शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी प्रकरणात समोर आले आणखी एक नाव, सोनम-राजशी आहे थेट कनेक्शन! कोण आहे 'हा' व्यक्ती? 
2
Raja Raghuvanshi Murder: कोण आहे अल्बर्ट पीडी? ज्याच्या एका जबाबामुळे सोनम रघुवंशीचा खरा चेहरा जगासमोर आला
3
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
4
'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान
5
Sonam Raghuvanshi : "मी कोणाशीही लग्न केलं तरी मी तुझीच गर्लफ्रेंड...", सोनमसमोर स्टेजवर ढसाढसा रडला राज
6
डिलिव्हरी फ्री, पॅकेजिंग फ्री फक्त... रॅपिडोची फूड डिलिव्हरी बाजारात एन्ट्री! झोमॅटो-स्विगी टेन्शनमध्ये?
7
Vastu Tips: आर्थिक संकट असो वा जुना आजार; झोपण्यापूर्वी 'या' उपायाने मिळेल समाधान!
8
राजा रघुवंशी हत्याकांडावर सीमा हैदरच्या वकिलांचं मोठं विधान, म्हणाले - 'इस्लाम धर्मात...!'
9
महाराष्ट्रात मद्याच्या किंमतीत वाढ; दारूचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स आपटले
10
सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना भेट दिली दोन खास पुस्तकं, काय आहेत नावं?
11
Video: 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान दाखवले मोठे शौर्य; इंडिगोच्या विमानात BSF जवानाचा सन्मान
12
Covid Cases: कोरोना वाढतोय! पंतप्रधान मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना RT-PCR चाचणी सक्तीची
13
मुलाचा मृत्यू झाल्यावर वडिलांनी मृतदेहासोबत पुरली बाईक; मन हेलावून टाकणारी घटना
14
नारकरांच्या लेकाची गर्लफ्रेंडसोबत डेट, बांद्रामध्ये मारला फेरफटका; प्रेमाने तिला म्हणाला...
15
ऐरोली स्थानकाजवळ चायनीजच्या गाडीत सिलिंडरचा स्फोट, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर!
16
...तर प्रवाशांनी खच्चून भरलेली ट्रेन दगड, मातीत गाडली जाईल
17
५ मे रोजी लग्न, २५ ला हनिमून, २९ ला अपघात... बेपत्ता कपलचा गेल्या १३ दिवसांपासून शोध सुरू
18
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
19
Astrology: प्रेम होणे, प्रेमभंग होणे आणि प्रेमविवाह यशस्वी होणे याचेही पत्रिकेत विशिष्ट योग असतात!
20
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...

"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 12:32 IST

Pakistan leader Fazlur Rehman : पाकिस्तानमधील नेते आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (एफ)चे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानच्या संसदेत भारतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

पाकिस्तानमधील खराब आर्थिक स्थिती आणि वाढत्या कर्जामुळे नेत्यांचे सूरही बदलू लागले आहेत. या परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल पाकिस्तानमधील नेते विचारत आहेत. पाकिस्तानमधील नेते आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (एफ)चे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानच्या संसदेत भारतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ते म्हणाले, भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे, आम्ही दिवाळखोरी टाळण्यासाठी भीक मागत आहोत.

पडद्याआडून निर्णय घेणाऱ्या अदृश्य शक्ती देशाच्या दुरावस्थेला जबाबदार आहे, ज्यांनी जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना कठपुतळी बनवले आहे. या शक्ती आपल्याला भिंतींच्या आडून नियंत्रित करतात. संसद सदस्य तत्त्वे सोडून लोकशाही विकण्यात व्यस्त आहेत. आपण दिवाळखोरीत चाललो आहोत, याला जबाबदार कोण? असा सवाल मौलाना फजलुर रहमान यांनी केला आहे.

मौलाना फजलुर रहमान निवडणुकीनंतर नॅशनल असेंब्लीच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. आम्ही किती दिवस तडजोड करत राहणार? किती दिवस आपण खासदार म्हणून निवडून येण्यासाठी बाहेरच्या शक्तींची मदत घेत राहणार? असे मौलाना म्हणाले. तसेच, 2018 आणि 2024 च्या निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचा त्यांनी निषेध केला. याशिवाय, आपण आपल्या देशाला स्थिरतेचा बळी बनवले आहे, असे देश प्रगती करू शकत नाहीत, असे मौलाना यांनी सांगितले.

दरम्यान, पाकिस्तानची ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे पाकिस्तानातील काही उद्योगपतींचे मत आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानमधील शेअर बाजारातील दिग्गज आणि व्यावसायिक आरिफ हबीब यांनी याबाबत म्हटले होते की, भारत आणि पाकिस्ताने हातमिळवणी केली पाहिजे. तसेच, अदियाला तुरुंगात बंद असलेल्या व्यक्तीशी संबंध सुधारावेत, जेणेकरून ते गोष्टी सुधारतील. दरम्यान, अदियाला तुरुंगात बंद असलेला व्यक्ती म्हणजे माजी पंतप्रधान इम्रान खान असा त्यांचा संदर्भ होता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत