शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:46 IST

पाकिस्तानच्या लाहोर आणि रावलपिंडी येथे पाकिस्तानी सैन्यातील जखमी जवानांना भेटण्यासाठी तिथले लष्कर प्रमुख असीम मुनीर हॉस्पिटलला पोहचले होते.

इस्लामाबाद - पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधातऑपरेशन सिंदूर हाती घेतले. यात भारताने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत पाकचे ११ सैन्य अधिकारी मारले गेलेत तर ७८ हून अधिक जखमी आहेत. भारतासोबतच्या संघर्षात पाकचा विजय झाला असा खोटा दावा करणाऱ्या पाकिस्ताननं तिथले वास्तव कबूल केले आहे. पाकिस्तानने ११ सैन्य अधिकारी मारले गेल्याची कबुली दिली आहे. भारताच्या हल्ल्यात सैन्याच्या ११ अधिकाऱ्यांसह ४० जण मारले गेलेत. त्याशिवाय १२१ जखमी झालेत. पाकिस्तानी लष्कराचे ६ जवान आणि एअरफोर्सचे ५ जवान ठार झाल्याचं पाकिस्तानने मान्य केले आहे.

पाकिस्तानी सरकारी माध्यमाकडून प्रसारित केलेल्या बातमीत, पाकिस्तानातील सैन्य जवान नायक अब्दुल रहमान, लान्स नायक दिलावर खान, लान्स नायक इकरामुल्लाह, नायक वकार खालिद, शिपाई मोहम्मद अदील अकबर, निसार यांचा समावेश आहे. पाकिस्तानी हवाई दलातील स्क्वाड्रन लीडर उस्मान युसूफ, मुख्य टेक्निशियन औरंगजेब, सीनियर टेक्निशियन नजीब, कॉर्पोरल टेक्निशियन फारूख आणि मुबाशिर यांचा मृत्यू झाला आहे. 

जखमी जवानांना भेटण्यासाठी लष्कर प्रमुख मुनीर पोहचले

पाकिस्तानच्या लाहोर आणि रावलपिंडी येथे पाकिस्तानी सैन्यातील जखमी जवानांना भेटण्यासाठी तिथले लष्कर प्रमुख असीम मुनीर हॉस्पिटलला पोहचले होते. मुनीर यांनी जवानांच्या तब्येतीची विचारपूस केली. पाकिस्तानच्या हॉस्पिटलमध्ये अनेक जवान जखमी अवस्थेत उपचार घेत असल्याचे फोटो समोर आलेत. त्यामुळे भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे कितपत नुकसान झाले हे दिसून येते. 

१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. त्यात १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे पुढे आले. पाकिस्तानी सैन्याने गार्ड ऑफ ऑनर देत तिथल्या ७ अंत्यसंस्काराला बड्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. त्यामुळे भारताच्या हल्ल्यामुळे मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे चित्र जगासमोर आले. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती. अनेक महिलांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतीला, वडिलांना, मुलांना मारण्यात आले होते. महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसणाऱ्या या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर