शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आता बासमतीवरून संघर्ष पेटला; भारताच्या आक्रमक हालचालींनी पाकिस्तान मेटाकुटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 10:47 IST

बासमती तांदळाला विशेष ट्रेडमार्क मिळावा यासाठी भारताची आक्रमक भूमिका

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये आता बासमती तांदळावरून संघर्ष पेटला आहे. दोन्ही देशांच्या खाद्य संस्कृतीत बासमती तांदळाला विशेष महत्त्व आहे. त्याशिवाय पुलाव आणि बिरयानीची कल्पनादेखील करता येत नाही. मात्र आता याच बासमतीवरून भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले आहेत. बासमती तांदळाला विशेष ट्रेडमार्क (पीजीआय) मिळावा यासाठी भारतानं युरोपियन युनियनकडे अर्ज केला आहे. युरोपियन युनियननं बासमती तांदळाचा विशेष ट्रेडमार्क भारताला दिल्यास पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसेल. त्यामुळेच पाकिस्ताननं विरोध सुरू केला आहे. भौगोलिक प्रदेशात येणाऱ्या विशिष्ट उत्पादनांना पीजीआय दर्जा मिळतो. विशिष्ट वस्तूचं उत्पादन, त्यावरील प्रक्रिया किंवा तयारी याबद्दलचा किमान एक टप्पा पूर्ण होत असलेल्या ठिकाणांना पीजीआय दर्जा दिला जातो. दार्जिलिंगमधील कॉफीसाठी भारताला पीजीआय दर्जा मिळाला आहे. कोलंबियातील कॉफीला पीजीआय दर्जा प्राप्त आहे.मित्र छोटा, पण दणका मोठा; पदड्याआडून हालचाली घडवत भारताचा पाकिस्तानला दे धक्कापीजीआय दर्ज्याचे अनेक फायदे आहेत. पीजीआय दर्जा प्राप्त उत्पादनांची नक्कल केल्यास कायदेशीर संरक्षण मिळतं. या उत्पादनांची बाजारातील किंमतही अधिक असते. त्यामुळेच भारतानं पीजीआय दर्जासाठी अर्ज करताच पाकिस्तान मेटाकुटीला आला आहे. बासमती तांदूळ निर्यात करणारे जगात दोनच देश आहेत. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक तांदूळ निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत प्रथम स्थानी आहे. तांदूळ निर्यातीतून भारताला ६.८ अब्ज डॉलर इतकं उत्पन्न मिळतं. या यादीत पाकिस्तान चौथ्या स्थानी आहे. तांदूळ निर्यातीतून पाकिस्तान २.२ अब्ज डॉलर्सची कमाई करतो. त्यामुळेच बासमतीसाठी पीजीआय दर्जा मिळवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाकिस्तानचा विरोध आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत