शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
2
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
3
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
4
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
5
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
6
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
7
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
8
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
9
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
10
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
11
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
12
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
13
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
14
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
15
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
16
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
17
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
18
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
19
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
20
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
Daily Top 2Weekly Top 5

भारत आमच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत; पाकिस्तानला सतावतेय भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 08:06 IST

भारत 'फॉल्स फ्लॅश ऑपरेशन'ची तयारी करत असल्याचा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांचा दावा

ठळक मुद्देभारत आमच्यावर हल्ला करेल; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावाचीनवरील लक्ष हटवण्यासाठी भारत आमच्यावर हल्ला करेल; पाकिस्तानला सतावतेय भीतीभारताकडून 'फॉल्स फ्लॅश ऑपरेशन'ची तयारी सुरू असल्याचा दावा

इस्लामाबाद: चीनसोबतचे संबंध ताणले गेल्यानं भारतानं लडाख सीमेवरील फौजफाटा वाढवला आहे. चीनकडून होणाऱ्या कुरघोड्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सीमावर्ती भागात भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. मात्र पाकिस्तानला वेगळीच भीती सतावत आहे. चीनसोबतच्या सीमावादारून विरोधकांचं लक्ष हटवण्यासाठी भारत आमच्यावर हल्ला करेल, अशी भीती  पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशींनी व्यक्त केली आहे. भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भारतानं नवी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे आदेश नुकतेच दिले. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दोन कर्मचारी हेरगिरी करताना आढळल्यानं भारताकडून हे आदेश देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी 'जियो पाकिस्तान' वृत्तवाहिनीशी संवाद साधला. 'चीनसोबतच्या सीमावादावरून लक्ष हटवून ते पाकिस्तानवर केंद्रीत व्हावं यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत,' असं कुरेशी म्हणाले.भारत पाकिस्तानविरोधात फॉल्स फ्लॅश ऑपरेशन (कारवाई करणाऱ्या देशाची ओळख गुप्त राहील अशा प्रकारची मोहीम) करण्यासाठी संधी शोधत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावा दिला नाही. 'गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. त्यावरून विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहेत आणि सरकारला विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणं अवघड जातं आहे,' असं कुरेशी पुढे म्हणाले.पाकिस्तानवर हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. 'नवी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेले हेरगिरीचे आरोप बिनबुडाचे आहेत. उलट भारताकडूनच त्या कर्मचाऱ्यांना त्रास दिला गेला. त्यांच्या गाड्यांचा पाठलाग करण्यात आला. आम्ही भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना समन्स बजावलं असून त्यांनाही तशीच वागणूक दिली जाईल, असा इशारा दिला आहे,' असं कुरेशी म्हणाले.चर्चेच्या नावाखाली चीननं पुन्हा दिला भारताला दगा; गलवानवर केला दावा‘त्या’ जवानांना लष्करप्रमुख नरवणे यांच्याकडून शाबासकी

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीनIndiaभारत