शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
2
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
3
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
4
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
5
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
6
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
7
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
8
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
9
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
10
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
11
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
12
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
13
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
15
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
16
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
17
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
18
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
19
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
20
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."

India Pakistan War : 'तुम्ही आमचे पाणी थांबवा, आम्ही तुमचा श्वास बंद करणार'; पाकिस्तानी सैन्याने हाफिज सईदची भाषा बोलायला सुरूवात केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 09:40 IST

India Pakistan War : भारताने पाकिस्तानचा सिंधू जल करार स्थगित केला आहे. पाणी पुन्हा सुरू करण्याची मागणी पाकिस्तानकडून होत आहे.

India Pakistan War : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. भारताने पाकिस्तावर अनेक निर्बंध लादले आहे. सिंधू जल करार स्थगित करुन सर्वात आधी भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली.  यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. दरम्यान, आता पाकिस्तानी लष्कराने आता दहशतवाद्यांची भाषा बोलण्यास सुरुवात केली आहे. 

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद याच्या प्रक्षोभक आणि हिंसक वक्तव्यासारखीच भाषा वापरून भारताला उघडपणे धमकी दिली आहे. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्याच्या प्रतिक्रियेत त्यांनी एका कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान केले.

बांगलादेशी सैन्याने डोळे वटारले; मोहम्मद युनूस यांच्या गोटात पळापळ, राजीनामा देण्यास तयार

अहमद शरीफ चौधरी म्हणाले, "जर तुम्ही आमचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचे श्वास बंद करु. हे विधान त्यांनी केले. काही दिवसापूर्वी हे विधान दहशतवादी हाफिज सईदनेही केले होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हायरल होत आहे.

भारत सरकारने २३ एप्रिल या दिवशी सिंधू जल करार स्थगित केला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने हे पाऊल उचलले. यानंतर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करण्यात आले.

दहशतवादाविरोधात कडक पाऊले

१९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेला हा करार दोन्ही देशांमधील सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या वाटपाचे नियंत्रण करतो . तसेच दोन्ही पक्षांनी नियमितपणे पाण्याच्या वापराविषयी माहिती शेअर करणे आवश्यक आहे.

भारताने अनेकवेळा पाकिस्तानला दहशतवादाबाबत सांगितले आहे. दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही असं भारताने पाकिस्तानला  सांगितले आहे. भारताने आता दहशतवादाविरोधात कडक पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर