शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 09:50 IST

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत, भारताने पाकिस्तानला देशाचा पाया कोणत्या वास्तवावर उभा आहे याची आठवण करून दिली.

पाकिस्तानी लष्कराने दोन दिवसापूर्वी आपल्याच देशातील एका गावावर बॉम्ब हल्ला केला. हा हल्ला खैबर पख्तूनख्वा येथे केला.यामध्ये निराधार आणि निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेवर काल भारताने जगाचे लक्ष वेधले. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानच्या या कृतीकडे भारताने लक्ष वेधले. पाकिस्तान हा जगातील एकमेव देश आहे जो लढाऊ विमानांचा वापर करून स्वतःच्याच नागरिकांवर बॉम्बहल्ला करतो आणि त्यांची हत्या करतो', असे भारताने म्हटले आहे. 

Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक

२२ सप्टेंबरच्या रात्री पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथील तिरह खोऱ्यात पाकिस्तानी सैन्याने बॉम्ब टाकले. या हल्ल्यात महिला आणि मुलांसह तीस लोकांचा मृत्यू झाला. खैबर पख्तूनख्वा येथील स्थानिक प्रतिनिधींनी याला "जेट बॉम्बिंग" म्हटले आहे. चिखलात माखलेल्या मृत मुलांचे, खाटांवर मृतदेहांच्या रांगा असलेले फोटो हृदयद्रावक आहेत. ही निष्पाप मुले दहशतवादी होती का?, असा प्रश्न  स्थानिकांनी उपस्थित केला.

जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतील (UNHRC) भारताच्या स्थायी मिशनचे समुपदेशक क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा गैरवापर करण्याचा आरोप केला. 

क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तानच्या दुष्कृत्यांचा जगासमोर पद्धतशीरपणे पर्दाफाश केला. "आमच्या भूभागाचा लोभ करण्याऐवजी, त्यांनी बेकायदेशीरपणे व्यापलेला भारतीय भूभाग रिकामा करावा आणि दहशतवाद निर्यात करण्यापासून, स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट करण्यापासून आणि संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित दहशतवाद्यांना आश्रय देण्यापासून त्यांच्याकडे वेळ असेल तर त्यांनी त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे, जी जीवनावश्यक आधारावर आहे", असंही क्षितिज त्यागी म्हणाले.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या या बैठकीत, क्षितिज त्यागी यांनी पुलवामा, उरी, पठाणकोट आणि मुंबईसह मागील हल्ल्यांचा तसेच पहलगाममधील अलिकडच्या हल्ल्याचा उल्लेख केला. त्यांनी पाकिस्तानी नेत्यांच्या ढोंगीपणाकडेही लक्ष वेधले, त्यांनी पूर्वी अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेनला आश्रय दिला होता हे निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत