शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 09:44 IST

भारताबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यास इच्छुक

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरमधील दोन जलविद्युत प्रकल्पांसदर्भात हेग येथील आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय भारताने फेटाळला आहे. पाकिस्तानने मात्र या निर्णयाचे स्वागत केले असून सिंधू जल वाटप कराराच्या मुद्यावर भारतासोबत चर्चा करण्यास इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत. भारतासोबतच्या सिंधू जल करारा (आयडब्ल्यूटी) संबंधित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक चर्चा घडवून आणण्यास इच्छुक असल्याचे शनिवारी पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले.

लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप

पाकिस्तानसोबतच्या वादावर तोडगा काढण्यासाठीच्या तथाकथित संरचनेला आम्ही कधीही मान्यता दिली नसल्याचे स्पष्ट करत भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळून लावला आहे.

किशनगंगा व रतेल या दोनही जलविद्युत प्रकल्पांसंदर्भात पाकिस्तानाच्या आक्षेपाबद्दल आंतरराष्ट्रीय लवादाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले. 

जबाबदारीपासून पाकिस्तान काढतोय पळ

आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयाचे स्वागत करणाऱ्या पाकिस्तानला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने लक्ष्य केले आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अनेक दशकांपासून पाकिस्तान फसवणूक करत आला आहे. कथितरीत्या १९६०च्या सिंधू कराराअंतर्गत स्थापन झालेल्या अवैध मध्यस्थी न्यायालयाने याचे उघडपणे उल्लंघन करत जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील किशनगंगा व रतेल जलविद्युत प्रकल्पासंदर्भात पूरक निर्णय दिला आहे.

भारताने कधीही या तथाकथित आंतरराष्ट्रीय लवादाला मान्यता दिली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवसानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेतले. त्यात १९६० चा सिंधू जल वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय सामाविष्ट होता. आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत एक सार्वभौम राष्ट्र म्हणून आपल्या अधिकाराचा निर्णय घेत भारताने हा करार स्थगित केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.

लवादाचा निर्णय काय?

एप्रिलमध्ये सिंधू जल करार रद्द करण्यासंदर्भात भारताने घेतलेला निर्णय हा संबंधित प्रकरणावर निर्णय घेण्याच्या आमच्या अधिकारावर मर्यादा घालू शकत नाही.

या संदर्भात भारताने घेतलेला निर्णय हा सर्व पक्षांसाठी बंधनकारक नसल्याचे आंतरराष्ट्रीय लवादाने स्पष्ट केले होते.

किशनगंगा, रतेल प्रकल्प आराखड्यावर आक्षेप ?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल वाटप करार रद्द केला होता. त्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय लवादाकडे दाद मागितली होती.

पाकिस्तानने आयडब्ल्यूटी अंतर्गत किशनगंगा व रतेल या दोन्ही जलविद्युत प्रकल्पांच्या आराखड्यावर आक्षेप घेतला आहे. मात्र, या संदर्भातील आंतरराष्ट्रीय लवादाच्या कारवाईला कधीही भारताने मान्यता दिली नाही. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान