शहरं
Join us  
Trending Stories
1
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
2
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
3
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
4
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
5
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
6
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
7
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
8
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
9
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
10
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
11
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
12
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
13
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
14
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
15
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
16
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
17
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
18
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
19
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
20
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!

काश्मीर मुद्दा पुन्हा पेटणार! पाकिस्तानच्या नापाक हरकती रोखण्यासाठी भारत झाला सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 10:45 IST

जर पाकिस्तानने आपल्या नापाक हरकती कमी केल्या नाही तर भारत पाकिस्तानला रोखठोक उत्तर देण्यास समर्थ आहे.

नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्र अधिवेशनात पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. संयुक्त राष्ट्र अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना दहशतवाद हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेला येणार आहे. तसेच पाकिस्तानकडून काश्मीर मुद्दा उचलला जाऊ शकतो त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने तयारी केली आहे. त्यामुळे जर संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानने काश्मीर मुद्दा काढला तर भारताकडून त्याला रोखठोक उत्तर दिलं जाणार आहे. 

भारताचे प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र अधिवेशनाचा वापर पाकिस्तानकडून काश्मीर मुद्दा उचलण्यासाठी केला जाऊ शकतो. जर पाकिस्तानने आपल्या नापाक हरकती कमी केल्या नाही तर भारत पाकिस्तानला रोखठोक उत्तर देण्यास समर्थ आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर भारताकडे तयार आहे. 

भारत पाकिस्तानच्या रणनीतीला आपल्या पद्धतीने उत्तर देईल. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मामला आहे. त्यामुळे कलम 370 रद्द करणे आणि जम्मू काश्मीरचं विभाजन करणे हा भारत सरकारचा निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कसा येऊ शकतो? काही देश अशाप्रकारे स्वत:ची प्रतिमा खालवण्याचं काम करत आहेत. मात्र आम्ही आमची प्रतिमा उंचावत आहोत असा टोला सैय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला लगावला आहे. तसेच यूएनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यात इंटरनेट आणि सायबर यामाध्यमातून कशाप्रकारे दहशतवाद पसरविला जातो आणि त्याला कसं रोखलं जाऊ शकतं यावर चर्चा होईल. भारताने नेहमी दहशतवादाला आव्हान दिलं आहे असा विश्वास अकबरुद्दीन यांनी दिला. 

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्दा संयुक्त राष्ट्र अधिवेशनात उचलणार असल्याचे संकेत दिले आहेत. 27 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिवेशनात भाषण आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान वारंवार भारताच्या विरोधात षडयंत्र रचत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला नेहमी तोंडघशी पडावं लागलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्र अधिवेशनात पाकिस्तान काश्मीर मुद्दा उचलणार असल्याचं सांगितले आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानJammu Kashmirजम्मू-काश्मीर