शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भारत-कॅनडा राजकीय संबंध सुधारले? व्हिसा सेवा सुरू करण्यावर एस. जयशंकर यांचं महत्त्वाचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 10:10 IST

कॅनेडियन नागरिकांसाठी दोन महिन्यांनंतर व्हिसा सेवा पुन्हा सुरू; परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं कारण

India resumes e visa services for Canada : भारतानेकॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे. कॅनडातीलभारतीय उच्चायुक्तांनी बुधवारी घोषणा केली की भारताने पात्र कॅनेडियन नागरिकांसाठी इलेक्ट्रॉनिक व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य समोर आले आहे. जयशंकर म्हणाले की, भारताने व्हिसा जारी करणे तात्पुरते स्थगित केले होते कारण कॅनडातील परिस्थितीमुळे आमच्या राजदूतांना तेथे काम करणे कठीण झाले होते. मात्र, आता परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे आणि सुरक्षित झाली आहे. बुधवारी व्हर्च्युअल G20 लीडर्स समिटच्या समाप्तीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना जयशंकर म्हणाले की, अनेक श्रेणींमध्ये फिजिकल व्हिसा सुरू झाला आहे.

ई-व्हिसाचा G20 बैठकीशी काहीही संबंध नाही...

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, ई-व्हिसाबाबतच्या निर्णयाचा G20 बैठकीशी काहीही संबंध नव्हता. आम्ही व्हिसा जारी करणे तात्पुरते स्थगित केले होते कारण कॅनडातील परिस्थिती भारतीय राजदूतांना काम करण्यायोग्य नव्हती. पण आता व्हिसा प्रक्रियेसाठी आवश्यक काम करणे सोपे झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत थोडीशी सुधारणा झाल्यानंतरच आम्हाला हळूहळू व्हिसा सेवा पुन्हा सुरू करणे शक्य झाले आहे. 

कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी जारी केलेल्या अधिसूचनेत असे नमूद केले आहे की भारतीय ई-व्हिसा सुविधा 22 नोव्हेंबर 2023 पासून नियमित/सामान्य कॅनेडियन पासपोर्ट धारक असलेल्या सर्व पात्र कॅनेडियन नागरिकांसाठी पुनर्स्थापित करण्यात आली आहे. कॅनेडियन पासपोर्टच्या इतर कोणत्याही श्रेणीच्या धारकांनी विद्यमान प्रक्रियेनुसार नियमित पेपर व्हिसासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालयाच्या संबंधित वेबसाइटवर तपशील मिळू शकतात.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या भूमीवर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर भारत आणि कॅनडाचे संबंध तणावपूर्ण झाले. १८ जून रोजी कॅनडातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर निज्जरवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा सेवा भारताकडून बंद करण्यात आली होती.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरCanadaकॅनडाIndiaभारतministerमंत्री