शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शक्तीशाली देश असे करू लागले तर जग खतरनाक बनेल; निज्जरवरून ट्रुडो पुन्हा बरळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 14:58 IST

म्हणे कॅनडा हा नेहमीच कायद्याचे पालन करणारा आणि त्यासाठी उभा राहणारा देश... निज्जरच्या हत्येचे कॅनडाच्या पंतप्रधानांचे दु:ख अजून तरी संपलेले दिसत नाहीय.

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचे कॅनडाच्या पंतप्रधानांचे दु:ख अजून तरी संपलेले दिसत नाहीय. जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा एकदा भारतावर आरोप केले आहेत. एका पत्रकाराच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलेले आहे. यावेळी ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत जे आरोप भारतावर केलेले तेच पुन्हा केले आहेत. 

निज्जर यांच्या हत्येच्या तपासात काय प्रगती आहे, प्रगती होत नसेल तर अमेरिकेने कॅनडाच्या बाजूने भारताबाबत कठोर भूमिका घ्यावी का? असा सवाल विचारण्यात आला होता. कॅनडाच्या भूमीवर कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येमध्ये भारत सरकारचे एजंट सामील असल्याची विश्वासार्ह माहिती आम्हाला आधीच समजली होती. तेव्हा आम्ही भारताशी संपर्क साधला आणि त्यांना या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यास सांगितले होते. सहकार्य करण्याची विनंती केली होती, असे ट्रुडो म्हणाले.

आम्ही आंतरराष्ट्रीय कायदा आणि कॅनडाच्या सार्वभौमत्वाच्या या गंभीर उल्लंघनावर कारवाई करण्यासाठी युनायटेड स्टेट्स आणि आमच्या इतर मित्र देशांशी संपर्क साधला. ही गोष्ट आम्ही खूप गांभीर्याने घेत आहोत, असे ट्रुडो म्हणाले. कॅनडा हा नेहमीच कायद्याचे पालन करणारा आणि त्यासाठी उभा राहणारा देश आहे. कारण सत्ता योग्य-अयोग्य ठरवू लागली, मोठ्या देशांनी परिणामांची चिंता न करता आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले, तर संपूर्ण जग सर्वांसाठीच अधिक धोकादायक होईल, असे ट्रुडो बरळले. 

कॅनडाच्या भूमीवर एका कॅनेडियन नागरिकाच्या हत्येमध्ये भारत सरकारचे एजंट सामील असू शकतात असे मानण्याची आमच्याकडे गंभीर कारणे आहेत. यावर भारताची आलेली प्रतिक्रिया ही व्हिएन्ना कन्व्हेन्शनचे उल्लंघन करून कॅनेडियन अधिकाऱ्यांच्या मोठ्या समुहाला बाहेर काढणे ही होती. जेव्हा एखाद्या देशाला असे वाटते की आपले राजनैतिक अधिकारी दुसऱ्या देशात सुरक्षित नाहीत, तेव्हा ही परिस्थिती आंतरराष्ट्रीय संबंधांना अधिक धोकादायक आणि गंभीर बनवते, असे ट्रुडो म्हणाले.

टॅग्स :Justin Trudeauजस्टीन ट्रुडोIndiaभारतCanadaकॅनडा