शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 19:06 IST

भारताने २०१४ नंतर आयनी एअरबेसवर काही सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानेही तैनात केली होती.

दुशांबे - भारतीय लष्कराने ताजिकिस्तान येथील महत्त्वाचं एअरबेस रिकामे केले आहे. भारताने या एअरबेसचा वापर १९९० च्या दशकात अफगाणिस्तानात नॉर्दन आघाडीचं समर्थन करण्यासाठी केला होता. त्यावेळी भारताने या एअरबेसद्वारे उत्तरी आघाडीचे प्रमुख आणि पंजशीरचे सिंह म्हणून ओळखले जाणारे अहमद शाह मसूद यांचे प्राण वाचवले होते. मात्र २०२२ मध्ये ताजिकिस्तानातील या एअरबेसवरून भारताला आपले सैन्य आणि साहित्य पुन्हा परत बोलवावे लागले आहे. याचा खुलासा आता समोर झाला आहे. या प्रकरणावर अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया नाही.

४ वर्षापूर्वी करार संपला होता...

रिपोर्टनुसार, राजधानी दुशांबेपासून सुमारे १० किलोमीटर पश्चिमेला असलेल्या आयनी एअरबेसचा विकास आणि संयुक्त ऑपरेशनसाठी भारत- ताजिकिस्तानमधील करार जवळजवळ चार वर्षांपूर्वी संपला. त्यानंतर ताजिकिस्तानने कराराचे नूतनीकरण करण्यास नकार दिला, ज्यामुळे भारताला आयनी एअरबेसवरून सैन्य पुन्हा भारतात बोलवावे लागले. भारताने या ठिकाणाहून वैद्यकीय आणि देखरेखीच्या कारवायांसह अनेक गैरलष्करी ऑपरेशन्स करणे सुरू केले होते. मागील २ दशकांमध्ये भारताने ताजिकिस्तानच्या आयनी एअरबेसच्या विकास आणि सुधारणेसाठी जवळपास १० कोटी डॉलर खर्च केलेत. हा एअरबेस सोव्हियत काळात बनला होता. याच्या दुरुस्तीत रनवे मजबूत केला आणि लांबी वाढवली होती, जेणेकरून लढाऊ विमाने आणि एअर कार्गो वाहतुकीसाठी येथून विमान उड्डाण घेता येतील. त्यात मजबूत शेल्टर, फ्यूल डेपो, एक एअर ट्रॅफिक कंट्रोल फॅसिलिटीचं बांधकाम करण्यात आले होते. 

भारताने २०१४ नंतर आयनी एअरबेसवर काही सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानेही तैनात केली होती. त्याशिवाय भारताची एक सैन्य तुकडीही या भागात सज्ज असायची, त्यापैकी बहुतेक जण लष्कर आणि हवाई दलातील सैनिक होते. बऱ्यादचा २०० पर्यंत भारतीय कर्मचारी या एअरबेसवर तैनात केले जायचे. मात्र आता भारतीय कर्मचारी आणि सर्व साहित्ये २०२२ पर्यंत पुन्हा भारतात आणण्यात आली आहेत. भारताचे हे धोरणात्मक अपयश आहे अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे तर कराराची मुदत संपल्यानंतर भारताने एअरबेसवरून माघार घेतली असा सरकारचा दावा आहे. 

भारतासाठी किती महत्त्वाचा एअरबेस?

आयनी एअरबेसवरून भारतानं माघारी परतणे हा एक मोठा धक्का मानला जात आहे. हा भारताच्या परदेशातील लष्करी तळांपैकी एक होता. येथून भारत केवळ अफगाणिस्तानच नव्हे तर पाकिस्तान आणि चीनवरही लक्ष ठेवत असे. हा एअरबेस पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या सीमेवर असलेल्या अफगाणिस्तानच्या वाखान कॉरिडॉरपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर आहे. जर पाकिस्तानने पीओके ताब्यात घेतले नसते तर ताजिकिस्तान आपला शेजारी देश असता. आयनी एअर बेसवरून एसयू-३० एमकेआय सारखी भारतीय लढाऊ विमाने पेशावर किंवा इस्लामाबादलाही लक्ष्य करू शकतात. चीनच्या शिनजियांग प्रांताशी असलेली त्याची सीमा देखील शत्रूंसाठी दुहेरी आव्हान निर्माण करू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : India Forced to Abandon Overseas Military Base: A Major Setback?

Web Summary : Tajikistan declined to renew India's lease on the Ayni Airbase, forcing its withdrawal in 2022. The base, strategically vital for monitoring Afghanistan, Pakistan, and China, cost India $100 million to develop. India used the base to support the Northern Alliance in Afghanistan in the 1990s.
टॅग्स :IndiaभारतIndian Armyभारतीय जवानchinaचीनPakistanपाकिस्तान