शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:22 IST

या दोन्ही देशांमध्ये स्वातंत्र्यानंतर एकमेकांचे समर्थन केले आहे. सायप्रसने भारताच्या अणुचाचणी आणि काश्मीरसारख्या मुद्द्यावर नेहमी भारताची बाजू घेतली आहे.

नवी दिल्ली - २ प्राचीन सभ्यता असणारे देश भारत आणि सायप्रस भलेही भौगोलिकदृष्ट्या दूर असतील परंतु त्यांच्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध कित्येक दशकापासून आहेत. याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रस दौऱ्यावर जाणार आहेत. २३ वर्षानंतर पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान सायप्रसचा दौरा करत आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यातील मैत्री जुनी असली तरी या दौऱ्यातून भारत नवा डाव टाकणार आहे. विशेष म्हणजे तुर्की आणि पाकिस्तानसाठी हा संदेश आहे जे भारताच्या एकजुटतेविरोधात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

माहितीनुसार, भारत-सायप्रस यांच्यातील संबंध प्राचीन काळापासून आहेत. सायप्रस भूमध्य सागरातील एका छोट्या बेटावरील देश आहे. ज्याच्यासोबत व्यापार आणि सांस्कृतिक अदान प्रदान कायम केले जात होते. प्राचीन काळात भारतीय व्यापारी, बौद्ध मिशनरी भूमध्य सागरीय असलेल्या या भागात सक्रीय होते ज्यातून सांस्कृतिक आणि धार्मिक देवाणघेवाण करण्यात आली. आधुनिक काळात भारत आणि सायप्रस यांच्यात १९६० साली राजनैतिक संबंध तयार झाले जेव्हा सायप्रसला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. 

या दोन्ही देशांमध्ये स्वातंत्र्यानंतर एकमेकांचे समर्थन केले आहे. सायप्रसने भारताच्या अणुचाचणी आणि काश्मीरसारख्या मुद्द्यावर नेहमी भारताची बाजू घेतली आहे. दुसरीकडे भारताने संयुक्त राष्ट्र प्रस्ताव, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सायप्रसच्या प्रादेशिक अखंडतेचे समर्थन केले आहे. १९७४ साली तुर्कीने सायप्रसवर आक्रमण करून बळजबरीने उत्तर सायप्रसवर कब्जा केला होता. त्याला तुर्की गणराज्य उत्तरी सायप्रस घोषित करण्यात आले, त्याला केवळ तुर्कीनेच मान्यता दिली आहे. १९७४, १९८३, १९८४ च्या UNSC प्रस्तावात तुर्कीला सायप्रसमधून त्यांचे सैन्य मागे घेण्यास सांगत TRNC च्या स्थापनेला बेकायदेशीर असल्याचे म्हटले. भारताने सायप्रसचे समर्थन केले होते. पाकिस्तान एकमेव देश होता, ज्यांनी १९८३-८४ च्या UNSC प्रस्तावात सायप्रसविरोधात मतदान केले. 

भारतासाठी सायप्रस का महत्त्वाचा?

सायप्रसची लोकसंख्या जवळपास १० लाख इतकी आहे तरीही हा देश अनेक कारणास्तव भारतासाठी महत्त्वाचा आहे. सायप्रस पूर्व भूमध्य सागरातील एका रणनीतीदृष्टीने महत्त्वाच्या स्थानावर आहे. जे युरोप, आशिया आणि आफ्रिका यांना जोडते. या क्षेत्रात ऊर्जा संसाधने, प्राकृतिक गॅससाठी महत्त्वाचे आहे. भारत ऊर्जा गरजांसाठी आयातीवर निर्भर आहे त्यामुळे सायप्रससोबत ऊर्जा सहकार्यावर भर देऊ शकतो. त्याशिवाय सायप्रस युरोपीय संघाचा सदस्य आहे आणि २०२६ मध्ये EU कौन्सिलचे अध्यक्षपद स्वीकारेल. भारत युरोपीय संघासोबत व्यापार आणि राजनैतिक संबंध मजबूत करत आहे. सायप्रसच्या माध्यमातून भारताला युरोपशी चांगले संबंध बनवता येतील. भारत आणि सायप्रस यांच्यात संरक्षण आणि दहशतवादविरोधी सहकार्य वाढवण्यावर चर्चा होईल. सायप्रस दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेचे समर्थन करते. दोन्ही देश सागरी आणि सायबर सुरक्षेवर सहकार्य करण्याची शक्यता आहे. 

सायप्रस आणि तुर्की यांच्यात १९७४ साली संघर्ष झाला होता. त्यात सायप्रसच्या उत्तरेकडील भागावर तुर्कीने कब्जा केला. भारत, सायप्रस आणि ग्रीससोबत त्रिपक्षीय सहकार्याच्या भूमिकेमुळे तुर्कीचा या क्षेत्रावरील प्रभाव संतुलित करता येऊ शकतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि प्रथम सायप्रस राष्ट्रपती आर्कबिशप मकारियोस यांच्यापासून दोन्ही देशातील संबंध मजबूत होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५-१७ जूनला सायप्रस दौऱ्यावर जात आहेत. हा दौरा केवळ भारत-सायप्रस यांच्या संबंधांना मजबूत करणार नाही तर तुर्की आणि पाकिस्तानसाठी हा मोठा संदेश असेल. २००२ नंतर पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान सायप्रस दौऱ्यावर जात आहेत. याआधी अटलबिहारी वाजपेयी यांनी सायप्रस दौरा केला होता. १९८३ साली इंदिरा गांधी सायप्रस दौऱ्यावर गेल्या होत्या. २३ वर्षांनी पुन्हा एकदा भारत जुन्या मैत्रीतून नवा डाव टाकून तुर्की आणि पाकिस्तानची चिंता वाढवणार आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी