शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
2
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
3
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
4
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
5
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
6
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
7
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
8
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
9
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
10
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
11
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
12
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
13
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
14
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
15
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
16
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
17
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
18
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
19
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
20
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट

पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:12 IST

India Slams Pakistan in UN : पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा खोटा आरोप केला.

India Slams Pakistan in UN : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानला पुन्हा एकदा जम्मू-काश्मीर विषयावर भारताकडून तोंडघशी पडावं लागलं. पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा खोटा आरोप करताच भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी पी. हरीश यांनी पाकला कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिलं.

पी. हरीश म्हणाले की, “आम्ही पाकिस्तानला आवाहन करतो की, त्यांनी पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यात असलेल्या भागांमध्ये (PoJK) चालू असलेलं मानवी हक्कांचं उल्लंघन तात्काळ थांबवावं. तेथील जनता पाकिस्तानी सैन्याचा ताबा, दडपशाही, क्रूरता आणि नैसर्गिक संसाधनांच्या बेकायदेशीर शोषणाविरोधात उघडपणे बंड पुकारत आहे.”

जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग 

“जम्मू-काश्मीर हा भारताचा अभिन्न आणि अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील. जम्मू-काश्मीरमधील लोक भारताच्या लोकशाही परंपरांनुसार आणि संविधानिक चौकटीत राहून आपल्या मूलभूत अधिकारांचा वापर करतात. या संकल्पना पाकिस्तानसाठी परक्या आहेत,” असा टोलाही हरीश यांनी लगावला.

‘वसुधैव कुटुंबकम्’चा उल्लेख

भारताच्या “वसुधैव कुटुंबकम्” या तत्त्वज्ञानाचा उल्लेख करत हरीश म्हणाले की “भारत जगाला एक कुटुंब मानतो आणि सर्वांसाठी न्याय, सन्मान आणि समृद्धीची अपक्षा करतो. ही केवळ आमची विश्वदृष्टी नाही, तर याच कारणामुळे भारत सर्व समाज आणि लोकांसाठी न्याय, सन्मान आणि संधीच्या समर्थनात कायम उभा आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

संयुक्त राष्ट्राच्या प्रासंगिकतेवर प्रश्न

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेत बोलताना भारतीय राजदूतांनी द्वितीय महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रानं केलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितलं की, “आजच्या काळात या संस्थेच्या प्रासंगिकता, वैधता, विश्वसनीयता आणि कार्यक्षमता यांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या चर्चेचा विषय आज अधिक महत्त्वाचा ठरतो, कारण जगातील सर्वात मोठ्या बहुपक्षीय संस्थेला, म्हणजे संयुक्त राष्ट्राला स्वतःच्या प्रासंगिकतेबाबत प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. संस्थेनं वसाहतवादाच्या समाप्तीसाठी काम केले असून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी ती आशेचा किरण ठरली आहे,” असंही ते यावेळी म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's UN Kashmir Gambit Fails; India Mirrors Reality.

Web Summary : India rebuked Pakistan at the UN for raising the Kashmir issue, highlighting human rights violations in Pakistan-occupied Kashmir. India asserted Kashmir's integral status, criticizing Pakistan's undemocratic practices. India also emphasized its commitment to global justice.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघJammu Kashmirजम्मू-काश्मीर