शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

काश्मीर मुद्दा पुन्हा पेटणार! पाकिस्तानच्या नापाक हरकती रोखण्यासाठी भारत झाला सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 10:45 IST

जर पाकिस्तानने आपल्या नापाक हरकती कमी केल्या नाही तर भारत पाकिस्तानला रोखठोक उत्तर देण्यास समर्थ आहे.

नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्र अधिवेशनात पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. संयुक्त राष्ट्र अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना दहशतवाद हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेला येणार आहे. तसेच पाकिस्तानकडून काश्मीर मुद्दा उचलला जाऊ शकतो त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने तयारी केली आहे. त्यामुळे जर संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानने काश्मीर मुद्दा काढला तर भारताकडून त्याला रोखठोक उत्तर दिलं जाणार आहे. 

भारताचे प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र अधिवेशनाचा वापर पाकिस्तानकडून काश्मीर मुद्दा उचलण्यासाठी केला जाऊ शकतो. जर पाकिस्तानने आपल्या नापाक हरकती कमी केल्या नाही तर भारत पाकिस्तानला रोखठोक उत्तर देण्यास समर्थ आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर भारताकडे तयार आहे. 

भारत पाकिस्तानच्या रणनीतीला आपल्या पद्धतीने उत्तर देईल. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मामला आहे. त्यामुळे कलम 370 रद्द करणे आणि जम्मू काश्मीरचं विभाजन करणे हा भारत सरकारचा निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कसा येऊ शकतो? काही देश अशाप्रकारे स्वत:ची प्रतिमा खालवण्याचं काम करत आहेत. मात्र आम्ही आमची प्रतिमा उंचावत आहोत असा टोला सैय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला लगावला आहे. तसेच यूएनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यात इंटरनेट आणि सायबर यामाध्यमातून कशाप्रकारे दहशतवाद पसरविला जातो आणि त्याला कसं रोखलं जाऊ शकतं यावर चर्चा होईल. भारताने नेहमी दहशतवादाला आव्हान दिलं आहे असा विश्वास अकबरुद्दीन यांनी दिला. 

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्दा संयुक्त राष्ट्र अधिवेशनात उचलणार असल्याचे संकेत दिले आहेत. 27 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिवेशनात भाषण आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान वारंवार भारताच्या विरोधात षडयंत्र रचत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला नेहमी तोंडघशी पडावं लागलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्र अधिवेशनात पाकिस्तान काश्मीर मुद्दा उचलणार असल्याचं सांगितले आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानJammu Kashmirजम्मू-काश्मीर