शहरं
Join us  
Trending Stories
1
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
2
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
3
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
4
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
6
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
7
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
8
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
9
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
10
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
11
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
12
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
13
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
14
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
15
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
16
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
17
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
18
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
19
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
20
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?

...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ५ टॉप दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 14:16 IST

लश्कर ए तोयबाचे मुख्यालय पाकिस्तानच्या पंजाब इथल्या मुरीदके येथे आहे. लाहोरपासून ३० किमी अंतरावर हे ठिकाण असून तिथे भारताने टार्गेट हल्ला केला

नवी दिल्ली-  जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे फिरायला आलेल्या पर्यटकांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट पसरली. हल्ल्यातील कुठल्याही दहशतवादाला सोडणार नाही अशी प्रतिज्ञाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यानंतर १५ दिवसांनी ७ मे रोजी भारतानेपाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यातच ५ मोठ्या दहशतवाद्यांच्या खात्म्यामुळे पाकिस्तान बिथरला असल्याचे दिसून येते. भारताने केलेल्या हल्ल्यात पाकचे ५ मोठे दहशतवादी ठार झाले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोण आहेत हे ५ टॉप दहशतवादी?

१) मुदस्सर खादियान खास उर्फ ​​मुदस्सर उर्फ ​​अबू जुंदाल - हा लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी असून त्याची अंत्ययात्रा एका सरकारी शाळेत झाली, त्याचे नेतृत्व जागतिक दहशतवादी असलेला जमात-ए-उद-दावाचा हाफिज अब्दुल रौफ याने केले. पाक लष्कराचे लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे आयजी त्याच्या अंत्ययात्रेत उपस्थित होते.

२) हाफिज मुहम्मद जमील - हा दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असून तो मौलाना मसूद अझहरचा मोठा मेहुणा होता.

३) मोहम्मद युसूफ अझहर उर्फ ​​उस्ताद जी उर्फ ​​मोहम्मद सलीम उर्फ ​​घोसी साहब - हा देखील दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. तो मौलाना मसूद अझहरचा दुसरा मेहुणा होता. तो आयसी-८१४ अपहरण प्रकरणात फरार होता.

४) खालिद उर्फ ​​अबू आकाशा - हा दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होता. तो जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता आणि अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रांची तस्करी करत होता. त्याचे अंत्यसंस्कार फैसलाबादमध्ये झाले आणि त्यात वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकारी, फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते.

५) मोहम्मद हसन खान - हा दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. तो पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील जैशचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी याचा मुलगा होता. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचे समन्वय साधण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

भारताचा हल्ला, दहशतवादी बिळातून बाहेर पडले

लश्कर ए तोयबाचे मुख्यालय पाकिस्तानच्या पंजाब इथल्या मुरीदके येथे आहे. लाहोरपासून ३० किमी अंतरावर हे ठिकाण असून तिथे भारताने टार्गेट हल्ला केला. ही तीच दहशतवादी संघटना आहे जिने २००८ साली मुंबईत दहशतवादी हल्ला घडवला होता. संयुक्त राष्ट्रासह अनेक देशांनी लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेवर बंदी आणली आहे. भारताविरोधात अनेक दहशतवादी कट रचण्याचं काम या संघटनेने केले आहे. परंतु यावेळी भारतीय सैन्याने त्याचे मुख्यालयच उडवून टाकले. भारताच्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरच्या कुटुंबातील १० जणांचा खात्मा झाला. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाterroristदहशतवादी