शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 11:07 IST

India Vs Pakistan War: पाकिस्तानी नेते भारतासोबत युद्धाची भाषा करत आहेत. परंतू, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान असलेला भाऊ शाहबाज शरीफ यांना भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे, असा सल्ला दिला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान भारतासोबत युद्धाची तयारी करत आहे. अरब देश, चीन आणि ब्रिटनकडे पाकिस्तान अब्जावधी रुपयांची मागणी करत आहे. अशातच पाकिस्तानने तुर्कीकडून अद्ययावत शस्त्रास्त्रे मिळविण्यात यश मिळविले आहे. या देशांनी जर पाकिस्तानला पैसा दिला तर तो देखील पाकिस्तान शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठीच वापरणार आहे. पाकिस्तानी नेते भारतासोबत युद्धाची भाषा करत आहेत. परंतू, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान असलेला भाऊ शाहबाज शरीफ यांना भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे, असा सल्ला दिला आहे. 

दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले

भारताविरोधात युद्धाच्या दिशेने पाऊले टाकू नका, त्या ऐवजी कुटनितीने तनाव कमी करण्यावर भर द्यावा, असा सल्ला नवाझ शरीफ यांनी दिला आहे. पाकिस्तानी नेते एकीकडे भारतासोबत युद्ध करण्याची, मंत्री अणुबॉम्ब वापरण्याची धमकी देत आहेत. परंतू शाहबाज शरीफ कात्रीत सापडले आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या हातात कारगिल युद्धासारखीच परिस्थिती गेली तर भारतासोबत युद्ध होणार आहे. यामुळे शाहबाज यांनी नवाझ यांना फोन करून याबाबतची माहिती दिली आहे. 

भारताने केलेली कारवाई, पाकिस्तानने त्यावरून केलेली कारवाई तसेच पाकिस्तानच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी नवाझ शरीफ यांना दिली आहे. भारताशी युद्धात अडकण्यापेक्षा राजनैतिक स्तरावर प्रयत्न करा. भारतासोबतचे युद्ध पाकिस्तानसाठी चांगले ठरणार नाही, असे शरीफ यांनी सांगितल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. 

मरियम नवाझ देखील तिथे उपस्थित होत्या. यावेळी शाहबाज यांनी पाकिस्तान भारताला जसाश तसे प्रत्यूत्तर देण्यास तयार असल्याचे नवाझ शरीफ यांना सांगितले. भारताने हल्ला केल्यास त्याला अधिक ताकदीने उत्तर देणार, तसा प्रस्ताव शाहबाज यांनी नेला होता. यावर नवाझ शरीफ यांनी हा सल्ला दिला आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाwarयुद्ध