शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पाकिस्तानचं दिवाळं; एअर स्ट्राइकमुळे गुंतवणूकदार घाबरला, 'बाजार उठला'! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 18:28 IST

भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. भारताच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पाकिस्तामध्ये दहशतीचे वातावरण आहे.

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. भारताच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानमध्ये आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यामुळे बुधवारी पाकिस्तानमधील शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली. आज बाजार उघडताच कराची स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक केएसई-100 काही मिनिटांमध्येच  एक हजार अंकांनी कोसळला.   पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने सीमा पार करून एअर सर्जिकल स्ट्राइक करत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, भारताकडून अजून हल्ला होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आज पाकिस्तानमधील शेअर बाजार उघडताच कराची स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक   काही मिनिटांमध्येच  एक हजार अंकांनी कोसळला. त्यामुळे गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत झालेली आहे. अशा परिस्थितीत भारतासोबतचा तणाव वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेअर बाजारात घसरगुंडी सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत कराची शेअर बाजारात दोन हजार अंकांची घसरण झाली आहे. 14 फेब्रुवारीपासून आतापर्यंत पाकिस्तानी शेअर बाजाराचे 6 टक्के नुकसान झाले आहे. पाकिस्तानी अर्थव्यवस्था सध्या चिंताजनक स्थितीत असून, परिस्थिती अशीच बिघडत राहिली तर कराची शेअर बाजारात अजून मोठी घसरण होऊ शकते असे, अर्थतज्ज्ञांनी सांगितले.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानStock Marketशेअर बाजारIndiaभारतsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक