शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

“तुम्ही पुरावे द्या, आम्ही चौकशी करायला तयार आहोत”; जयशंकर यांनी कॅनडाला स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 10:06 IST

S. Jaishankar News: कॅनडाने केलेल्या आरोपांबाबत आधी पुरावे द्यावेत, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

S. Jaishankar News: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध अद्यापही ताणले गेल्याचे पाहायला मिळत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जरची हत्या भारतीय एजंटने घडवून आणल्याचा मोठा दावा करत भारतावर अनेक आरोप केले आहेत. भारताने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली असून, कॅनडाने केलेले दावे स्पष्ट शब्दांत फेटाळले आहेत. यावरून आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कॅनडाबाबत विधान केले आहे. तुम्ही पुरावे द्या, आम्ही चौकशी करायला तयार आहोत, असे जयशंकर यांनी सांगितले आहे. 

लंडन येथील एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी भारत आणि कॅनडा वादावर भाष्य केले. परराष्ट्र मंत्री एस. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत भारतावर होत असलेल्या आरोपांवर जयशंकर यांनी कॅनडाकडून पुन्हा एकदा पुराव्याची मागणी केली आहे. भारत सरकार निज्जरच्या हत्येची चौकशी करण्याची गरज नाकारत नाही. मात्र, कॅनडाने या हत्येमध्ये भारतीय एजंटांची भूमिका असल्याच्या आरोप केला असून, या दाव्याचे समर्थन देण्यासाठी पुरावे सादर केले पाहिजेत. भारतावर आरोप करताना त्याबाबतचे पुरावेही द्यावेत. आम्ही तपासाला नकार देत नाहीत, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. 

अभिव्यक्ती स्वातंत्र्य काही जबाबदारीसह येते

आम्ही कॅनडाला याबाबत सांगितले आहे. आम्हाला वाटते की, हिंसक मार्गांसह अलिप्ततावादाचे समर्थन करणाऱ्या आणि टोकाच्या राजकीय मतांना कॅनडाच्या राजकारणात स्थान दिले जात आहे. असे लोक कॅनडाच्या राजकारणात आहेत. त्यांना त्यांचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी ते काही जबाबदारीसह येते. अशा स्वातंत्र्याचा गैरवापर आणि राजकीय हेतूने दुरुपयोग केला जात असेल, तर ते सहन करणे अत्यंत चुकीचे ठरेल. तुमच्याकडे असे आरोप करण्याचे कारण असेल तर कृपया पुरावे आमच्यासोबत शेअर करा. आम्ही तपास करण्यास नकार देत नाही. मात्र, त्यांनी तसे काहीही केलेले नाही, असे जयशंकर यांनी ठामपणे सांगितले. 

दरम्यान, आम्ही आंतरराष्ट्रीय कायदा आणि कॅनडाच्या सार्वभौमत्वाच्या या गंभीर उल्लंघनावर कारवाई करण्यासाठी युनायटेड स्टेट्स आणि आमच्या इतर मित्र देशांशी संपर्क साधला. ही गोष्ट आम्ही खूप गांभीर्याने घेत आहोत. कॅनडा हा नेहमीच कायद्याचे पालन करणारा आणि त्यासाठी उभा राहणारा देश आहे. कारण सत्ता योग्य-अयोग्य ठरवू लागली, मोठ्या देशांनी परिणामांची चिंता न करता आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले, तर संपूर्ण जग सर्वांसाठीच अधिक धोकादायक होईल, असे अप्रत्यक्षरित्या ट्रुडो यांनी भारताला सुनावले होते.  

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतCanadaकॅनडा