शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
5
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
6
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
7
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
8
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
9
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
10
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
11
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
12
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
13
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
14
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
15
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
16
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
17
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
18
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
19
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
20
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!

परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 19:06 IST

भारताने २०१४ नंतर आयनी एअरबेसवर काही सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानेही तैनात केली होती.

दुशांबे - भारतीय लष्कराने ताजिकिस्तान येथील महत्त्वाचं एअरबेस रिकामे केले आहे. भारताने या एअरबेसचा वापर १९९० च्या दशकात अफगाणिस्तानात नॉर्दन आघाडीचं समर्थन करण्यासाठी केला होता. त्यावेळी भारताने या एअरबेसद्वारे उत्तरी आघाडीचे प्रमुख आणि पंजशीरचे सिंह म्हणून ओळखले जाणारे अहमद शाह मसूद यांचे प्राण वाचवले होते. मात्र २०२२ मध्ये ताजिकिस्तानातील या एअरबेसवरून भारताला आपले सैन्य आणि साहित्य पुन्हा परत बोलवावे लागले आहे. याचा खुलासा आता समोर झाला आहे. या प्रकरणावर अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया नाही.

४ वर्षापूर्वी करार संपला होता...

रिपोर्टनुसार, राजधानी दुशांबेपासून सुमारे १० किलोमीटर पश्चिमेला असलेल्या आयनी एअरबेसचा विकास आणि संयुक्त ऑपरेशनसाठी भारत- ताजिकिस्तानमधील करार जवळजवळ चार वर्षांपूर्वी संपला. त्यानंतर ताजिकिस्तानने कराराचे नूतनीकरण करण्यास नकार दिला, ज्यामुळे भारताला आयनी एअरबेसवरून सैन्य पुन्हा भारतात बोलवावे लागले. भारताने या ठिकाणाहून वैद्यकीय आणि देखरेखीच्या कारवायांसह अनेक गैरलष्करी ऑपरेशन्स करणे सुरू केले होते. मागील २ दशकांमध्ये भारताने ताजिकिस्तानच्या आयनी एअरबेसच्या विकास आणि सुधारणेसाठी जवळपास १० कोटी डॉलर खर्च केलेत. हा एअरबेस सोव्हियत काळात बनला होता. याच्या दुरुस्तीत रनवे मजबूत केला आणि लांबी वाढवली होती, जेणेकरून लढाऊ विमाने आणि एअर कार्गो वाहतुकीसाठी येथून विमान उड्डाण घेता येतील. त्यात मजबूत शेल्टर, फ्यूल डेपो, एक एअर ट्रॅफिक कंट्रोल फॅसिलिटीचं बांधकाम करण्यात आले होते. 

भारताने २०१४ नंतर आयनी एअरबेसवर काही सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानेही तैनात केली होती. त्याशिवाय भारताची एक सैन्य तुकडीही या भागात सज्ज असायची, त्यापैकी बहुतेक जण लष्कर आणि हवाई दलातील सैनिक होते. बऱ्यादचा २०० पर्यंत भारतीय कर्मचारी या एअरबेसवर तैनात केले जायचे. मात्र आता भारतीय कर्मचारी आणि सर्व साहित्ये २०२२ पर्यंत पुन्हा भारतात आणण्यात आली आहेत. भारताचे हे धोरणात्मक अपयश आहे अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे तर कराराची मुदत संपल्यानंतर भारताने एअरबेसवरून माघार घेतली असा सरकारचा दावा आहे. 

भारतासाठी किती महत्त्वाचा एअरबेस?

आयनी एअरबेसवरून भारतानं माघारी परतणे हा एक मोठा धक्का मानला जात आहे. हा भारताच्या परदेशातील लष्करी तळांपैकी एक होता. येथून भारत केवळ अफगाणिस्तानच नव्हे तर पाकिस्तान आणि चीनवरही लक्ष ठेवत असे. हा एअरबेस पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या सीमेवर असलेल्या अफगाणिस्तानच्या वाखान कॉरिडॉरपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर आहे. जर पाकिस्तानने पीओके ताब्यात घेतले नसते तर ताजिकिस्तान आपला शेजारी देश असता. आयनी एअर बेसवरून एसयू-३० एमकेआय सारखी भारतीय लढाऊ विमाने पेशावर किंवा इस्लामाबादलाही लक्ष्य करू शकतात. चीनच्या शिनजियांग प्रांताशी असलेली त्याची सीमा देखील शत्रूंसाठी दुहेरी आव्हान निर्माण करू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : India Forced to Abandon Overseas Military Base: A Major Setback?

Web Summary : Tajikistan declined to renew India's lease on the Ayni Airbase, forcing its withdrawal in 2022. The base, strategically vital for monitoring Afghanistan, Pakistan, and China, cost India $100 million to develop. India used the base to support the Northern Alliance in Afghanistan in the 1990s.
टॅग्स :IndiaभारतIndian Armyभारतीय जवानchinaचीनPakistanपाकिस्तान