शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

India China Conflict: भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याची तयारी करताहेत जिनपिंग? समोर येतंय असं कपटकारस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 09:23 IST

India China Conflict: गेल्या काही दिवसांमधील घटनांमुळे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आपल्याच देशात अडचणीत सापडलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग हे भारताविरुद्ध युद्ध करण्याची तयारी करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बीजिंग - गेल्या काही दिवसांमधील घटनांमुळे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आपल्याच देशात अडचणीत सापडलेले आहेत. त्यातच त्यांच्या सर्वोच्च पदाला आव्हान देण्याचे प्रयत्नही झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग हे भारताविरुद्ध युद्ध करण्याची तयारी करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते आधी लडाख आणि आता तवांगमध्ये चीनने केलेला घुसखोरीचा प्रयत्न हा निश्चित हेतूने केलेला आहे. त्या माध्यमातून भारताला युद्धासाठी चिथावणी देण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्याबरोबरच सीमाभागात चीन आपल्या लष्करी शक्तीमध्ये सातत्याने वाढ करत आहे. त्यामाध्यमातून भारतासोबत युद्धसदृष्य निर्माण करून देशातील जनतेचं लक्ष कोरोना आणि कमकुवत अर्थव्यवस्थेवरून राष्ट्रवादाकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठीच्या झीरो कोविड पॉलिसीमुळे चीनमध्ये जिनपिंग यांच्याविरोधात असंतोष वाढत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रातील कंपन्या बंद आहेत. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे जिनपिंग यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. तसेच वाढत्या विरोधामुळे त्यांना कोविडच्या प्रोटोकॉलमध्ये सवलत देणे भाग पडले आहे.  

या यापरिस्थितीत लोकांमधील असंतोष कमी करण्यासाठी राष्ट्रवादाकडे लक्ष वेधण्याचा जिनपिंग यांचा प्रयत्न आहे.  त्यासाठी त्यांच्याकडे दोन पर्याय आहेत, ते म्हणजे तैवानवर हल्ला करणे किंवा भरताविरुद्ध युद्ध पुकारणे. यापैकी तैवानवर आक्रमण केल्यास त्याच्या बचावासाठी अमेरिका आणि जपान युद्धात उतरू शकतात. त्यामुळे चीनवर नामुष्की ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्यातरी तैवानवर हल्ला करणे जिनपिंग टाळतील. 

अशा परिस्थितीत भारतावर हल्ला करण्याचा पर्याय जिनपिंग चाचपून पाहत आहेत. लडाखमध्ये सैनिकी कारवाया करून त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण केलेली आहे. चीनने भारतावर आक्रमण केल्यास अमेरिकेसह अन्य पाश्चात्य देश त्याचा निषेध करतील, मात्र युद्धात उतरणार नाहीत. त्यामुळेच चीन भारतावर हल्ला करण्याची तयारी करत आहे.

आता लडाखनंतर भारताने अरुणाचल प्रदेशमधील तवांग भागात चीनने हल्ला करण्याचा प्रयत्न का केला असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामागे चीनचे दोन हेतू दिसत आहेत. एक म्हणजे भूतानला तीन बाजूंनी घेरणे आणि दुसरं म्हणजे भारताकडून अरुणाचल प्रदेश हिसकावणे जर तवांगवर कब्जा केला तर भूतानच्या पूर्व भागात घुसणे चीनला शक्य होईल. त्यानंतर मोठी कारवाई करून भूतान गिळंकृत करता येईल, असा चीनचा होरा आहे.

 तसेच तवांगवर कब्जा केल्यास संपूर्ण अरुणाचल प्रदेश आपल्या कब्ज्यात घेता येईल. असे चीनला वाटते. हा भाग तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. १९६२ च्या युद्धात चीनने तवांगवर कब्जा केला होता. मात्र चिनी सैन्य नंतर माघारी फिरले होते. दरम्यान, गेल्या काही वर्षांत भारताने या भागात आपला पाया भक्कम केला आहे. त्यामुळे चीनचा हेतू साध्य झालेला नाही.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावXi Jinpingशी जिनपिंगchinaचीनIndiaभारतArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश