शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

'पाण्याचा शस्त्राप्रमाणे वापर...', शाहबाज शरीफ बरळले, सिंधू पाणी कराराची गाझाशी केली तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:44 IST

India-Pakistan : ऑपरेशन सिंधूनंतर पाकिस्तान सातत्याने भारतावर निराधार आरोप करत सुटला आहे.

India-Pakistan : पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला. याविरोधात पाकिस्तान सातत्याने बोंब मारत असून, विविध देशांकडे मदत मागत आहेत. अशातच, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी थेट गाझा संकटाची तुलना सिंधू पाणी करारासोबत केली. 

वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, ताजिकिस्तानमध्ये बोलताना शहबाज शरीफ यांनी गाझा संकटाचा उल्लेख केला आणि म्हटले की, आज जग गाझामध्ये पारंपारिक शस्त्रांच्या वापरामुळे झालेल्या जखमा पाहत आहे. ते पुरेसे नव्हते की, आता आपण पाण्याचा शस्त्राप्रमाणे वापर झाल्याचे पाहत आहोत.भारत पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करत आहे. परंतु पाकिस्तान भारताला सिंधू पाणी करारावरील लाल रेषा ओलांडू देणार नाही. 

अझरबैजानमध्ये भारताच्या प्रत्युत्तर हल्ल्यात जखमी झाल्याची कबुली देणारे शाहबाज शरीफ सध्या ताजिकिस्तानमध्ये आहेत. 29 ते 31 मे दरम्यान ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे हिमनदी संवर्धनावरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जात आहे. शहबाज शरीफ यांनी पर्यावरण संवर्धनाच्या या मुद्द्याला त्यांच्या देशाच्या दहशतवाद-प्रायोजित परराष्ट्र धोरणाशी जोडले आहे. परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान शाहबाज म्हणाले, सिंधू खोऱ्यातील पाण्याच्या वाटपाचे नियमन करणारा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा भारताचा एकतर्फी आणि बेकायदेशीर निर्णय अत्यंत खेदजनक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, संकुचित राजकीय फायद्यासाठी लाखो लोकांचे जीवन ओलिस ठेवू नये. पाकिस्तान हे होऊ देणार नाही. विशेष म्हणजे, शहबाज यांनी या कार्यक्रमात पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर चकार शब्द काढला नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला पंतप्रधान शरीफ आणि त्यांचे शिष्टमंडळ, ज्यामध्ये लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांचाही समावेश होता, त्यांनी तुर्की, इराण आणि अझरबैजानचा दौरा केला होता. येथेही शाहबाज यांनी दहशतवादाबाबत पाकिस्तानच्या भूमिकेवर एक शब्दही न काढता फक्त भारतावर निराधार आरोप केले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारत