शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

India Vs Pakistan: भारताने अफगाणिस्तानसाठी पाककडे 'जमीन' मागितली; इम्रान खान म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 10:15 IST

India help to Afghanistan: भारताने अफगाणिस्तानला आधीपासून खूप मदत केली आहे. तिथे डॅम बांधणे, वीज निर्मिती करणे आदी कामे केलेली आहेत.

तालिबानच्या येण्याने अफगाणिस्तानचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील अर्थव्यवस्था कोलमडली असून लोकांना घरातच रहावे लागत असल्याने घरातील अन्नधान्य संपले आहे. यामुळे या लोकांची उपासमार होत आहे. भारताने तालिबानी राजवट बाजुला ठेवून अफगाणी नागरिकांना अन्न धान्याची मदत देऊ केली आहे. परंतू, ती पोहोचविण्यासाठी पाकिस्तानच्या जमिनीची गरज आहे. 

अफगाणिस्तानला अन्न-धान्य पोहोचविण्यासाठी भारताने पाकिस्तानकडे जमिन वापरण्यास देण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी भारत अफगाणिस्तानला गहू पोहोचविणार आहे. यासाठी पाकिस्तानने रस्ते मार्गे वाहतूक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. यावर शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

भारताने अफगाणिस्तानला आधीपासून खूप मदत केली आहे. तिथे डॅम बांधणे, वीज निर्मिती करणे आदी कामे केलेली आहेत. यामध्ये भारत 10 लाख मेट्रिक टन गहू देण्याचे देखील आहे. यातील 50 हजार मेट्रिक टन गहू पाठविला जाणार आहे. मात्र दोन्ही देशांना जोडणारा मार्ग हा पाकिस्तानातून जातो. अटारी-वाघा बॉर्डरवरून हा गहू अफगाणिस्तानला पोहोचवायचा आहे. 

इम्रान खान यांच्या कार्यालयाने ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत भारत माणुसकीच्या नात्यातून अफगाणिस्तानला गहू पाठविणार आहे. अफगाणिस्तानच्या बंधूंसाठी पाकिस्तानची जमीन वापरण्यास देण्याचा विचार केला जाईल, असे म्हटले आहे.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानAfghanistanअफगाणिस्तान