शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडून 'चायना किलर' अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी, सीमा प्रश्न सोडविण्यासंदर्भात ड्रॅगननं केलं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 16:01 IST

भारताने नुकतेच 'चायना किलर' म्हटल्या जाणाऱ्या अग्नी-5 या अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. यानंतर चीनचे हे वक्तव्य आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याला विरोध करणाऱ्या चीनचा सूर बदलला आहे. चीनने सीमाप्रश्नासंदर्भात भाष्य केले आहे. सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडविणे दोन्ही देशांच्या हिताचे असल्याचे चीनने म्हटले आहे. तसेच, दोन्ही देशाच्या नेत्यांच्या सहमतीने भारत आणि चीन लवकरच परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढतील, जो प्रासंगिक करारांनुसार असेल, अशी आशा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी बुधवारी व्यक्त केली. महत्वाचे म्हणजे, भारताने नुकतेच 'चायना किलर' म्हटल्या जाणाऱ्या अग्नी-5 या अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. यानंतर चीनचे हे वक्तव्य आले आहे. 

अग्नी-5 क्षेपणास्त्र हे भारताचे सर्वात लांब पल्ल्याचे MIRV तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्रात एकाच वेळी अनेक अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता आहे. चीनच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनेही भारताच्या या क्षेपणास्त्राची प्रशंसा केली होती. याशिवाय चीनच्या सिन्हुआ या वृत्तसंस्थेनेही या क्षेपणास्त्राच्या चाचणीचे वृत्त चिनी भाषेत प्रसिद्ध केले आहे. 

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनच्या टिप्पणीवर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील. चीनची टिप्पणी अस्वीकार्य आहे, असे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी म्हटले होते. 

अरुणाचलवर दावा करत चीनने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला विरोध केला होता. पीएम मोदींच्या अरुणाचल दौऱ्यामुळे सीमा विवाद अधिकच जटील होईल, असे चीनने म्हटले होते. याला भारताने कठोर भूमिका घेत प्रत्युत्तर दिले आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतBorderसीमारेषाborder disputeसीमा वाद