शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
4
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
5
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
6
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
7
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
8
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
9
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
10
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
11
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
12
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
13
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
14
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
15
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
16
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
17
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
18
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
19
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
20
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

भारत आमच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत; पाकिस्तानला सतावतेय भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 08:06 IST

भारत 'फॉल्स फ्लॅश ऑपरेशन'ची तयारी करत असल्याचा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांचा दावा

ठळक मुद्देभारत आमच्यावर हल्ला करेल; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावाचीनवरील लक्ष हटवण्यासाठी भारत आमच्यावर हल्ला करेल; पाकिस्तानला सतावतेय भीतीभारताकडून 'फॉल्स फ्लॅश ऑपरेशन'ची तयारी सुरू असल्याचा दावा

इस्लामाबाद: चीनसोबतचे संबंध ताणले गेल्यानं भारतानं लडाख सीमेवरील फौजफाटा वाढवला आहे. चीनकडून होणाऱ्या कुरघोड्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सीमावर्ती भागात भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. मात्र पाकिस्तानला वेगळीच भीती सतावत आहे. चीनसोबतच्या सीमावादारून विरोधकांचं लक्ष हटवण्यासाठी भारत आमच्यावर हल्ला करेल, अशी भीती  पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशींनी व्यक्त केली आहे. भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भारतानं नवी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे आदेश नुकतेच दिले. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दोन कर्मचारी हेरगिरी करताना आढळल्यानं भारताकडून हे आदेश देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी 'जियो पाकिस्तान' वृत्तवाहिनीशी संवाद साधला. 'चीनसोबतच्या सीमावादावरून लक्ष हटवून ते पाकिस्तानवर केंद्रीत व्हावं यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत,' असं कुरेशी म्हणाले.भारत पाकिस्तानविरोधात फॉल्स फ्लॅश ऑपरेशन (कारवाई करणाऱ्या देशाची ओळख गुप्त राहील अशा प्रकारची मोहीम) करण्यासाठी संधी शोधत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावा दिला नाही. 'गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. त्यावरून विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहेत आणि सरकारला विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणं अवघड जातं आहे,' असं कुरेशी पुढे म्हणाले.पाकिस्तानवर हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. 'नवी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेले हेरगिरीचे आरोप बिनबुडाचे आहेत. उलट भारताकडूनच त्या कर्मचाऱ्यांना त्रास दिला गेला. त्यांच्या गाड्यांचा पाठलाग करण्यात आला. आम्ही भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना समन्स बजावलं असून त्यांनाही तशीच वागणूक दिली जाईल, असा इशारा दिला आहे,' असं कुरेशी म्हणाले.चर्चेच्या नावाखाली चीननं पुन्हा दिला भारताला दगा; गलवानवर केला दावा‘त्या’ जवानांना लष्करप्रमुख नरवणे यांच्याकडून शाबासकी

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीनIndiaभारत