शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 12:32 IST

Pakistan leader Fazlur Rehman : पाकिस्तानमधील नेते आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (एफ)चे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानच्या संसदेत भारतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

पाकिस्तानमधील खराब आर्थिक स्थिती आणि वाढत्या कर्जामुळे नेत्यांचे सूरही बदलू लागले आहेत. या परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल पाकिस्तानमधील नेते विचारत आहेत. पाकिस्तानमधील नेते आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (एफ)चे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानच्या संसदेत भारतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ते म्हणाले, भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे, आम्ही दिवाळखोरी टाळण्यासाठी भीक मागत आहोत.

पडद्याआडून निर्णय घेणाऱ्या अदृश्य शक्ती देशाच्या दुरावस्थेला जबाबदार आहे, ज्यांनी जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना कठपुतळी बनवले आहे. या शक्ती आपल्याला भिंतींच्या आडून नियंत्रित करतात. संसद सदस्य तत्त्वे सोडून लोकशाही विकण्यात व्यस्त आहेत. आपण दिवाळखोरीत चाललो आहोत, याला जबाबदार कोण? असा सवाल मौलाना फजलुर रहमान यांनी केला आहे.

मौलाना फजलुर रहमान निवडणुकीनंतर नॅशनल असेंब्लीच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. आम्ही किती दिवस तडजोड करत राहणार? किती दिवस आपण खासदार म्हणून निवडून येण्यासाठी बाहेरच्या शक्तींची मदत घेत राहणार? असे मौलाना म्हणाले. तसेच, 2018 आणि 2024 च्या निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचा त्यांनी निषेध केला. याशिवाय, आपण आपल्या देशाला स्थिरतेचा बळी बनवले आहे, असे देश प्रगती करू शकत नाहीत, असे मौलाना यांनी सांगितले.

दरम्यान, पाकिस्तानची ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे पाकिस्तानातील काही उद्योगपतींचे मत आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानमधील शेअर बाजारातील दिग्गज आणि व्यावसायिक आरिफ हबीब यांनी याबाबत म्हटले होते की, भारत आणि पाकिस्ताने हातमिळवणी केली पाहिजे. तसेच, अदियाला तुरुंगात बंद असलेल्या व्यक्तीशी संबंध सुधारावेत, जेणेकरून ते गोष्टी सुधारतील. दरम्यान, अदियाला तुरुंगात बंद असलेला व्यक्ती म्हणजे माजी पंतप्रधान इम्रान खान असा त्यांचा संदर्भ होता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत