शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

भारत आमच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत; पाकिस्तानला सतावतेय भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 08:06 IST

भारत 'फॉल्स फ्लॅश ऑपरेशन'ची तयारी करत असल्याचा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांचा दावा

ठळक मुद्देभारत आमच्यावर हल्ला करेल; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावाचीनवरील लक्ष हटवण्यासाठी भारत आमच्यावर हल्ला करेल; पाकिस्तानला सतावतेय भीतीभारताकडून 'फॉल्स फ्लॅश ऑपरेशन'ची तयारी सुरू असल्याचा दावा

इस्लामाबाद: चीनसोबतचे संबंध ताणले गेल्यानं भारतानं लडाख सीमेवरील फौजफाटा वाढवला आहे. चीनकडून होणाऱ्या कुरघोड्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सीमावर्ती भागात भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. मात्र पाकिस्तानला वेगळीच भीती सतावत आहे. चीनसोबतच्या सीमावादारून विरोधकांचं लक्ष हटवण्यासाठी भारत आमच्यावर हल्ला करेल, अशी भीती  पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशींनी व्यक्त केली आहे. भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भारतानं नवी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे आदेश नुकतेच दिले. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दोन कर्मचारी हेरगिरी करताना आढळल्यानं भारताकडून हे आदेश देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी 'जियो पाकिस्तान' वृत्तवाहिनीशी संवाद साधला. 'चीनसोबतच्या सीमावादावरून लक्ष हटवून ते पाकिस्तानवर केंद्रीत व्हावं यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत,' असं कुरेशी म्हणाले.भारत पाकिस्तानविरोधात फॉल्स फ्लॅश ऑपरेशन (कारवाई करणाऱ्या देशाची ओळख गुप्त राहील अशा प्रकारची मोहीम) करण्यासाठी संधी शोधत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावा दिला नाही. 'गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. त्यावरून विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहेत आणि सरकारला विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणं अवघड जातं आहे,' असं कुरेशी पुढे म्हणाले.पाकिस्तानवर हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. 'नवी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेले हेरगिरीचे आरोप बिनबुडाचे आहेत. उलट भारताकडूनच त्या कर्मचाऱ्यांना त्रास दिला गेला. त्यांच्या गाड्यांचा पाठलाग करण्यात आला. आम्ही भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना समन्स बजावलं असून त्यांनाही तशीच वागणूक दिली जाईल, असा इशारा दिला आहे,' असं कुरेशी म्हणाले.चर्चेच्या नावाखाली चीननं पुन्हा दिला भारताला दगा; गलवानवर केला दावा‘त्या’ जवानांना लष्करप्रमुख नरवणे यांच्याकडून शाबासकी

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीनIndiaभारत