शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 10:56 IST

संसदेच्या या विशेष अधिवेशनात सर्व पक्षांचे नेते सहभागी होतील. त्यात इमरान खान यांच्या PTI पक्षाची भूमिका काय असेल हे पाहणे गरजेचे आहे.

कराची - पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानात दहशत पसरली आहे. भारतपाकिस्तानवर कधीही हल्ला करू शकते असा दावा तिथले मंत्री, नेते करत आहेत. भारत-पाकिस्तान तणावामुळे पाकिस्तानी राष्ट्रपती यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. सोमवारी ५ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता इस्लामाबाद येथे संसद भवनात विशेष अधिवेशन होणार आहे. पाकिस्तानी राष्ट्रपतींनी त्याचं नोटिफिकेशन जारी केले आहे.

पाकिस्तानी राष्ट्रपतींनी जारी केलेल्या नोटिशीत म्हटलंय की, इस्लामिक रिपब्लिकन ऑफ पाकिस्तानच्या संविधानानुसार कलम ५४ अंतर्गत विशेषाधिकाराचा वापर करून राष्ट्रपतींनी संसद भवन, इस्लामाबाद इथं ५ मे २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता विशेष बैठक बोलावली आहे. संसदेच्या या विशेष अधिवेशनात सर्व पक्षांचे नेते सहभागी होतील. त्यात इमरान खान यांच्या PTI पक्षाची भूमिका काय असेल हे पाहणे गरजेचे आहे. पीटीआय पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या भूमिकेचे समर्थन करणार की नाही हे अधिवेशनात कळेल. इमरान खान यांनी जेलमधून निवेदन जारी करत भारताविरोधात ते सरकारला समर्थन देतील असं सांगितले आहे. 

POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले

पाकिस्तानात कधी बोलावली जाते संसदेची विशेष बैठक?

पाकिस्तानात आपत्कालीन बैठक अशावेळी बोलावली जाते जेव्हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असेल. राष्ट्रपतींनी बोलावलेल्या संसदेच्या या विशेष बैठकीला सर्वपक्षीय नेते, सुरक्षा तज्त्र आणि मंत्रिमंडळ उपस्थित असते. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे विशेषत: सध्याच्या परिस्थितीवर आढावा घेतला जाऊ शकतो. पाकिस्तानी संसदेत भारतासोबतच्या तणावावर चर्चा केली जाईल. त्याशिवाय सैन्य आणि राजनैतिक नीतीवर विचारविनिमय होईल. 

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पाऊल उचलत पाकिस्तानशी सर्व चर्चा बंद केली आहे. भारताने सिंधु जल कराराला स्थगिती देऊन मोठी कारवाई केली आहे. सिंधु जल कराराच्या स्थगितीमुळे पाकिस्तानात थयथयाट माजला आहे. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून त्यांना भारतातून परत पाठवले जात आहे. त्यातच पाकिस्तानी नेते सातत्याने भारताला पोकळ धमकी देत आहेत. बिलावल भुट्टोने तर सिंधु नदीच्या पाण्याऐवजी रक्त वाहण्याची भाषा केली आहे. पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर सातत्याने बैठका घेत आहेत. सीमा भागात सायरन वाजवला जात आहे. सातत्याने मिसाईल चाचणी केली जात आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला