शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
4
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
5
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
6
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
7
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
8
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
9
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
10
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
11
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
12
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
13
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
14
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
16
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
17
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
18
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
19
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
20
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास

'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 08:20 IST

Pahalgam terror attack JD Vance: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असून, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी तणाव निवळवण्याच्या संदर्भाने भूमिका मांडली आहे.

JD Vance News: २६ पर्यटकांनी प्राण गमावलेल्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील सीमेवर तणाव असून, युद्धाच्या चर्चांनाही तोंड फुटले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी भाष्य करताना भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. पण, युद्धाची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी असेही म्हटले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर असतानाच दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली होती. २२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर काश्मीर खोऱ्यातील आणि सीमेवरील सुरक्षा प्रचंड वाढवण्यात आली आहे. सीमेवर गोळीबाराच्या घटना घडत असून, युद्धाच्या चर्चांचेही पेव फुटले आहेत. 

वाचा >>"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी

'युद्ध भडकू देऊ नका'

फॉक्स न्यूजला जेडी व्हान्स यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, 'आम्हाला आशा आहे की, भारत या दहशतवादी हल्ल्याचे उत्तर अशा पद्धतीने देईल की, त्यातून प्रादेशिक युद्ध भडकणार नाही. आम्हाला आशा आहे की, पाकिस्तान, जर यात कुठल्या बाबतीत जबाबदार आहे, तर ते म्हणजे त्याने भारताला दहशतवाद्यांना पकडून देण्यात आणि त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास सहकार्य करण्यासाठी आहे.'

तणाव वाढल्यानंतर व्हान्स यांचं विधान

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांचे हे विधान अशा काळात आले आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष शिगेला गेला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय चौक्यांवर गोळीबार केला जात असून, भारताकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. 

भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या चर्चा सुरू असतानाच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. रुबियो यांनी शरीफ यांच्याशी बोलताना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य करावे आणि तणाव कमी करण्याच्या दिशेने पावले टाकावीत असे सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानIndiaभारतTerror Attackदहशतवादी हल्ला