाक्याने चीनच्या मदतीने भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर कब्जा करावा, असे एएलएम फजलुर रहमान याने म्हटले आहे. रहमान हा माजी सैन्य अधिकारी देखील आहे. सध्या रहमान हा २००९ च्या बांगलादेश रायफल्स हत्याकांडाच्या चौकशी समितीचा अध्यक्ष आहे. 

काही काळापूर्वी मोहम्मद युनूस यांनीही भारतातील सात ईशान्येकडील राज्यांबद्दल भाष्य केले होते. युनूस यांनी ईशान्य भारताचे वर्णन भूपरिवेष्ठित प्रदेश म्हणून केले होते आणि बांगलादेशला संपूर्ण प्रदेशासाठी समुद्राचा एकमेव संरक्षक म्हटले होते. तेव्हा ते बीजिंगच्या भेटीवर होते. 

यानंतर बांगलादेशच्या रहमान या अधिकाऱ्याची पोस्ट आली आहे. आधीच बांगलादेश आणि भारताचे संबंध ताणले गेलेले आहेत. एका फेसबुक पोस्टमध्ये रहमान म्हणाला की, 'जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर बांगलादेशने ईशान्येकडील सात राज्ये ताब्यात घ्यावीत. या संदर्भात, मला वाटते की चीनसोबत संयुक्त लष्करी व्यवस्थेवर चर्चा सुरू करणे आवश्यक आहे.'

टॅग्स :BangladeshबांगलादेशPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान