शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

PoK सोडा, दहशतवाद आणि अत्याचार थांबवा; पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत भारताने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 09:28 IST

भारताने दहशतवाद थांबवण्यास, जम्मू-काश्मीरचा ताब्यात असलेला (PoK) भाग रिकामा करण्यास आणि अल्पसंख्याक लोकांवर होणारे अत्याचार थांबवण्यास सांगितले आहे.

जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले. भारताने म्हटले आहे की, तांत्रिक गुंतागुंतीत अडकण्याऐवजी पाकिस्तानने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषींवर विश्वासार्ह आणि सत्यापित कारवाई करावी. दहशतवादी हल्ल्याच्या १५ वर्षांनंतरही भारत न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. याशिवाय, दक्षिण आशियातील शांततेसाठी भारताने पाकिस्तानला तीन सल्ले दिले. भारताने दहशतवाद थांबवण्यास, जम्मू-काश्मीरचा ताब्यात असलेला (PoK) भाग रिकामा करण्यास आणि अल्पसंख्याक लोकांवर होणारे अत्याचार थांबवण्यास सांगितले आहे.

भारताकडून डिप्लोमेट पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानला ताब्यात असलेला म्हणजेच पीओके परिसर रिकामा करण्यास सांगितले. केंद्रशासित प्रदेशाच्या ताब्यातील क्षेत्र रिकामे करण्यासोबतच दहशतवादाविरोधात कारवाई करण्यात यावी, असे भारताने म्हटले आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना शिक्षा करण्याचे आवाहन त्यांनी केले. याआधीही पाकिस्तानने भारताविरोधात गरळ ओकली होती. यावर भारताने म्हटले की, पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा गैरवापर करतो.

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकड यांनी काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडण्याचे धाडस दाखवले. पाकिस्तानला आपल्या शेजाऱ्यांसोबत शांततापूर्ण आणि मजबूत संबंध हवे आहेत, असा दावा अन्वर उल हक काकड यांनी केला. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणाले की, पाकिस्तानला भारतासह सर्व शेजारी राष्ट्रांशी शांततापूर्ण आणि मजबूत संबंध हवे आहेत. काश्मीर ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेची गुरुकिल्ली आहे. जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा हा संयुक्त राष्ट्रांच्या अजेंड्यावरील प्रदीर्घ काळापासून कायम असलेला मुद्दा आहे.

भारताच्यावतीने पेटल गेहलोत यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आपले मत मांडले. त्यांनीही पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानला मानवाधिकार सुधारण्याचा सल्लाही दिला. पेटल गेहलोत यांनी सांगितले की, पाकिस्तानने इतरांकडे बोटे दाखवण्याऐवजी मानवी हक्कांची नोंद सुधारली तर बरे होईल. अल्पसंख्याक आणि महिलांवर दररोज अत्याचार होत आहेत. पाकिस्तानमध्ये भूतकाळात ख्रिश्चन समुदायावर क्रूरता दिसून आली, त्याठिकाणी एकूण १९ चर्च जाळले गेल्या आणि ८९ ख्रिश्चन घरे जाळली गेली. पाकिस्तानातील अल्पसंख्याक समाजातील महिलांची, विशेषत: हिंदू, शीख आणि ख्रिश्चनांची स्थिती दयनीय आहे.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघPakistanपाकिस्तानIndiaभारत