शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 12:32 IST

Pakistan leader Fazlur Rehman : पाकिस्तानमधील नेते आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (एफ)चे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानच्या संसदेत भारतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

पाकिस्तानमधील खराब आर्थिक स्थिती आणि वाढत्या कर्जामुळे नेत्यांचे सूरही बदलू लागले आहेत. या परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल पाकिस्तानमधील नेते विचारत आहेत. पाकिस्तानमधील नेते आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (एफ)चे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानच्या संसदेत भारतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ते म्हणाले, भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे, आम्ही दिवाळखोरी टाळण्यासाठी भीक मागत आहोत.

पडद्याआडून निर्णय घेणाऱ्या अदृश्य शक्ती देशाच्या दुरावस्थेला जबाबदार आहे, ज्यांनी जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना कठपुतळी बनवले आहे. या शक्ती आपल्याला भिंतींच्या आडून नियंत्रित करतात. संसद सदस्य तत्त्वे सोडून लोकशाही विकण्यात व्यस्त आहेत. आपण दिवाळखोरीत चाललो आहोत, याला जबाबदार कोण? असा सवाल मौलाना फजलुर रहमान यांनी केला आहे.

मौलाना फजलुर रहमान निवडणुकीनंतर नॅशनल असेंब्लीच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. आम्ही किती दिवस तडजोड करत राहणार? किती दिवस आपण खासदार म्हणून निवडून येण्यासाठी बाहेरच्या शक्तींची मदत घेत राहणार? असे मौलाना म्हणाले. तसेच, 2018 आणि 2024 च्या निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचा त्यांनी निषेध केला. याशिवाय, आपण आपल्या देशाला स्थिरतेचा बळी बनवले आहे, असे देश प्रगती करू शकत नाहीत, असे मौलाना यांनी सांगितले.

दरम्यान, पाकिस्तानची ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे पाकिस्तानातील काही उद्योगपतींचे मत आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानमधील शेअर बाजारातील दिग्गज आणि व्यावसायिक आरिफ हबीब यांनी याबाबत म्हटले होते की, भारत आणि पाकिस्ताने हातमिळवणी केली पाहिजे. तसेच, अदियाला तुरुंगात बंद असलेल्या व्यक्तीशी संबंध सुधारावेत, जेणेकरून ते गोष्टी सुधारतील. दरम्यान, अदियाला तुरुंगात बंद असलेला व्यक्ती म्हणजे माजी पंतप्रधान इम्रान खान असा त्यांचा संदर्भ होता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत