शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 08:20 IST

Pahalgam terror attack JD Vance: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असून, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी तणाव निवळवण्याच्या संदर्भाने भूमिका मांडली आहे.

JD Vance News: २६ पर्यटकांनी प्राण गमावलेल्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील सीमेवर तणाव असून, युद्धाच्या चर्चांनाही तोंड फुटले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी भाष्य करताना भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. पण, युद्धाची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी असेही म्हटले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर असतानाच दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली होती. २२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर काश्मीर खोऱ्यातील आणि सीमेवरील सुरक्षा प्रचंड वाढवण्यात आली आहे. सीमेवर गोळीबाराच्या घटना घडत असून, युद्धाच्या चर्चांचेही पेव फुटले आहेत. 

वाचा >>"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी

'युद्ध भडकू देऊ नका'

फॉक्स न्यूजला जेडी व्हान्स यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, 'आम्हाला आशा आहे की, भारत या दहशतवादी हल्ल्याचे उत्तर अशा पद्धतीने देईल की, त्यातून प्रादेशिक युद्ध भडकणार नाही. आम्हाला आशा आहे की, पाकिस्तान, जर यात कुठल्या बाबतीत जबाबदार आहे, तर ते म्हणजे त्याने भारताला दहशतवाद्यांना पकडून देण्यात आणि त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास सहकार्य करण्यासाठी आहे.'

तणाव वाढल्यानंतर व्हान्स यांचं विधान

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांचे हे विधान अशा काळात आले आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष शिगेला गेला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय चौक्यांवर गोळीबार केला जात असून, भारताकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. 

भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या चर्चा सुरू असतानाच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. रुबियो यांनी शरीफ यांच्याशी बोलताना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य करावे आणि तणाव कमी करण्याच्या दिशेने पावले टाकावीत असे सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानIndiaभारतTerror Attackदहशतवादी हल्ला