शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:12 IST

India Slams Pakistan in UN : पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा खोटा आरोप केला.

India Slams Pakistan in UN : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानला पुन्हा एकदा जम्मू-काश्मीर विषयावर भारताकडून तोंडघशी पडावं लागलं. पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा खोटा आरोप करताच भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी पी. हरीश यांनी पाकला कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिलं.

पी. हरीश म्हणाले की, “आम्ही पाकिस्तानला आवाहन करतो की, त्यांनी पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यात असलेल्या भागांमध्ये (PoJK) चालू असलेलं मानवी हक्कांचं उल्लंघन तात्काळ थांबवावं. तेथील जनता पाकिस्तानी सैन्याचा ताबा, दडपशाही, क्रूरता आणि नैसर्गिक संसाधनांच्या बेकायदेशीर शोषणाविरोधात उघडपणे बंड पुकारत आहे.”

जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग 

“जम्मू-काश्मीर हा भारताचा अभिन्न आणि अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील. जम्मू-काश्मीरमधील लोक भारताच्या लोकशाही परंपरांनुसार आणि संविधानिक चौकटीत राहून आपल्या मूलभूत अधिकारांचा वापर करतात. या संकल्पना पाकिस्तानसाठी परक्या आहेत,” असा टोलाही हरीश यांनी लगावला.

‘वसुधैव कुटुंबकम्’चा उल्लेख

भारताच्या “वसुधैव कुटुंबकम्” या तत्त्वज्ञानाचा उल्लेख करत हरीश म्हणाले की “भारत जगाला एक कुटुंब मानतो आणि सर्वांसाठी न्याय, सन्मान आणि समृद्धीची अपक्षा करतो. ही केवळ आमची विश्वदृष्टी नाही, तर याच कारणामुळे भारत सर्व समाज आणि लोकांसाठी न्याय, सन्मान आणि संधीच्या समर्थनात कायम उभा आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

संयुक्त राष्ट्राच्या प्रासंगिकतेवर प्रश्न

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेत बोलताना भारतीय राजदूतांनी द्वितीय महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रानं केलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितलं की, “आजच्या काळात या संस्थेच्या प्रासंगिकता, वैधता, विश्वसनीयता आणि कार्यक्षमता यांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या चर्चेचा विषय आज अधिक महत्त्वाचा ठरतो, कारण जगातील सर्वात मोठ्या बहुपक्षीय संस्थेला, म्हणजे संयुक्त राष्ट्राला स्वतःच्या प्रासंगिकतेबाबत प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. संस्थेनं वसाहतवादाच्या समाप्तीसाठी काम केले असून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी ती आशेचा किरण ठरली आहे,” असंही ते यावेळी म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's UN Kashmir Gambit Fails; India Mirrors Reality.

Web Summary : India rebuked Pakistan at the UN for raising the Kashmir issue, highlighting human rights violations in Pakistan-occupied Kashmir. India asserted Kashmir's integral status, criticizing Pakistan's undemocratic practices. India also emphasized its commitment to global justice.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघJammu Kashmirजम्मू-काश्मीर