शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

“अयशस्वी देशाकडून धडे घेण्याची गरज नाही”; काश्मीरवरून भारताने पाकला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 11:15 IST

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनला (OIC) भारताने चांगलेच सुनावले आहे.

नवी दिल्ली: काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानच्या कायम कुरापती सुरू असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तान काश्मीर मुद्द्यावरून भारताला घेरण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. यातच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनला (OIC) भारताने फटकारले आहे. भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याचा अधिकार ओआयसीला नाही. तसेच एका अयशस्वी आणि दहशतवादाचे केंद्र असलेल्या देशाकडून धडे घेण्याची भारताला गरज नाही, या शब्दांत भारताने पाकिस्तानला फटकारले आहे. (india slams pakistan oic for raising kashmir issue at unhrc)

जिनेव्हा येथील भारताच्या स्थायी अभियानाचे प्रथम सचिव पवन बधे यांनी भारताचा दृष्टिकोन परिषदेत मांडला. यूएनएचआरसीच्या बैठकीत भारताने पाकिस्तानवर जोरदार घणाघात केला. संयुक्त राष्ट्राने बंदी घातलेल्या दहशतवाद्यांना खुलेआम समर्थन देणारा, प्रशिक्षण, वित्तपुरवठा आणि शस्त्रे पुरवणारा देश म्हणून  पाकिस्तानची जागतिक पातळीवर ओळख आहे, अशी टीकाही यावेळी करण्यात आली. 

ही विचारधारेची लढाई, तडजोड नाही; संघ, भाजपवर राहुल गांधी यांचा हल्लाबोल

पाकिस्तान मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे

काश्मीरबाबत पाकिस्तान आणि आयओसीने सतत वक्तव्ये केल्यानंतर भारताने थेट प्रत्युत्तर दिले. या परिषदेला माहिती आहे की, पाकिस्तान मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे आणि भारताच्या भूभागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. हिंदू, शीख आणि ख्रिश्चन आणि अहमदियासारख्या समुदायाबद्दल पाकिस्तानची वृत्ती जगापासून लपलेली नाही, असे भारताने म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानला उघडपणे दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे, त्यांना प्रशिक्षण, पैशांची मदत करत आहे. पाकिस्तान भारताविरुद्ध खोटा प्रचार करण्यासाठी या परिषदेचा वापर करतो. भारत ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे आणि जगातील दहशतवादाचे केंद्रबिंदू असलेल्या पाकिस्तानसारख्या अपयशी देशांकडून भारताला कोणत्याही धड्याची गरज नाही, या शब्दांत भारताने पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारत