शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 14:24 IST

लश्कर ए तोयबाचे मुख्यालय पाकिस्तानच्या पंजाब इथल्या मुरीदके येथे आहे. लाहोरपासून ३० किमी अंतरावर हे ठिकाण असून तिथे भारताने टार्गेट हल्ला केला

नवी दिल्ली-  जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे फिरायला आलेल्या पर्यटकांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट पसरली. हल्ल्यातील कुठल्याही दहशतवादाला सोडणार नाही अशी प्रतिज्ञाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यानंतर १५ दिवसांनी ७ मे रोजी भारतानेपाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यातच ५ मोठ्या दहशतवाद्यांच्या खात्म्यामुळे पाकिस्तान बिथरला असल्याचे दिसून येते. भारताने केलेल्या हल्ल्यात पाकचे ५ मोठे दहशतवादी ठार झाले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोण आहेत हे ५ टॉप दहशतवादी?

१) मुदस्सर खादियान खास उर्फ ​​मुदस्सर उर्फ ​​अबू जुंदाल - हा लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी असून त्याची अंत्ययात्रा एका सरकारी शाळेत झाली, त्याचे नेतृत्व जागतिक दहशतवादी असलेला जमात-ए-उद-दावाचा हाफिज अब्दुल रौफ याने केले. पाक लष्कराचे लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे आयजी त्याच्या अंत्ययात्रेत उपस्थित होते.

२) हाफिज मुहम्मद जमील - हा दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असून तो मौलाना मसूद अझहरचा मोठा मेहुणा होता.

३) मोहम्मद युसूफ अझहर उर्फ ​​उस्ताद जी उर्फ ​​मोहम्मद सलीम उर्फ ​​घोसी साहब - हा देखील दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. तो मौलाना मसूद अझहरचा दुसरा मेहुणा होता. तो आयसी-८१४ अपहरण प्रकरणात फरार होता.

४) खालिद उर्फ ​​अबू आकाशा - हा दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होता. तो जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता आणि अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रांची तस्करी करत होता. त्याचे अंत्यसंस्कार फैसलाबादमध्ये झाले आणि त्यात वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकारी, फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते.

५) मोहम्मद हसन खान - हा दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. तो पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील जैशचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी याचा मुलगा होता. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचे समन्वय साधण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

भारताचा हल्ला, दहशतवादी बिळातून बाहेर पडले

लश्कर ए तोयबाचे मुख्यालय पाकिस्तानच्या पंजाब इथल्या मुरीदके येथे आहे. लाहोरपासून ३० किमी अंतरावर हे ठिकाण असून तिथे भारताने टार्गेट हल्ला केला. ही तीच दहशतवादी संघटना आहे जिने २००८ साली मुंबईत दहशतवादी हल्ला घडवला होता. संयुक्त राष्ट्रासह अनेक देशांनी लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेवर बंदी आणली आहे. भारताविरोधात अनेक दहशतवादी कट रचण्याचं काम या संघटनेने केले आहे. परंतु यावेळी भारतीय सैन्याने त्याचे मुख्यालयच उडवून टाकले. भारताच्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरच्या कुटुंबातील १० जणांचा खात्मा झाला. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाterroristदहशतवादी