शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

PoK सोडा, दहशतवाद आणि अत्याचार थांबवा; पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत भारताने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 09:28 IST

भारताने दहशतवाद थांबवण्यास, जम्मू-काश्मीरचा ताब्यात असलेला (PoK) भाग रिकामा करण्यास आणि अल्पसंख्याक लोकांवर होणारे अत्याचार थांबवण्यास सांगितले आहे.

जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले. भारताने म्हटले आहे की, तांत्रिक गुंतागुंतीत अडकण्याऐवजी पाकिस्तानने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषींवर विश्वासार्ह आणि सत्यापित कारवाई करावी. दहशतवादी हल्ल्याच्या १५ वर्षांनंतरही भारत न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. याशिवाय, दक्षिण आशियातील शांततेसाठी भारताने पाकिस्तानला तीन सल्ले दिले. भारताने दहशतवाद थांबवण्यास, जम्मू-काश्मीरचा ताब्यात असलेला (PoK) भाग रिकामा करण्यास आणि अल्पसंख्याक लोकांवर होणारे अत्याचार थांबवण्यास सांगितले आहे.

भारताकडून डिप्लोमेट पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानला ताब्यात असलेला म्हणजेच पीओके परिसर रिकामा करण्यास सांगितले. केंद्रशासित प्रदेशाच्या ताब्यातील क्षेत्र रिकामे करण्यासोबतच दहशतवादाविरोधात कारवाई करण्यात यावी, असे भारताने म्हटले आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना शिक्षा करण्याचे आवाहन त्यांनी केले. याआधीही पाकिस्तानने भारताविरोधात गरळ ओकली होती. यावर भारताने म्हटले की, पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा गैरवापर करतो.

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकड यांनी काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडण्याचे धाडस दाखवले. पाकिस्तानला आपल्या शेजाऱ्यांसोबत शांततापूर्ण आणि मजबूत संबंध हवे आहेत, असा दावा अन्वर उल हक काकड यांनी केला. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणाले की, पाकिस्तानला भारतासह सर्व शेजारी राष्ट्रांशी शांततापूर्ण आणि मजबूत संबंध हवे आहेत. काश्मीर ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेची गुरुकिल्ली आहे. जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा हा संयुक्त राष्ट्रांच्या अजेंड्यावरील प्रदीर्घ काळापासून कायम असलेला मुद्दा आहे.

भारताच्यावतीने पेटल गेहलोत यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आपले मत मांडले. त्यांनीही पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानला मानवाधिकार सुधारण्याचा सल्लाही दिला. पेटल गेहलोत यांनी सांगितले की, पाकिस्तानने इतरांकडे बोटे दाखवण्याऐवजी मानवी हक्कांची नोंद सुधारली तर बरे होईल. अल्पसंख्याक आणि महिलांवर दररोज अत्याचार होत आहेत. पाकिस्तानमध्ये भूतकाळात ख्रिश्चन समुदायावर क्रूरता दिसून आली, त्याठिकाणी एकूण १९ चर्च जाळले गेल्या आणि ८९ ख्रिश्चन घरे जाळली गेली. पाकिस्तानातील अल्पसंख्याक समाजातील महिलांची, विशेषत: हिंदू, शीख आणि ख्रिश्चनांची स्थिती दयनीय आहे.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघPakistanपाकिस्तानIndiaभारत