शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचा एक निर्णय अन् अमेरिकेतील दुकानांमध्ये तोबा गर्दी; नेमकं काय कारण..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 13:37 IST

केंद्र सरकारने भारतातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला, याचे पडसाद अमेरिकेत उमटत आहेत.

Rice Export Ban:केंद्र सरकारने मागील आठवड्यात देशातील सामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. आता या निर्णयाचे पडसाद अमेरिकेत दिसू लागले आहेत. तांदळाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. या निर्णयामुळे अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने जगातील अनेक देशांमध्ये तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या दरातही वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेतील लोक तांदूळ खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटबाहेर प्रचंड गर्दी करत आहेत. तांदूळ खरेदीसाठी रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. भारत हा तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. देशातील किमती कमी करण्यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

या देशांमध्ये सर्वाधिक निर्यात होतेभारत अनेक देशांना गैर बासमती तांदूळ निर्यात करतो. या निर्णयाचा परिणाम अमेरिकेसह इतर देशांमध्येही दिसून येत आहे. अमेरिकेशिवाय नेपाळ, फिलिपिन्स आणि कॅमेरून या देशांचाही यामध्ये समावेश आहे. एका अहवालानुसार, तांदूळ हे जगातील निम्म्या लोकसंख्येचे मुख्य अन्न मानले जाते. आता निर्यात न झाल्यास या देशांमध्ये तांदळाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. मागणी-पुरवठ्याच्या खेळामुळे त्यांच्या किमतीही वाढणार आहेत.

अमेरिकेत गर्दी होतीयेअमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय राहतात. गेल्या आठवड्यात भारत सरकारने हा निर्णय घेतला तेव्हा अमेरिकेतील काही ठिकाणी बिगर बासमती तांदळाचा पुरवठा कमी होऊ लागला. त्यामुळे लोक अधिकाधिक तांदूळ खरेदी करण्यासाठी अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये गर्दी करत आहेत. तांदळाचे भाव आणखी वाढणार, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच सुपरमार्केटमध्ये तांदुळ खरेदीसाठी गर्दी होत आहे.

हा निर्णय का घेण्यात आलाभारतात टोमॅटो, आले या इतर काही भाज्यांचे दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. टोमॅटो आणि भाजीपालापाठोपाठ तांदळाचे भावही सातत्याने वाढू लागले आहेत. विशेषत: बिगर बासमती तांदळाच्या दरात 10 ते 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत भाव आणखी वाढू नयेत म्हणून सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतbusinessव्यवसायInternationalआंतरराष्ट्रीयCentral Governmentकेंद्र सरकार