शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
5
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
6
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
7
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
8
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
9
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
10
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
11
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
12
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
13
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
14
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
15
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
16
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
17
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
18
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
19
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
20
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट

ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 08:44 IST

संयुक्त राष्ट्रच्या सभेत पाकिस्ताननं भारतावर आरोप केल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारलं.

नवी दिल्ली - देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. या देशाने त्यांच्या कर्मामुळे जागतिक व्यवस्थेत मागे राहण्याचा मार्ग निवडला आहे. अनेक देश परिस्थितीमुळे मागे राहतात परंतु काही देश जाणुनबुजून असे निर्णय घेतात ज्याचे परिणाम खूप भयानक असतात अशा शब्दात एस जयशंकर यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.

संयुक्त राष्ट्रे आमसभेत एस जयशंकर बोलत होते, यावेळी ते म्हणाले की, आमच्या शेजारील पाकिस्तान हा यातील प्रमुख उदाहरण आहे. पाकिस्तान नेहमी दुसऱ्याला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतो, तीच स्थिती आज पाकिस्तान गिळंकृत करण्यासाठी तयार आहेत. त्या वाईट गोष्टी त्यांच्याच समाजाचे नुकसान करत आहेत. ते जगाला दोष देऊ शकत नाही. हे फक्त कर्माचे फळ आहे असं त्यांनी खडसावून सांगितले.

तसेच दुर्दैवाने त्यांच्या गैरकृत्यांचा इतरांवर परिणाम होतो, विशेषत: शेजाऱ्यांवर..जेव्हा राजकारणात आपल्या लोकांमध्ये कट्टरता असते तेव्हा त्यांचा जीडीपी केवळ कट्टरपंथ आणि दहशतवादाच्या रुपात मोजला जाऊ शकतो. इतरांच्या जमिनीच्या लालसेपोटी कृत्य करणाऱ्या एका निष्क्रीय राष्ट्राचा पर्दाफाश आणि सामना केला पाहिजे असं भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं.

दरम्यान, जयशंकर यांनी पाकिस्तानला यासाठी सुनावले कारण पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी काश्मीरमधील स्थितीची तुलना फिलिस्तानशी केली. पाकिस्तानचा सीमेपलीकडील दहशतवाद कधीही यशस्वी होणार नाही. त्यांच्या कृत्याचे परिणाम शेजारील देशाला भोगावे लागतील असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला. पाकिस्तानद्वारे अवैधरित्या कब्जा करण्यात आलेलं भारतीय क्षेत्र(POK) रिकामा करून देणे हे आमच्यातील समस्येवर तोडगा आहे असंही भारताने सांगितले.

पाकिस्ताननं काय म्हटलं होतं?

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शुक्रवारी यूएनजीएच्या सभेत त्यांच्या भाषणात जम्मू काश्मीरमधील परिस्थितीची तुलना फिलिस्तानशी केली. ते म्हणाले होते की, लोकांनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वयंनिर्णयाच्या अधिकारासाठी शतकानुशतके संघर्ष केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे प्रस्ताव आणि काश्मीरी लोकांची इच्छा यावर चर्चा होण्याचा आग्रह पाकिस्तानने धरला. भारताने परस्पर सामरिक संयम व्यवस्थेचा पाकिस्तानचा प्रस्ताव नाकारला आहे. भारतीय नेतृत्वाने नियंत्रण रेषा (LOC) ओलांडण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादPOK - pak occupied kashmirपीओके