शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 09:50 IST

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत, भारताने पाकिस्तानला देशाचा पाया कोणत्या वास्तवावर उभा आहे याची आठवण करून दिली.

पाकिस्तानी लष्कराने दोन दिवसापूर्वी आपल्याच देशातील एका गावावर बॉम्ब हल्ला केला. हा हल्ला खैबर पख्तूनख्वा येथे केला.यामध्ये निराधार आणि निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेवर काल भारताने जगाचे लक्ष वेधले. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानच्या या कृतीकडे भारताने लक्ष वेधले. पाकिस्तान हा जगातील एकमेव देश आहे जो लढाऊ विमानांचा वापर करून स्वतःच्याच नागरिकांवर बॉम्बहल्ला करतो आणि त्यांची हत्या करतो', असे भारताने म्हटले आहे. 

Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक

२२ सप्टेंबरच्या रात्री पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथील तिरह खोऱ्यात पाकिस्तानी सैन्याने बॉम्ब टाकले. या हल्ल्यात महिला आणि मुलांसह तीस लोकांचा मृत्यू झाला. खैबर पख्तूनख्वा येथील स्थानिक प्रतिनिधींनी याला "जेट बॉम्बिंग" म्हटले आहे. चिखलात माखलेल्या मृत मुलांचे, खाटांवर मृतदेहांच्या रांगा असलेले फोटो हृदयद्रावक आहेत. ही निष्पाप मुले दहशतवादी होती का?, असा प्रश्न  स्थानिकांनी उपस्थित केला.

जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतील (UNHRC) भारताच्या स्थायी मिशनचे समुपदेशक क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा गैरवापर करण्याचा आरोप केला. 

क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तानच्या दुष्कृत्यांचा जगासमोर पद्धतशीरपणे पर्दाफाश केला. "आमच्या भूभागाचा लोभ करण्याऐवजी, त्यांनी बेकायदेशीरपणे व्यापलेला भारतीय भूभाग रिकामा करावा आणि दहशतवाद निर्यात करण्यापासून, स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट करण्यापासून आणि संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित दहशतवाद्यांना आश्रय देण्यापासून त्यांच्याकडे वेळ असेल तर त्यांनी त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे, जी जीवनावश्यक आधारावर आहे", असंही क्षितिज त्यागी म्हणाले.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या या बैठकीत, क्षितिज त्यागी यांनी पुलवामा, उरी, पठाणकोट आणि मुंबईसह मागील हल्ल्यांचा तसेच पहलगाममधील अलिकडच्या हल्ल्याचा उल्लेख केला. त्यांनी पाकिस्तानी नेत्यांच्या ढोंगीपणाकडेही लक्ष वेधले, त्यांनी पूर्वी अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेनला आश्रय दिला होता हे निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत