शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 07:52 IST

Hindu Leader Bhabesh Chandra Roy: अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या सुरक्षेला असलेला धोका आणखी वाढला; दोन्ही देशातील तणाव कायम. 

ढाका/ नवी दिल्ली : बांगलादेशमधील दिनाजपूर जिल्ह्यात भावेशचंद्र रॉय (५८) या हिंदू नेत्याचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या सुरक्षेला असलेला धोका आणखी वाढला आहे. 

रॉय यांच्या हत्येचा भारताने शनिवारी (दि. १९) तीव्र निषेध केला. बांगलादेशातील हंगामी सरकारने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याची आपली जबाबदारी नीटपणे पार पाडावी, असे भारताने म्हटले आहे. 

भावेशचंद्र रॉय हे बांगलादेश पूजा उद्यापन परिषदेच्या बीराल शाखेचे उपाध्यक्ष असून, तेथील हिंदू समाजातील ते मान्यवर व्यक्ती आहेत. रॉय यांचे घरातून गुरुवारी अपहरण केल्यानंतर काही तासांतच ते गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्याने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

ते घरी आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी अपहरणकर्त्यांनी आधी त्यांना दूरध्वनी केला होता, असा संशय त्यांच्या पत्नी शांतना रॉय यांनी व्यक्त केला.

‘अल्पसंख्याक रक्षणाचे कर्तव्य बांगलादेशने नीट पार पाडावे’ 

रॉय यांना नरबारी गावात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

या घटनेबाबत भारताने शनिवारी म्हटले आहे की, बांगलादेशातील अल्पसंख्याकाचा छळ सुरू असून, रॉय यांची हत्या हा त्याचाच भाग आहे. त्या देशात हंगामी सरकारच्या कार्यकाळात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हे गुन्हे करणाऱ्या लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. बांगलादेशातील हिंदूंसह सर्व अल्पसंख्याकांचे रक्षण करण्याचे कर्तव्य हंगामी सरकारने नीट पार पाडावे, असेही भारताने म्हटले आहे. 

या कारणामुळे दोन्ही देशांत तणाव

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकार विरोधात तेथील जनतेने आंदोलन केले. त्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन त्या बांगलादेश सोडून भारतात रवाना झाल्या. या घटनेनंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला असून तो बऱ्याचअंशी कायम आहे. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशDeathमृत्यूHinduहिंदूIndiaभारत