शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
13
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
14
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
15
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
16
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
17
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
18
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
19
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
20
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा

तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:22 IST

या दोन्ही देशांमध्ये स्वातंत्र्यानंतर एकमेकांचे समर्थन केले आहे. सायप्रसने भारताच्या अणुचाचणी आणि काश्मीरसारख्या मुद्द्यावर नेहमी भारताची बाजू घेतली आहे.

नवी दिल्ली - २ प्राचीन सभ्यता असणारे देश भारत आणि सायप्रस भलेही भौगोलिकदृष्ट्या दूर असतील परंतु त्यांच्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध कित्येक दशकापासून आहेत. याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रस दौऱ्यावर जाणार आहेत. २३ वर्षानंतर पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान सायप्रसचा दौरा करत आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यातील मैत्री जुनी असली तरी या दौऱ्यातून भारत नवा डाव टाकणार आहे. विशेष म्हणजे तुर्की आणि पाकिस्तानसाठी हा संदेश आहे जे भारताच्या एकजुटतेविरोधात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

माहितीनुसार, भारत-सायप्रस यांच्यातील संबंध प्राचीन काळापासून आहेत. सायप्रस भूमध्य सागरातील एका छोट्या बेटावरील देश आहे. ज्याच्यासोबत व्यापार आणि सांस्कृतिक अदान प्रदान कायम केले जात होते. प्राचीन काळात भारतीय व्यापारी, बौद्ध मिशनरी भूमध्य सागरीय असलेल्या या भागात सक्रीय होते ज्यातून सांस्कृतिक आणि धार्मिक देवाणघेवाण करण्यात आली. आधुनिक काळात भारत आणि सायप्रस यांच्यात १९६० साली राजनैतिक संबंध तयार झाले जेव्हा सायप्रसला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. 

या दोन्ही देशांमध्ये स्वातंत्र्यानंतर एकमेकांचे समर्थन केले आहे. सायप्रसने भारताच्या अणुचाचणी आणि काश्मीरसारख्या मुद्द्यावर नेहमी भारताची बाजू घेतली आहे. दुसरीकडे भारताने संयुक्त राष्ट्र प्रस्ताव, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सायप्रसच्या प्रादेशिक अखंडतेचे समर्थन केले आहे. १९७४ साली तुर्कीने सायप्रसवर आक्रमण करून बळजबरीने उत्तर सायप्रसवर कब्जा केला होता. त्याला तुर्की गणराज्य उत्तरी सायप्रस घोषित करण्यात आले, त्याला केवळ तुर्कीनेच मान्यता दिली आहे. १९७४, १९८३, १९८४ च्या UNSC प्रस्तावात तुर्कीला सायप्रसमधून त्यांचे सैन्य मागे घेण्यास सांगत TRNC च्या स्थापनेला बेकायदेशीर असल्याचे म्हटले. भारताने सायप्रसचे समर्थन केले होते. पाकिस्तान एकमेव देश होता, ज्यांनी १९८३-८४ च्या UNSC प्रस्तावात सायप्रसविरोधात मतदान केले. 

भारतासाठी सायप्रस का महत्त्वाचा?

सायप्रसची लोकसंख्या जवळपास १० लाख इतकी आहे तरीही हा देश अनेक कारणास्तव भारतासाठी महत्त्वाचा आहे. सायप्रस पूर्व भूमध्य सागरातील एका रणनीतीदृष्टीने महत्त्वाच्या स्थानावर आहे. जे युरोप, आशिया आणि आफ्रिका यांना जोडते. या क्षेत्रात ऊर्जा संसाधने, प्राकृतिक गॅससाठी महत्त्वाचे आहे. भारत ऊर्जा गरजांसाठी आयातीवर निर्भर आहे त्यामुळे सायप्रससोबत ऊर्जा सहकार्यावर भर देऊ शकतो. त्याशिवाय सायप्रस युरोपीय संघाचा सदस्य आहे आणि २०२६ मध्ये EU कौन्सिलचे अध्यक्षपद स्वीकारेल. भारत युरोपीय संघासोबत व्यापार आणि राजनैतिक संबंध मजबूत करत आहे. सायप्रसच्या माध्यमातून भारताला युरोपशी चांगले संबंध बनवता येतील. भारत आणि सायप्रस यांच्यात संरक्षण आणि दहशतवादविरोधी सहकार्य वाढवण्यावर चर्चा होईल. सायप्रस दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेचे समर्थन करते. दोन्ही देश सागरी आणि सायबर सुरक्षेवर सहकार्य करण्याची शक्यता आहे. 

सायप्रस आणि तुर्की यांच्यात १९७४ साली संघर्ष झाला होता. त्यात सायप्रसच्या उत्तरेकडील भागावर तुर्कीने कब्जा केला. भारत, सायप्रस आणि ग्रीससोबत त्रिपक्षीय सहकार्याच्या भूमिकेमुळे तुर्कीचा या क्षेत्रावरील प्रभाव संतुलित करता येऊ शकतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि प्रथम सायप्रस राष्ट्रपती आर्कबिशप मकारियोस यांच्यापासून दोन्ही देशातील संबंध मजबूत होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५-१७ जूनला सायप्रस दौऱ्यावर जात आहेत. हा दौरा केवळ भारत-सायप्रस यांच्या संबंधांना मजबूत करणार नाही तर तुर्की आणि पाकिस्तानसाठी हा मोठा संदेश असेल. २००२ नंतर पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान सायप्रस दौऱ्यावर जात आहेत. याआधी अटलबिहारी वाजपेयी यांनी सायप्रस दौरा केला होता. १९८३ साली इंदिरा गांधी सायप्रस दौऱ्यावर गेल्या होत्या. २३ वर्षांनी पुन्हा एकदा भारत जुन्या मैत्रीतून नवा डाव टाकून तुर्की आणि पाकिस्तानची चिंता वाढवणार आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी