शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

India China Face Off: भारतीय सैन्य घमेंडी; मोठ्या युद्धासाठी तयार; चीनची युद्धखोरीची भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 10:29 IST

India China Face Off: ग्लोबल टाईम्सने संपादकीयमध्ये युद्धखोरीची भाषा केली आहे. सीमेरेषेवर भारतीय सेना इन्फ्रास्ट्रक्चर उभारत आहे. त्यांनी चीनच्या जागेतही काही बांधकाम केले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष होत आहे, असे म्हटले आहे.

बिजिंग : लडाखच्या गलवान घाटीमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान झालेल्या हिंसक झटापटीचे खापर चीनने भारतावरच फोडले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दोन्ही देशांदरम्यान वाढलेला तणाव हा भारतामुळेच झालेला आहे. भारतीय सैन्याचा घमेंडीपणा आणि दुस्साहसामुळे हे घडले आहे. सैन्यांमधील संघर्ष दोन्ही देशांसाठी योग्य नाहीय. आम्ही मोठ्या युद्धासाठी तयार असून त्याचा फायदाही आमच्याबाजुला आहे, असे म्हटले आहे. 

ग्लोबल टाईम्सने संपादकीयमध्ये युद्धखोरीची भाषा केली आहे. सीमेरेषेवर भारतीय सेना इन्फ्रास्ट्रक्चर उभारत आहे. त्यांनी चीनच्या जागेतही काही बांधकाम केले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष होत आहे. कारण चीनचे सैन्य भारतीयांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारताने दोन गैसमज करून घेत सीमेच्या मुद्द्यावर कडक भूमिका घेतली आहे. यामध्ये पहिला अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे चीन भारतासोबत वाईट संबंध ठेवू इच्छित नाहीय. यामुळे चीन भारताने उकसावल्यास त्याला उत्तर देण्याची इच्छा ठेवत नाही. 

दुसरा गैरसमज असा की काही लोकांना वाटते की, भारताच्या सैन्याची ताकद चीनपेक्षा जास्त आहे. या गैरसमजांमुळेच भारताच्या विचारांना प्रभावित केले आहे. पण चीन आणि भारताच्या तकदीमध्ये खूप अंतर आहे, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. 

गलवान व्हॅलीमध्ये दोन्ही सैन्यादरम्यान झालेल्या हाणामारीमध्ये दोन्ही बाजुच्या सैनिकांचा मृत्यू झाला आहे. यावरून सध्या दोन्ही देशांमधील सीमावाद नियंत्रणात नसल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेनंतर दोन्ही सैन्यदलांनी संयम ठेवला आहे. दोन्ही देश चर्चेतून तणाव निवळू पाहत आहेत. चीनने आपल्य़ा सैनिकांच्या मृत्यूचा आकडा जाहीर केलेला नाही, कारण पुन्हा दोन्ही देशांमध्ये संघर्ष होईल. 

चीनच्या जनतेने विश्वास ठेवावा

भारतासोबतच्या सीमावादाच्य़ा मुद्द्यावर चीनच्या जनतेने पीपल्स लिबरेशन आर्मीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सीमा वाद सोडविण्यासाठी चीनची अखंडता आणि राष्ट्रीय हित जपले जाणार आहे. चीनकडे त्यांच्या प्रत्येक इंच जमिनीची सुरक्षा करण्याची ताकद आणि समजूतदारपणा आहे. चीनविरोधातील कोणत्याही रणनितीला यशस्वी होऊ दिले जाणार नाही. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

India China Face Off: भारतीय गुराख्याचे नाव गलवान घाटी, नदीला; बाप दिलदार दरोडेखोर होता

India China Face Off: खंजीर खुपसला! चीनचा मागे हटण्याचा दिखावा; भारतीय जवानांवर पाठीमागून वार केला

India China Faceoff चीनच्या उलट्या बोंबा; भारतीय सैन्यानंच आधी आक्रमण केल्याचा आरोप

Galwan Valley 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर जवान शहीद

टॅग्स :chinaचीनladakhलडाखIndian Armyभारतीय जवान