शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

India China Conflict: भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याची तयारी करताहेत जिनपिंग? समोर येतंय असं कपटकारस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 09:23 IST

India China Conflict: गेल्या काही दिवसांमधील घटनांमुळे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आपल्याच देशात अडचणीत सापडलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग हे भारताविरुद्ध युद्ध करण्याची तयारी करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बीजिंग - गेल्या काही दिवसांमधील घटनांमुळे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आपल्याच देशात अडचणीत सापडलेले आहेत. त्यातच त्यांच्या सर्वोच्च पदाला आव्हान देण्याचे प्रयत्नही झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग हे भारताविरुद्ध युद्ध करण्याची तयारी करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते आधी लडाख आणि आता तवांगमध्ये चीनने केलेला घुसखोरीचा प्रयत्न हा निश्चित हेतूने केलेला आहे. त्या माध्यमातून भारताला युद्धासाठी चिथावणी देण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्याबरोबरच सीमाभागात चीन आपल्या लष्करी शक्तीमध्ये सातत्याने वाढ करत आहे. त्यामाध्यमातून भारतासोबत युद्धसदृष्य निर्माण करून देशातील जनतेचं लक्ष कोरोना आणि कमकुवत अर्थव्यवस्थेवरून राष्ट्रवादाकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठीच्या झीरो कोविड पॉलिसीमुळे चीनमध्ये जिनपिंग यांच्याविरोधात असंतोष वाढत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रातील कंपन्या बंद आहेत. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे जिनपिंग यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. तसेच वाढत्या विरोधामुळे त्यांना कोविडच्या प्रोटोकॉलमध्ये सवलत देणे भाग पडले आहे.  

या यापरिस्थितीत लोकांमधील असंतोष कमी करण्यासाठी राष्ट्रवादाकडे लक्ष वेधण्याचा जिनपिंग यांचा प्रयत्न आहे.  त्यासाठी त्यांच्याकडे दोन पर्याय आहेत, ते म्हणजे तैवानवर हल्ला करणे किंवा भरताविरुद्ध युद्ध पुकारणे. यापैकी तैवानवर आक्रमण केल्यास त्याच्या बचावासाठी अमेरिका आणि जपान युद्धात उतरू शकतात. त्यामुळे चीनवर नामुष्की ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्यातरी तैवानवर हल्ला करणे जिनपिंग टाळतील. 

अशा परिस्थितीत भारतावर हल्ला करण्याचा पर्याय जिनपिंग चाचपून पाहत आहेत. लडाखमध्ये सैनिकी कारवाया करून त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण केलेली आहे. चीनने भारतावर आक्रमण केल्यास अमेरिकेसह अन्य पाश्चात्य देश त्याचा निषेध करतील, मात्र युद्धात उतरणार नाहीत. त्यामुळेच चीन भारतावर हल्ला करण्याची तयारी करत आहे.

आता लडाखनंतर भारताने अरुणाचल प्रदेशमधील तवांग भागात चीनने हल्ला करण्याचा प्रयत्न का केला असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामागे चीनचे दोन हेतू दिसत आहेत. एक म्हणजे भूतानला तीन बाजूंनी घेरणे आणि दुसरं म्हणजे भारताकडून अरुणाचल प्रदेश हिसकावणे जर तवांगवर कब्जा केला तर भूतानच्या पूर्व भागात घुसणे चीनला शक्य होईल. त्यानंतर मोठी कारवाई करून भूतान गिळंकृत करता येईल, असा चीनचा होरा आहे.

 तसेच तवांगवर कब्जा केल्यास संपूर्ण अरुणाचल प्रदेश आपल्या कब्ज्यात घेता येईल. असे चीनला वाटते. हा भाग तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. १९६२ च्या युद्धात चीनने तवांगवर कब्जा केला होता. मात्र चिनी सैन्य नंतर माघारी फिरले होते. दरम्यान, गेल्या काही वर्षांत भारताने या भागात आपला पाया भक्कम केला आहे. त्यामुळे चीनचा हेतू साध्य झालेला नाही.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावXi Jinpingशी जिनपिंगchinaचीनIndiaभारतArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश