शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 10:56 IST

संसदेच्या या विशेष अधिवेशनात सर्व पक्षांचे नेते सहभागी होतील. त्यात इमरान खान यांच्या PTI पक्षाची भूमिका काय असेल हे पाहणे गरजेचे आहे.

कराची - पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानात दहशत पसरली आहे. भारतपाकिस्तानवर कधीही हल्ला करू शकते असा दावा तिथले मंत्री, नेते करत आहेत. भारत-पाकिस्तान तणावामुळे पाकिस्तानी राष्ट्रपती यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. सोमवारी ५ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता इस्लामाबाद येथे संसद भवनात विशेष अधिवेशन होणार आहे. पाकिस्तानी राष्ट्रपतींनी त्याचं नोटिफिकेशन जारी केले आहे.

पाकिस्तानी राष्ट्रपतींनी जारी केलेल्या नोटिशीत म्हटलंय की, इस्लामिक रिपब्लिकन ऑफ पाकिस्तानच्या संविधानानुसार कलम ५४ अंतर्गत विशेषाधिकाराचा वापर करून राष्ट्रपतींनी संसद भवन, इस्लामाबाद इथं ५ मे २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता विशेष बैठक बोलावली आहे. संसदेच्या या विशेष अधिवेशनात सर्व पक्षांचे नेते सहभागी होतील. त्यात इमरान खान यांच्या PTI पक्षाची भूमिका काय असेल हे पाहणे गरजेचे आहे. पीटीआय पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या भूमिकेचे समर्थन करणार की नाही हे अधिवेशनात कळेल. इमरान खान यांनी जेलमधून निवेदन जारी करत भारताविरोधात ते सरकारला समर्थन देतील असं सांगितले आहे. 

POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले

पाकिस्तानात कधी बोलावली जाते संसदेची विशेष बैठक?

पाकिस्तानात आपत्कालीन बैठक अशावेळी बोलावली जाते जेव्हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असेल. राष्ट्रपतींनी बोलावलेल्या संसदेच्या या विशेष बैठकीला सर्वपक्षीय नेते, सुरक्षा तज्त्र आणि मंत्रिमंडळ उपस्थित असते. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे विशेषत: सध्याच्या परिस्थितीवर आढावा घेतला जाऊ शकतो. पाकिस्तानी संसदेत भारतासोबतच्या तणावावर चर्चा केली जाईल. त्याशिवाय सैन्य आणि राजनैतिक नीतीवर विचारविनिमय होईल. 

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पाऊल उचलत पाकिस्तानशी सर्व चर्चा बंद केली आहे. भारताने सिंधु जल कराराला स्थगिती देऊन मोठी कारवाई केली आहे. सिंधु जल कराराच्या स्थगितीमुळे पाकिस्तानात थयथयाट माजला आहे. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून त्यांना भारतातून परत पाठवले जात आहे. त्यातच पाकिस्तानी नेते सातत्याने भारताला पोकळ धमकी देत आहेत. बिलावल भुट्टोने तर सिंधु नदीच्या पाण्याऐवजी रक्त वाहण्याची भाषा केली आहे. पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर सातत्याने बैठका घेत आहेत. सीमा भागात सायरन वाजवला जात आहे. सातत्याने मिसाईल चाचणी केली जात आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला