शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 00:30 IST

भारतीय हवाई दलाचे एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी पाकिस्तानचे पाच फायटर जेट पाडल्याची माहिती दिली. भारतीय लष्कराकडून देण्यात आलेल्या या माहितीनंतर पाकिस्तानने थयथयाट केला. 

पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उडवले. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांवर केलेल्या या प्रहार पाकिस्तानला झोंबला आणि पाक लष्कराने भारतावरच हल्ल्याचे प्रयत्न केले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी लष्कराने हवाई हल्ल्याचे प्रयत्न केले, पण भारताने त्यांचे पाच फायटर पाडले. भारताच्या हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी याची माहिती दिली. या माहितीने पाकिस्तानचा आणखीच थयथयाट झाला असून, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी असं काही झालेच नाही, असं म्हटलं आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांनी केलेल्या विधानानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी फायटर जेट पाडल्याचा दावा फेटाळला. आसिफ म्हणाले, 'पाकिस्तानचे एकही फायटर विमान भारतीय हल्ल्यात पाडले गेले नाही. त्याचबरोबर एकही विमान नष्ट केले गेले. तीन महिन्याच्या कालावधीत भारताकडून असे दावे केले गेले नाही. आम्ही तातडीने आंतरराष्ट्रीय माध्यमांना याची माहिती दिली आहे.'

'भारताने केलेले दावे अविश्वसनीय आणि चुकीच्या वेळी केले गेले आहेत. एलओसीवर भारताचे अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. जर जगाला सत्य सांगायचे असेल, तर दोन्ही देशांनी आपापल्या विमानांची स्वतंत्र खुली चौकशी करावी. त्यातून सत्य समोर येईल', असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ यांनी म्हटले आहे. 

भारताचे एअर चीफ मार्शल काय म्हणाले?  "ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने आणि एक मोठे विमान पाडले. हे मोठे विमान ईएलआयएनटी किंवा एईडब्ल्यूएडीसीचे असू शकते. जमिनीवरून हवेत ३०० किमी अंतरावर लक्ष्य करण्यात आले होते. हा जमिनीवर हवेत करण्यात आलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे', असे भारताचे एअर चीफ मार्शल म्हणाले होते. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान