शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
3
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
4
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
5
pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
6
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
7
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
8
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
9
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
10
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
11
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
12
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
13
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
14
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान
15
Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
16
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
17
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
18
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
19
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
20
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय

...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 08:48 IST

India vs Pakistan war: जेव्हा पाकिस्तानी सैन्य बांगलादेशी महिलांवर अत्याचार करत होते, तेव्हा भारताने आपले सैन्य घुसवून युद्ध करत बांगलादेशला पाकिस्तानपासून मुक्त केले होते. आता हाच बांगलादेश भारतावर उलटायला लागला आहे.

पहलगाम हल्ल्याला आता जवळपास १० दिवस उलटून गेले आहेत. अद्याप भारताने पाकिस्तानवर किंवा तेथील दहशतवाद्यांवर कारवाई केलेली नाही. दोन दिवसांपूर्वी भारत पाकिस्तानवर हल्ला करणार असा दावा पाकिस्तानने मध्यरात्री केला होता. भारत युद्ध पुकारणार असे जरी सांगितले जात आहे, अशातच शेजारच्या बांगलादेशने केलेले उपकार विसरून भारताविरोधात बोलायला सुरुवात केली आहे. 

जेव्हा पाकिस्तानी सैन्य बांगलादेशी महिलांवर अत्याचार करत होते, तेव्हा भारताने आपले सैन्य घुसवून युद्ध करत बांगलादेशला पाकिस्तानपासून मुक्त केले होते. आता हाच बांगलादेश भारतावर उलटायला लागला आहे. बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भारतविरोधी वक्तव्य केले आहे. जर नवी दिल्ली पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई करत असेल तर ढाक्याने चीनच्या मदतीने भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर कब्जा करावा, असे एएलएम फजलुर रहमान याने म्हटले आहे. रहमान हा माजी सैन्य अधिकारी देखील आहे. सध्या रहमान हा २००९ च्या बांगलादेश रायफल्स हत्याकांडाच्या चौकशी समितीचा अध्यक्ष आहे. 

काही काळापूर्वी मोहम्मद युनूस यांनीही भारतातील सात ईशान्येकडील राज्यांबद्दल भाष्य केले होते. युनूस यांनी ईशान्य भारताचे वर्णन भूपरिवेष्ठित प्रदेश म्हणून केले होते आणि बांगलादेशला संपूर्ण प्रदेशासाठी समुद्राचा एकमेव संरक्षक म्हटले होते. तेव्हा ते बीजिंगच्या भेटीवर होते. 

यानंतर बांगलादेशच्या रहमान या अधिकाऱ्याची पोस्ट आली आहे. आधीच बांगलादेश आणि भारताचे संबंध ताणले गेलेले आहेत. एका फेसबुक पोस्टमध्ये रहमान म्हणाला की, 'जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर बांगलादेशने ईशान्येकडील सात राज्ये ताब्यात घ्यावीत. या संदर्भात, मला वाटते की चीनसोबत संयुक्त लष्करी व्यवस्थेवर चर्चा सुरू करणे आवश्यक आहे.'

टॅग्स :BangladeshबांगलादेशPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान