शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:12 IST

India Slams Pakistan in UN : पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा खोटा आरोप केला.

India Slams Pakistan in UN : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानला पुन्हा एकदा जम्मू-काश्मीर विषयावर भारताकडून तोंडघशी पडावं लागलं. पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा खोटा आरोप करताच भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी पी. हरीश यांनी पाकला कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिलं.

पी. हरीश म्हणाले की, “आम्ही पाकिस्तानला आवाहन करतो की, त्यांनी पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यात असलेल्या भागांमध्ये (PoJK) चालू असलेलं मानवी हक्कांचं उल्लंघन तात्काळ थांबवावं. तेथील जनता पाकिस्तानी सैन्याचा ताबा, दडपशाही, क्रूरता आणि नैसर्गिक संसाधनांच्या बेकायदेशीर शोषणाविरोधात उघडपणे बंड पुकारत आहे.”

जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग 

“जम्मू-काश्मीर हा भारताचा अभिन्न आणि अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील. जम्मू-काश्मीरमधील लोक भारताच्या लोकशाही परंपरांनुसार आणि संविधानिक चौकटीत राहून आपल्या मूलभूत अधिकारांचा वापर करतात. या संकल्पना पाकिस्तानसाठी परक्या आहेत,” असा टोलाही हरीश यांनी लगावला.

‘वसुधैव कुटुंबकम्’चा उल्लेख

भारताच्या “वसुधैव कुटुंबकम्” या तत्त्वज्ञानाचा उल्लेख करत हरीश म्हणाले की “भारत जगाला एक कुटुंब मानतो आणि सर्वांसाठी न्याय, सन्मान आणि समृद्धीची अपक्षा करतो. ही केवळ आमची विश्वदृष्टी नाही, तर याच कारणामुळे भारत सर्व समाज आणि लोकांसाठी न्याय, सन्मान आणि संधीच्या समर्थनात कायम उभा आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

संयुक्त राष्ट्राच्या प्रासंगिकतेवर प्रश्न

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेत बोलताना भारतीय राजदूतांनी द्वितीय महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रानं केलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितलं की, “आजच्या काळात या संस्थेच्या प्रासंगिकता, वैधता, विश्वसनीयता आणि कार्यक्षमता यांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या चर्चेचा विषय आज अधिक महत्त्वाचा ठरतो, कारण जगातील सर्वात मोठ्या बहुपक्षीय संस्थेला, म्हणजे संयुक्त राष्ट्राला स्वतःच्या प्रासंगिकतेबाबत प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. संस्थेनं वसाहतवादाच्या समाप्तीसाठी काम केले असून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी ती आशेचा किरण ठरली आहे,” असंही ते यावेळी म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's UN Kashmir Gambit Fails; India Mirrors Reality.

Web Summary : India rebuked Pakistan at the UN for raising the Kashmir issue, highlighting human rights violations in Pakistan-occupied Kashmir. India asserted Kashmir's integral status, criticizing Pakistan's undemocratic practices. India also emphasized its commitment to global justice.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघJammu Kashmirजम्मू-काश्मीर