शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

India Vs Pakistan: भारताने अफगाणिस्तानसाठी पाककडे 'जमीन' मागितली; इम्रान खान म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 10:15 IST

India help to Afghanistan: भारताने अफगाणिस्तानला आधीपासून खूप मदत केली आहे. तिथे डॅम बांधणे, वीज निर्मिती करणे आदी कामे केलेली आहेत.

तालिबानच्या येण्याने अफगाणिस्तानचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील अर्थव्यवस्था कोलमडली असून लोकांना घरातच रहावे लागत असल्याने घरातील अन्नधान्य संपले आहे. यामुळे या लोकांची उपासमार होत आहे. भारताने तालिबानी राजवट बाजुला ठेवून अफगाणी नागरिकांना अन्न धान्याची मदत देऊ केली आहे. परंतू, ती पोहोचविण्यासाठी पाकिस्तानच्या जमिनीची गरज आहे. 

अफगाणिस्तानला अन्न-धान्य पोहोचविण्यासाठी भारताने पाकिस्तानकडे जमिन वापरण्यास देण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी भारत अफगाणिस्तानला गहू पोहोचविणार आहे. यासाठी पाकिस्तानने रस्ते मार्गे वाहतूक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. यावर शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

भारताने अफगाणिस्तानला आधीपासून खूप मदत केली आहे. तिथे डॅम बांधणे, वीज निर्मिती करणे आदी कामे केलेली आहेत. यामध्ये भारत 10 लाख मेट्रिक टन गहू देण्याचे देखील आहे. यातील 50 हजार मेट्रिक टन गहू पाठविला जाणार आहे. मात्र दोन्ही देशांना जोडणारा मार्ग हा पाकिस्तानातून जातो. अटारी-वाघा बॉर्डरवरून हा गहू अफगाणिस्तानला पोहोचवायचा आहे. 

इम्रान खान यांच्या कार्यालयाने ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत भारत माणुसकीच्या नात्यातून अफगाणिस्तानला गहू पाठविणार आहे. अफगाणिस्तानच्या बंधूंसाठी पाकिस्तानची जमीन वापरण्यास देण्याचा विचार केला जाईल, असे म्हटले आहे.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानAfghanistanअफगाणिस्तान