शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 08:20 IST

Pahalgam terror attack JD Vance: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असून, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी तणाव निवळवण्याच्या संदर्भाने भूमिका मांडली आहे.

JD Vance News: २६ पर्यटकांनी प्राण गमावलेल्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील सीमेवर तणाव असून, युद्धाच्या चर्चांनाही तोंड फुटले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी भाष्य करताना भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. पण, युद्धाची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी असेही म्हटले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर असतानाच दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली होती. २२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर काश्मीर खोऱ्यातील आणि सीमेवरील सुरक्षा प्रचंड वाढवण्यात आली आहे. सीमेवर गोळीबाराच्या घटना घडत असून, युद्धाच्या चर्चांचेही पेव फुटले आहेत. 

वाचा >>"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी

'युद्ध भडकू देऊ नका'

फॉक्स न्यूजला जेडी व्हान्स यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, 'आम्हाला आशा आहे की, भारत या दहशतवादी हल्ल्याचे उत्तर अशा पद्धतीने देईल की, त्यातून प्रादेशिक युद्ध भडकणार नाही. आम्हाला आशा आहे की, पाकिस्तान, जर यात कुठल्या बाबतीत जबाबदार आहे, तर ते म्हणजे त्याने भारताला दहशतवाद्यांना पकडून देण्यात आणि त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास सहकार्य करण्यासाठी आहे.'

तणाव वाढल्यानंतर व्हान्स यांचं विधान

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांचे हे विधान अशा काळात आले आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष शिगेला गेला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय चौक्यांवर गोळीबार केला जात असून, भारताकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. 

भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या चर्चा सुरू असतानाच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. रुबियो यांनी शरीफ यांच्याशी बोलताना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य करावे आणि तणाव कमी करण्याच्या दिशेने पावले टाकावीत असे सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानIndiaभारतTerror Attackदहशतवादी हल्ला