शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

India China FaceOff: अमेरिका भडकली; चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या खोटेपणाची पिसंच काढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 17:53 IST

तसेच चीन समुद्री वाहतुकीस धोका निर्माण करत आहे. गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांच्या झटापटीत शहीद झालेल्या भारतीय जवानांबद्दल अमेरिकेने दु:ख व्यक्त केले.

ठळक मुद्देशहीद झालेल्या भारतीय जवानांबद्दल अमेरिकेने दु:ख व्यक्त केलेपीपुल्स लिबरेशन आर्मीने भारतासोबत सीमेवर तणाव वाढवला आहेचीनच्या कम्युनिस्ट पार्टीवरही अमेरिकेने केले गंभीर आरोप

वॉश्गिंटन – लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षानंतर त्याचे पडसाद जागतिक देशांवरही उमटत आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर अमेरिकेने चीनवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी या घटनेचा निषेध करत अमेरिकेने चीनला भारतीय सीमेवर तणाव निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. त्याचसोबत चीनमधील सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पार्टीला धूर्त संबोधले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी चीन सरकारवर निशाणा साधत सांगितले की, चीनची कम्युनिस्ट पार्टी नाटोसारख्या संस्थेच्या माध्यमातून स्वतंत्र जगाला पुन्हा जुन्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच अशाप्रकारचे नियम बनवून चीनला मदत करत आहेत. पीपुल्स लिबरेशन आर्मीने भारतासोबत सीमेवर तणाव वाढवला आहे. जो जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश आहे. चीन दक्षिण चीन समुद्रावर सैन्य वाढवत आहे, ते बेकायदेशीरपणे या क्षेत्रावर आपला दावा करत आहेत असं अमेरिकेने सांगितले.

तसेच चीन समुद्री वाहतुकीस धोका निर्माण करत आहे. गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांच्या झटापटीत शहीद झालेल्या भारतीय जवानांबद्दल अमेरिकेने दु:ख व्यक्त केले. पोम्पियो यांनी युरोप आणि चीनचं आव्हान या विषयावर एका व्हर्चुअल कार्यक्रमाला संबोधित करताना हे सांगितले. त्याचसोबत मागील काही वर्षापासून पाश्चिमात्य देशांना वाटत आहे की, चीनमधील कम्युनिस्ट पार्टी बदलू शकते. चीनी लोकांच्या जीवनावर चांगला परिणाम आणि सुधार होऊ शकतो असं ते म्हणाले.

दरम्यान चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने या चांगल्या विचाराचा फायदा घेतला पाहिजे, जगाला दाखवून दिलं पाहिजे की, ते सहकार्याची भूमिका घेतात. चीनमधील माजी राजनेता डेंग शियाओपिंग म्हणायचे की, आपली ताकद लपवून ठेवा आणि योग्य वेळेची वाट पाहा, मी अनेकदा सांगितले की, हे काय चाललं आहे? हा खूप जटील प्रश्न आहे. ही कोणाची चूक नाही. मागील काही दशकं युरोपीय आणि अमेरिका कंपन्या चीनमध्ये मोठ्या अपेक्षेने गुंतवणूक करत आहेत असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पोम्पियो यांनी सांगितले. तसेच चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने कोरोना व्हायरसबाबतही खोटी माहिती दिली. त्यामुळे जगभरात कोरोनाचा फैलाव झाला. हे लपवण्यासाठी डब्ल्यूएचओवर दबाव टाकला. ज्यामुळे लाखो लोकांचे जीव गेले आणि जागतिक अर्थव्यवस्थेला नुकसान पोहचलं याचा पुनरुच्चार अमेरिकेने केला.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनAmericaअमेरिका