शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

"हल्ले करणारे मोकाट आणि हक्क मागणाऱ्यांना..."; चिन्मय प्रभूंच्या अटकेवर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:31 IST

बांगलादेशात चिन्मय कृष्ण दास प्रभू यांच्या अटकेवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.

Chinmoy Krishna Das Prabhu :बांगलादेशातील हिंदूंसोबत होणाऱ्या हिंसाचाराला विरोध करणाऱ्या इस्कॉन पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना ढाका येथे अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला आहे. चिन्मय कृष्णा दास यांच्या अटकेने जगभरात खळबळ उडाली आहे. चिन्मय कृष्णा दास यांच्या अटकेचा विरोध करत बांगलादेशमध्ये मोठ्या संख्येने हिंदू रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेवर चिंता व्यक्त केली आहे.

हिंदू समुदायाला मजबूत कायदेशीर संरक्षण आणि अल्पसंख्यांकांना समर्पित मंत्रालयाच्या मागणीसाठी चिन्मय कृष्णा दास यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. यावेळी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करत चिन्मय कृष्णा दास बांगलादेशी पोलिसांनी अटक केली. या अटकेचा विरोध करत बांगलादेशमध्ये मोठ्या संख्येने हिंदू रस्त्यावर उतरले आहेत.  त्यानंतर इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांना या प्रकरणाकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्यामुळे आता चिन्मय प्रभूंच्या अटकेवर भारत सरकारची भूमिका समोर आली आहे. त्यांना जामीन न मिळाल्याने परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.

"बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर अतिरेकी घटकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर ही घटना घडली आहे. तिथे अल्पसंख्याकांची घरे आणि व्यावसायिक संस्थांची जाळपोळ आणि लुटमार तसेच चोरी, देवता आणि मंदिरांची विटंबना असे अनेक गुन्हे दाखल आहेत. पण या घटनांचे गुन्हेगार अजूनही मोकळेपणाने फिरत आहेत, हे दुर्दैवी आहे. दुसरीकडे, शांततापूर्ण सभांद्वारे आपले हक्क मागणाऱ्या धर्मगुरूवर आरोप केले जात आहेत. चिन्मय दास यांच्या अटकेविरोधात आम्ही शांततेने विरोध करत आहोत. यासोबतच अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबतही आम्ही चिंता व्यक्त करतो. हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांना सुरक्षेची खात्री देण्यासाठी आम्ही बांगलादेशच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो. यामध्ये त्यांचे शांततापूर्ण आंदोलन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही समावेश आहे," असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

चिन्मय प्रभूंच्या अटकेच्या निषेधार्थ कट्टरतावाद्यांच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या हिंदूंनी आज मेट्रोपॉलिटन कोर्टात एकत्र येऊन निदर्शने केली. मात्र यावेळी बांगलादेशी पोलिसांकडून हिंदू समाजाच्या लोकांवर अश्रुधुराचे नळकांडे आणि रबराच्या गोळ्या झाडण्यात आल्या.

दरम्यान, बांगलादेशातील न्यायालयाने मंगळवारी चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. कृष्णा दास यांना जामीन न मिळाल्याने त्यांच्या अनुयायांनी न्यायालयाच्या आवारात विरोधी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. बांगलादेश पोलिसांनी सोमवारी दासला ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातून त्यांना अटक केली. कोर्टात हजर केले जात असताना चिन्मय दास यांनी बांगलादेशातील हिंदूंना आंदोलन सुरु ठेवण्यास सांगितले. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशS. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारत