शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भारत-चीनने सीमाप्रश्न सोडविण्यासाठी तयार करावे अनुकूल वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 02:52 IST

चिनी विदेशमंत्री : द्विपक्षीय सहयोगाचा विस्तार

बीजिंग : भारतचीनने सीमाप्रश्न सोडविण्यासाठी एकमेकाला नुकसान पोहोचविणे व एकमेकांवर संशय घेणे सोडले पाहिजे व द्विपक्षीय सहयोग वाढवून अनुकूल वातावरण तयार केले पाहिजे, असे चीनचे विदेशमंत्री वांग यी यांनी रविवारी म्हटले आहे. वांग यांनी म्हटले आहे की, भारत आणि चीनच्या संबंधांसाठी सीमावाद पूर्णपणे जबाबदार नाही. दोन्ही देश मित्र व भागीदार आहे. परंतु त्यांनी एकमेकांवर संशय घेणे सोडले पाहिजे.

मागील वर्षी मे महिन्यात लडाखमध्ये सीमावाद निर्माण झाल्यानंतर भारत-चीन संबंधांच्या विद्यमान स्थितीवर आपल्या वार्षिक पत्रकार परिषदेत त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे की, दोन्ही देशांनी आपल्या वादविवादांचा निपटारा करावा व द्विपक्षीय सहयोगाचा विस्तार करावा. सीमावाद इतिहासाची देण आहे. तो दोन्ही देशांच्या संबंधांसाठी पूर्णपणे जबाबदार नाही. वांग यांनी चीन संसद नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक सत्राच्या वेळी पत्रपरिषदेत सांगितले की, दोन्ही देशांनी वादांचे योग्यप्रकारे निपटारा करावा व सहयोग वाढवावा. त्यामुळे मुद्दे सोडविण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. तथापि, त्यांनी दोन्ही देशांत सैन्य स्तरावर दहाव्या चर्चेनंतर पूर्व लडाखमध्ये पेंगाँग सरोवराच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यांवर सैनिकांच्या वापसीबाबत काहीही कसलीही टिप्पणी नाही. भारताचे विदेशमंत्री जयशंकर यांच्याशी दूरध्वनीवरून ७५ मिनिटे चर्चा झाल्यानंतर सीमा मुद्द्यावर वांग यांनी वरीलप्रमाणे वक्तव्य केले आहे.  दरम्यान, शुक्रवारी भारतीय राजदूत विक्रम मिस्त्री यांनी चीनचे उपविदेशमंत्री लुओ झाओहुई यांच्याशी चर्चा केली होती व पूर्व लडाखच्या सर्व भागांतून सैनिक वापसीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले होते.

वांग यांनी म्हटले आहे की, भारत व चीन या दोन्ही विकसनशील देशांनी एकमेकांच्या हितांचे रक्षण करावे व जगात बहुध्रुवीय व्यवस्था मजबूत करावी, अशी जगाची अपेक्षा आहे. चीनच्या विदेश मंत्र्यांनी म्हटले आहे की, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले दृष्टिकोन समान आहेत. त्यामुळे दोन्ही देश एकमेकांचे मित्र, भागीदार आहेत. ते एकमेकांसाठी धोका नाहीत किंवा प्रतिद्वंद्वी नाहीत. सफल होण्यासाठी नुकसान पोहोचविण्याऐवजी एकमेकांची मदत केली पाहिजे. सीमावर्ती भागांत मागील काही वर्षांत जे झाले ते चुकीचे झाले, हे स्पष्ट आहे. सीमावाद चर्चेद्वारे सोडविण्यास वचनबद्ध आहोत. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत