शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
6
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
7
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
8
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
9
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
10
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
11
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
12
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
13
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
14
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
15
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
16
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
17
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
18
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
19
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
20
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता

भारताच्या मित्राला मध्यस्थीत यश येणार?; अन्यथा चीनसोबतचा तणाव पुन्हा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 12:10 IST

या वाटाघाटीमध्येही LACवरील वादाचे निराकरण झाले नाही, तर दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचू शकतात.

लडाखमधील LACवर झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारत अन् चीनमधील तणाव विकोपाला पोहोचला आहे. चीनच्या आक्रमकपणाला भारतानंही जशास तसं उत्तर देण्याची तयारी चालवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वास्तविक नियंत्रण रेखे(LAC)वर सुरू असलेल्या तणावात मॉस्कोमध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची (एससीओ) बैठक भारत-चीन द्विपक्षीय संबंधांसाठी निर्णायक ठरू शकते. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी रशिया मॉस्को येथे भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. या वाटाघाटीमध्येही LACवरील वादाचे निराकरण झाले नाही, तर दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचू शकतात.वस्तुतः लष्करी व मुत्सद्दे पातळीवर अनेक फे-या बोलूनही चीनच्या वृत्तीमुळे हा वाद मिटला नाही. जयशंकर एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला येणार आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांच्या चिनी समकक्ष वांग यी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. एलएसी वादावर चीनकडून काही ठोस पुढाकार घेण्याची भारताची अपेक्षा आहे. हे निश्चित आहे की, जर या बैठकीवर सहमती झाली, परंतु त्यामध्ये काहीही सकारात्मक तोडगा निघू शकला नाही तर दोन्ही देशांमधील मुत्सद्दी व सैनिकी पातळीवरील संघर्ष शिगेला पोहोचतील. भारत सतत चीनला तसा निरोप देत आहे.गेल्या आठवड्यात चीनला वरच्या स्तरावरून भारतानं दोन मोठे संदेश दिले आहेत. सीडीएस बिपीन रावत म्हणाले की, हा वाद मिटविला नाही तर भारत लष्करी कारवाईचा पर्याय वापरू शकतो. तर परराष्ट्रमंत्र्यांनी 1962नंतर लडाखमधील अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीचा उल्लेख केला. भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. हा प्रत्यक्ष चीनला संदेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भारताचा संयम सातत्याने कमी होत आहे. आतापर्यंत 106 अॅप्सवर बंदी घालून भारताने आणखी 225 अॅप्सची यादी तयार केले आहेत. जयशंकर-वांग यी यांच्यात होणाऱ्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्यास भारत या योजनेची भारत जलद अंमलबजावणी करेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.भारत आपल्या भूमिकेवर ठाम जयशंकर-वांग यी यांची भेट 9 ते 11 सप्टेंबरदरम्यान होऊ शकते. या बैठकीत भारत आपल्या जुन्या भूमिकेवर ठाम राहील. सीमा विवादात वाटाघाटी करण्यापूर्वी चीनने एलएसीवरील आपले स्थान पूर्ववत करावे, अशी भारताची इच्छा आहे. लष्करी व मुत्सद्दी पातळीवरील चर्चेत चीन यास सहमती देत ​​आहे, परंतु जमिनीवर झालेल्या चर्चेदरम्यान झालेल्या कराराचे पालन करीत नाही.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत