शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:46 IST

पाकिस्तानच्या लाहोर आणि रावलपिंडी येथे पाकिस्तानी सैन्यातील जखमी जवानांना भेटण्यासाठी तिथले लष्कर प्रमुख असीम मुनीर हॉस्पिटलला पोहचले होते.

इस्लामाबाद - पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधातऑपरेशन सिंदूर हाती घेतले. यात भारताने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत पाकचे ११ सैन्य अधिकारी मारले गेलेत तर ७८ हून अधिक जखमी आहेत. भारतासोबतच्या संघर्षात पाकचा विजय झाला असा खोटा दावा करणाऱ्या पाकिस्ताननं तिथले वास्तव कबूल केले आहे. पाकिस्तानने ११ सैन्य अधिकारी मारले गेल्याची कबुली दिली आहे. भारताच्या हल्ल्यात सैन्याच्या ११ अधिकाऱ्यांसह ४० जण मारले गेलेत. त्याशिवाय १२१ जखमी झालेत. पाकिस्तानी लष्कराचे ६ जवान आणि एअरफोर्सचे ५ जवान ठार झाल्याचं पाकिस्तानने मान्य केले आहे.

पाकिस्तानी सरकारी माध्यमाकडून प्रसारित केलेल्या बातमीत, पाकिस्तानातील सैन्य जवान नायक अब्दुल रहमान, लान्स नायक दिलावर खान, लान्स नायक इकरामुल्लाह, नायक वकार खालिद, शिपाई मोहम्मद अदील अकबर, निसार यांचा समावेश आहे. पाकिस्तानी हवाई दलातील स्क्वाड्रन लीडर उस्मान युसूफ, मुख्य टेक्निशियन औरंगजेब, सीनियर टेक्निशियन नजीब, कॉर्पोरल टेक्निशियन फारूख आणि मुबाशिर यांचा मृत्यू झाला आहे. 

जखमी जवानांना भेटण्यासाठी लष्कर प्रमुख मुनीर पोहचले

पाकिस्तानच्या लाहोर आणि रावलपिंडी येथे पाकिस्तानी सैन्यातील जखमी जवानांना भेटण्यासाठी तिथले लष्कर प्रमुख असीम मुनीर हॉस्पिटलला पोहचले होते. मुनीर यांनी जवानांच्या तब्येतीची विचारपूस केली. पाकिस्तानच्या हॉस्पिटलमध्ये अनेक जवान जखमी अवस्थेत उपचार घेत असल्याचे फोटो समोर आलेत. त्यामुळे भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे कितपत नुकसान झाले हे दिसून येते. 

१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. त्यात १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे पुढे आले. पाकिस्तानी सैन्याने गार्ड ऑफ ऑनर देत तिथल्या ७ अंत्यसंस्काराला बड्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. त्यामुळे भारताच्या हल्ल्यामुळे मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे चित्र जगासमोर आले. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती. अनेक महिलांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतीला, वडिलांना, मुलांना मारण्यात आले होते. महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसणाऱ्या या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर