शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 12:13 IST

Indian Pakistan Latest Update: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. दहशतवाद्यांचे अड्डे उडवल्यामुळे वेडापिसा झालेल्या पाकिस्तानने भारतातील लष्करी तळ आणि गावांवर निष्फळ हल्ले केले. ९ आणि १० मेच्या रात्री हा लष्करी संघर्ष आणखी विकोपाला गेला. 

India Pakistan Update in Marathi: ८ आणि ९ मेच्या रात्री पाकिस्तानने ड्रोन्स आणि मिसाईल्स डागल्या. त्यांचा भारताने हवेतच उद्ध्वस्त केल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला. त्यानंतर ९ आणि १० मेच्या रात्री पाकिस्तानकडून हायस्पीड मिसाईल हल्ले करण्यात आले. या मिसाईल्स फुसका बार ठरल्या. भारतीय लष्कराने हवेतच या मिसाईलच्या चिंधड्या केल्या. याबद्दल माहिती भारतीय लष्कर आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'पाकिस्तानने सीमेवर फक्त गोळीबारच केला नाही. तर कुपवाडा, पुंछ, राजौरीमध्ये कमी तीव्रतेचे हल्ले करण्यात आले. हे हल्ले भारतीय लष्कराने परतवून लावले. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांना भारतीय लष्कराने जशास तसे उत्तर दिले आहे', अशी माहिती भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली. 

वाचा >>पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 

पाकिस्तानकडून हायस्पीड मिसाईल हल्लेही करण्यात आले, पण भारताने मिसाईल हवेतच निष्क्रिय केला, असेही त्यांनी सांगितले.  

भारतावर हल्ला करण्यासाठी कशाचा वापर?

पाकिस्तान लष्कराने पश्चिम सीमेवर आक्रमक हल्ले केले. यात ड्रोन्स, दूरवर मारा करणारे अस्त्र, लढाऊ विमाने यांचाही वापर करण्यात आला. पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या ठिकाणांना लक्ष्य केले. नियंत्रण रेषेवरही ड्रोन्स घुसखोरी आणि उखळी तोफांनी हल्ले केले, असे कर्नल कुरैशी यांनी सांगितले.

 

आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवरून २६ पेक्षा अधिक ठिकाणी घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले गेले. भारतीय लष्कराने यशस्वीपणे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले. उधमपूर, पठाणकोट, आदमपूर, पुंछ, भठिंडा या हवाई दलाच्या तळावर हल्ले केले, अशी माहिती कर्नल कुरैशी यांनी दिली. 

पाकिस्तानने डागली हायस्पीड मिसाईल

कर्नल कुरैशी यांनी सांगितले की, "पाकिस्तानने एक हायस्पीड मिसाईल सकाळी (१० मे) १.४० वाजता डागली. ही मिसाईल पंजाबमधील हवाई दलाच्या तळावर सोडण्यात आली होती. ही मिसाईल निष्क्रिय करण्यात आली. पाकिस्तानने श्रीनगर, अवंतीपूर, उधमपूर येथील, हवाई दलाच्या तळांवर, रुग्णालय आणि शाळेवर हल्ला केला. पाकिस्तानकडून हे जाणीवपूर्वक करण्यात आले." 

भारताने पाकिस्तान कुठे केले हल्ले?

"भारतीय लष्करानेही पाकिस्तानच्या हल्ल्यांना तत्काळ आणि नियोजन पद्धतीने प्रत्युत्तर दिले. तांत्रिक तळ, कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर, रडार साईट्स आणि शस्त्र भंडारावर हल्ले केले. रफिकी, मुरीद, चक्रला, रहेमिया खान, जुन्निया या पाकिस्तान लष्कराच्या ठिकाणांवर हवाई अस्त्र आणि लढाऊ विमानांतून प्रहार करण्यात आला", अशी माहिती कुरैशी यांनी दिली.   

"पसूरमधील रडार ठिकाण, सियालकोटच्या हवाई दलाच्या तळावरही हल्ला करण्यात आला. या कारवाई दरम्यान, भारताने नागरिक ठिकाणांचं नुकसान कमीत कमी होईल याची काळजी घेतली", असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान