शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

शाहबाज म्हणे, भारतानेच सीझफायरसाठी फोन केलेला; तुर्की, अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसमोर शेखी मिरविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 09:58 IST

India Pakistan War: शाहबाज शरीफ हे त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ सहकारी आणि लष्करप्रमुखांसह तुर्की, अझरबैजान आणि ताजिकिस्तान या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेले ऑपरेशन सिंदूरपाकिस्तानचे शस्त्रसंधीचे फोन आल्याने स्थगित करण्यात आले आहे. भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ले चढविले होते. परंतू, पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरु केल्याने ते थोपवत भारताने पाकिस्तानचे एअरबेसच उध्वस्त केले होते. यामुळे पाकिस्तानने शस्त्रसंधी करण्यासाठी भारताला दोनवेळा फोन केले होते. हे वास्तव असताना पाकिस्तानी पंतप्रधान तुर्की आणि अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भारतानेच शस्त्रसंधीसाठी फोन केल्याची शेखी मिरवत आहेत. 

शाहबाज शरीफ हे त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ सहकारी आणि लष्करप्रमुखांसह तुर्की, अझरबैजान आणि ताजिकिस्तान या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान आणि अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलीयेव त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्यांसह इतर उपस्थित होते. तेव्हा शाहबाज भाषण देण्यासाठी उठले. तसेच पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर यांची ओळख करून देण्यासाठी त्यांना उभे राहण्यास सांगितले. यावेळी शाहबाज यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरवेळी काय घडले, ते खोटेनाटे रंगवून सांगितले. 

९ आणि १० मे च्या रात्री आम्ही भारताला योग्य प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला होता. पहाटे ४.३० वाजता फजरच्या नमाजानंतर मुनीर यांच्या नेतृत्वात पाकिस्तानी सैन्य अतिशय सक्षमपणे हल्ला करेल, असा तो निर्णय होता. परंतू नमाजानंतर पाकिस्तानी सैन्याने हल्ला करण्यापूर्वीच भारताने हल्ला केला. भारताने पुन्हा ब्रह्मोस क्षेपणास्त्राने अनेक राज्यांमध्ये हल्ला केला. यामध्ये रावळपिंडी विमानतळ आणि इतर ठिकाणांचा समावेश आहे. आमचे फील्ड मार्शल जे पहिल्या रांगेत बसले आहेत, मुनीर जरा उभे रहा, तुमची ओळख करून देतो, असे शाहबाज म्हणाले. 

यानंतर शाहबाज यांनी मुनीर यांचे गुण गायले. यावर तुर्की आणि अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांनी टाळ्या वाजविल्या. शाहबाज म्हणाले की, मुनीर यांनी मला तेव्हा फोन केला आणि भारताच्या हल्ल्याबाबत सांगितले. सकाळी ९ वाजता परत फोन केला आणि भारताने शस्त्रसंधीसाठी विचारले असल्याचे म्हटले. पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर हल्ले केले होते, त्यांनी आमच्या नागरी वस्तीवर हल्ले केले, हाच त्यांच्यात आणि आमच्यात फरक असल्याचे शाहबाज म्हणाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान